शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

रोज बदलणाऱ्या, डिजिटल होत जाणाऱ्या देशाची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 07:12 IST

डिजिटल तंत्रज्ञानामुळे झालेले परिवर्तन भारताच्या कानाकोपऱ्यात दिसते. समाजामध्ये सर्वसमावेशकता आणण्यातही तंत्रज्ञानाची मोठी भूमिका आहे.

- अश्विनी वैष्णव

काही वर्षांपूर्वीपर्यंत, तंत्रज्ञानाचा वापर विशेषाधिकार मानला जात होता आणि शहरी उच्चभ्रूंपुरताच मर्यादित होता. ग्रामीण भागातील लोकांना इंटरनेट परवडणारे नव्हते. २०१४ पर्यंत फक्त २५ कोटी भारतीयांनी इंटरनेट वापरलेले होते. २०२२ मध्ये ही संख्या ८४ कोटी झाली. पूर्वी १ जीबी डेटाची किंमत जवळपास ३०० रुपये होती. आता ती जवळपास १३.५ प्रति जीबी अशी परवडणारी झाली आहे. नव-भारताततंत्रज्ञानाच्या माध्यमातून आलेल्या समावेशकतेचे हे उदाहरण! 

कोविड महामारीचा काळ हा देशासाठी खडतर  होता. मात्र, ‘डिजिटल इंडिया’ने या अडथळ्यांचा प्रभाव कमी केला. आतापर्यंत देशभरात १० कोटींपेक्षा अधिक टेलिकन्सल्टेशन्स झाले आहेत. ग्रामीण डाक सेवकांनी आधार आधारित पेमेंट सिस्टीम (AePS) वापरून दुर्गम भागात आर्थिक सेवा सहाय्य पुरविले. तंत्रज्ञानाचा साधन म्हणून वापर आणि राहणीमानातील सुलभता वाढविण्यावर पंतपधान मोदींनी दिलेला भर भारतीय जनतेसाठी फायद्याचा ठरला.

सध्या  एआय, ५ जी आणि क्वांटम तंत्रज्ञान रुळले असून,  ते मुख्य प्रवाहात येत आहे. या सगळ्यामुळे २०२३ हे वर्ष वळणबिंदू ठरते आहे. कोविन (CoWIN) मंच ही  त्यातील एक प्रमुख उपलब्धी! लस उत्पादक, दवाखाने, रुग्णालये, नागरिकांची नोंदणी ते लसीकरणाचे अंतिम प्रमाणपत्र हे सगळे एकत्र आणण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आहे. या मंचामुळेच भारताला पहिल्या १२ महिन्यांत १५० कोटी लोकांना लस देणे शक्य झाले. आतापर्यंत भारताने २२० कोटी इतक्या मात्रांचे लसीकरण पूर्ण केले आहे. 

आज, भारतभरातील फिरते विक्रेते, भाजीपाला विक्रेते, लहान दुकाने ते मोठ्या शोरुम्सकडे डिजिटल पेमेंटसाठी क्यूआर कोड स्टिकर्स आहेत. रस्त्याच्या कडेला चहाच्या टपरीवरही  असलेला क्यूआर कोड हे रोजचे दृश्य आहे. सार्वजनिक निधीचा वापर करून सरकारने एक प्लॅटफॉर्म तयार केला, ज्यात प्रमुख बँका, विमा-ई-कॉमर्स कंपन्या, एमएसएमई, स्टार्टअप आणि तब्बल १२० कोटी लोक सामील झाले. २०१६ मध्ये सुरू केलेले यूपीआय आता दरवर्षी १.५ ट्रीलीयन अमेरिकी डॉलर्सचा व्यवहार करते.

प्रत्येक व्यवहार पूर्ण होण्यासाठी सरासरी २ सेकंद लागतात. भारताचे यूपीआय डिजिटल पेमेंटसाठीचे जागतिक मानक ठरले आहे. जगण्याची सुलभता वाढविण्यात तंत्रज्ञानाची भूमिका दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. फास्टॅग (FASTag) तंत्रज्ञानाने हे सुनिश्चित केले आहे की, आमची वाहने महामार्गावरून न थांबता धावत राहतील. तंत्रज्ञानाच्या या वापरामुळे टोल प्लाझावर गर्दी आणि प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे. डिजिटल पेमेंटला चालना दिल्यामुळे आपल्या सीमाभागात वाहतूक सुरळीत झाली आहे.

भारतात ५ जी सेवेचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदींनी  आरोग्यसेवा, शिक्षण, कृषी, बांधकाम क्षेत्र आदींमध्ये ‘५ जी’चा वापर करण्याविषयी आग्रह धरला होता. भारत येत्या तीन वर्षांत ४ जी आणि ५ जी तंत्रज्ञान निर्यातदार होण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. आता ओसीईएन (ओपन क्रेडिट एनेबलमेंट नेटवर्क) विकसित केले जात आहे. एखाद्या व्यक्तीला कर्ज देण्यासाठी ओसीईएन प्रणाली विविध बँकांमध्ये स्पर्धा निर्माण करेल, कर्ज कमी किमतीत उपलब्ध करेल. 

पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने देशाचे चित्र बदलणारी डिजिटल अणि तंत्रज्ञानप्रणित क्रांती सामान्य नागरिकाला सक्षम करते आणि त्याचे जीवन बदलते. गरिबातल्या गरिबाला आणि उपेक्षित घटकांनाही सशक्त करते आणि तरुण व प्रतिभावंत पिढीच्या सृजनशील मनाच्या हातांना काहीतरी निर्माण करण्याची क्षमता देते.जागतिक पातळीवर अनिश्चितता असताना त्या काळात भारताने ‘अमृतकाळात’ प्रवेश केला आहे. यापुढील वाटचालीत तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, हे नक्की!

टॅग्स :technologyतंत्रज्ञानIndiaभारत