शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

विशेष लेख: शेतकरी नवरा नको म्हणून तरुणीने संपवलेल्या जीवनाची कहाणी

By सचिन जवळकोटे | Updated: April 2, 2025 09:27 IST

Farmer News: जिथं बागायतदार वडील रोजच्या खुरपण्यासाठी मजुरांना आठ-दहा हजार रुपये खर्च करतो, तिथंच मुलगा दरमहा वीस-पंचवीस हजारांची नोकरी हुडकत पुण्यात भाडेकरू बनतो, हा किती विचित्र विरोधाभास? या समस्येवर अचूक उत्तर म्हणजे ‘शेतकऱ्याचं ब्रँडिंग’ झालं पाहिजे. शेतीची ‘ब्रँड व्हॅल्यू’ वाढली पाहिजे..

- सचिन जवळकोटे(कार्यकारी संपादक,  लोकमत, सोलापूर) 

तिचे वडील इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक. सासरे शेतकरी. पती साखर कारखान्यात कामाला. वर्षभरापूर्वी लग्न झालं. गेल्या आठवड्यात माहेरी आली. आईसोबत बराच काळ गंभीर चर्चा झाली. दोघीही अस्वस्थ आहेत, हे घरातल्या कर्त्या पुरुषाच्या ध्यानातच आलं नाही. मुलीचे वडील शाळेत गेल्यानंतर दोघींचे मृतदेह एकाच दोरीला लटकलेले आजूबाजूच्यांना दिसले. सारेच हादरले. पोलिस घटनास्थळी धावले. चिठ्ठी सापडली. ‘मला खूप शिकायचं होतं, मात्र शेतकऱ्याच्या पोरासोबत माझं लग्न लावून दिलं गेलं,’ हे नैराश्य पोरीने चिठ्ठीत तळमळून लिहिलं होतं.

सारा गाव हळहळला. ही घटना तुळजापुरातली. साडेतीन शक्तिपीठांपैकी समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्रावरची. जिथं स्त्रीशक्तीचा जागर मोठ्या भक्तिभावानं केला जातो, तिथंच दोघींनी एकाच दोरीला गळफास घेऊन जीवनाची अखेर केली. पंचनाम्यानंतर दोघींचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. तिथं एकाचवेळी दोघींवर अग्निसंस्कार केले गेले. त्यातही मनाला चटका लावणारा योगायोग म्हणजे ज्या रानावनात राहायचं नाही म्हणून लेकीनं जीव दिला, त्याच शेतात दोघींवर अंत्यसंस्कार केले गेले.

तिच्या चिठ्ठीत दोन मुद्दे होते. पहिला- तिला खूप शिकायचं होतं; खरं तर तिचं शिक्षण एमए-बीएड झालेलं. तिला शिक्षक व्हायचं होतं; परंतु कदाचित तिला सध्याच्या शिक्षण क्षेत्रातला नवा पायंडा ठाऊक नसावा. ‘शिक्षणसेवक’ नावाखाली डबल ग्रॅज्युएटवालेही दरमहा केवळ तीन-साडेतीन हजारांवर खासगी शिक्षण संस्थेत राबताहेत. दहा-पंधरा वर्षे काम करूनही पाचशे-हजारांपेक्षा जास्त पगारवाढ कुणालाच मिळत नाही. बहुतांश जण वयाच्या पस्तीशी-चाळिशीनंतर ही बेभरवशाची नोकरी सोडून स्वत:चा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करतात. कुणी यार्डात मुनीमची चाकरी पत्करतो, कुणी थेट चौकात चायनीज गाडा टाकतो, एवढाच काय तो फरक. 

तिच्या चिठ्ठीतला दुसरा मुद्दा- शेतकऱ्याच्या पोराचा. गावालगतच्या शेतातच सासऱ्याची वस्ती. या ठिकाणी तिचं कुटुंब राहतं. तुळजापूरसारख्या मोठ्या गावातून थेट शिवारातल्या ओसाड वस्तीवर राहण्याची कदाचित तिची मानसिकता नसावी. नवरा मुलगा लगतच्या साखर कारखान्यात काम करत असला तरीही कुटुंबाची ओळख शेतकरी म्हणूनच. तशात तिचे वडील मुख्याध्यापक. भाऊ रशियात डॉक्टरकी शिकायला गेलेला. कदाचित ही तुलना तिचं भावविश्व उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरली असेल. मात्र, सासूरवाडीत सहा एकर शेती. उजनी धरणालगतचा हा सुपीक पट्टा. जणू सोन्याचा तुकडा. 

या भागातल्या कैक शेतकऱ्यांनी जमिनीत अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. गुंठ्यावर लाखो रुपये कमवण्याचं आधुनिक पीकतंत्र शोधून काढलं आहे. तोच निकष लावला तर तीन हजारवाल्या नोकरदारापेक्षा लखपती शेतकरी कधीही श्रीमंतच. मात्र आता हजारो मुलींच्या दृष्टीनं लाइफस्टाइलचे संदर्भ बदलले आहेत. स्वमालकीच्या चाळीस हजार स्क्वेअर फुटांच्या एकरामधल्या शेतकऱ्यापेक्षा पुण्यात पाचशे स्क्वेअर फुटांच्या भाड्याच्या फ्लॅटमधला ‘जॉबकरी’ भारी वाटतो, हा काळाचाच महिमा म्हटला पाहिजे!

यामुळंच की काय गावाकडं भरगच्च शेतकरी असूनही केवळ लग्नासाठी पोरगी मिळावी म्हणून शहरात खोटी-खोटी नोकरी करणाऱ्या तरुणांची नवी पिढीच तयार होऊ लागली आहे. लग्नानंतर एखादं मूलबाळ झालं की पुन्हा पत्नीला घेऊन गावाकडं जाण्याची प्रथा पडू लागलीय. मात्र, आपला विश्वासघात झाला या भावनेतून घटस्फोट घेणाऱ्या तरुणींचं प्रमाणही प्रचंड वाढत चाललंय. अलीकडच्या काळात कौटुंबिक न्यायालयातली किचकट प्रकरणं हेच दर्शवतात. ज्यांना गावी उत्पन्नाचा स्रोत नाही, त्यांनी नाइलाजानं मोठ्या शहरात जाऊन नोकरी हुडकली तर एकवेळ ठीक म्हणायचं, मात्र जिथं बागायतदार वडील रोजच्या खुरपण्यासाठी मजुरांना आठ-दहा हजार रुपये खर्च करतो, तिथंच मुलगा दरमहा वीस-पंचवीस हजारांची नोकरी हुडकत पुण्यात भाडेकरू बनतो, हा किती विचित्र विरोधाभास? या समस्येवर अचूक उत्तर म्हणजे ‘शेतकऱ्याचं ब्रँडिंग’ झालं पाहिजे. शेतीची ‘ब्रँड व्हॅल्यू’ वाढली पाहिजे..(sachin.javalkote@lokmat.com) 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीmarriageलग्नMaharashtraमहाराष्ट्र