शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

स्वातंत्र्यसूर्य: नगरच्या पटवर्धन बंधूंनी पेटविली स्वातंत्र्याची ठिणगी

By सुदाम देशमुख | Updated: August 24, 2022 10:26 IST

देशभक्त अच्युतराव पटवर्धन आणि रावसाहेब पटवर्धन या अहमदनगर येथील बंधूंनी आपल्या भाषणांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी चेतना दिली.

देशभक्त अच्युतराव पटवर्धन आणि रावसाहेब पटवर्धन या अहमदनगर येथील बंधूंनी आपल्या भाषणांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी चेतना दिली. त्यांचे विचार ऐकून अनेक तरुण स्वातंत्र्यलढ्यात उतरले. रावसाहेबांच्या भाषणांनी ब्रिटिशांविरुद्ध तरुण पेटून उठले,  तर अच्युतरावांच्या भूमिगत चळवळीमुळे स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र झाला. 

नगरचे प्रथितयश वकील हरी केशव पटवर्धन यांच्या सहा मुलांपैकी रावसाहेब व अच्युतराव या दोन बंधूंनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. पटवर्धन बंधूंचे वडील हरिभाऊ हे लोकमान्य टिळक, डॉ. ॲनी बेझंट यांच्या होमरूल लीगचे काम करीत असत. ते सेनापती बापट यांचे सहाध्यायी होते. ॲनी बेझंट नगरला आल्यावर त्यांचा मुक्काम पटवर्धन वाड्यातच असायचा.  

रावसाहेब पटवर्धन यांनी १९२२ साली महात्मा गांधी यांच्या सत्याग्रह आंदोलनात उडी घेतली. १९३०, १९३२, १९३९ आणि १९४२ च्या आंदोलनात त्यांनी कारावास भोगला. त्यांचा साने गुरुजी, पंडित नेहरू यांच्याशी जवळून स्नेह होता. 

अच्युतराव पटवर्धन हे रावसाहेबांचे लहान बंधू. तेही स्वातंत्र्य चळवळीत रावसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढले. प्रदीर्घ काळ भूमिगत राहून त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाला बळ दिले. अच्युतराव हे अर्थशास्त्राचे अभ्यासक होते. इंग्रजांनी देशाची अर्थव्यवस्था नियोजनबद्ध पद्धतीने कशी नेस्तनाबूत केली,  हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हापासून ते महात्मा गांधी यांच्या विचारांकडे वळले. गांधी यांच्या आंदोलनात देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकारकांना सहकार्य करण्याचा पर्याय त्यांनी निवडला. रावसाहेब हेही इतिहास, राजकारण, अर्थशास्त्रात पारंगत होते. रावसाहेब पटवर्धन यांनी आपल्या लेखणी आणि वाणीतून महात्मा गांधी यांचे विचार समाजात रुजवले. अस्पृश्यता निर्मूलन, हिंदू- मुस्लीम ऐक्य, दारूबंदी या गांधीजींच्या चतु:सूत्रीचा त्यांनी प्रचार केला. ‘संघशक्ती’ हे साप्ताहिक त्यांनी अहमदनगरला सुरू केले. यातून त्यांनी महात्मा गांधी यांचा संदेश खेड्यापाड्यांत पोहोचवला. स्वदेशीची चळवळ त्यांनी झोपडीपर्यंत नेली. त्यांनी स्थापन केलेल्या  साखर कामगार युनियनमार्फत १०० चरखे फिरू लागले.

सन १९४२च्या लढ्यात भूमिगत राहून स्वातंत्र्याचे कार्य करणारे अच्युतराव पटवर्धन यांना कैदेत टाकण्यासाठी ब्रिटिश पळापळ करत होते. यासाठी  तीन लाख रुपयांचे बक्षीस अन् अनेक बिघे जमीन इनाम म्हणून देण्याचे जाहीर केले गेले. परंतु शेवटपर्यंत अच्युतरावांनी ब्रिटीशांना धूळच चारली. अच्युतरावांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीत काम करून देशाच्या विकासाला एक दिशा दिली. पुढे समाजवादी पक्षाच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. अच्युतराव हे रावसाहेबांपेक्षा जहाल विचारांचे होते. काँग्रेस कार्यकारिणीतून बाहेर पडून नगर जिल्ह्यात पुढे त्यांनी स्थानिक पातळीवर काम केले. रावसाहेब हे नेहरूंच्या, तर अच्युतराव हे जयप्रकाश नारायण यांच्या जवळ होते. १९४५ साली रावसाहेब पटवर्धन यांची तुरुंगातून सुटका झाली. नगरच्या जनतेने त्यांचा सत्कार केला, त्यावेळी त्यांना १० हजार रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. ती त्यांनी कामगारांच्या हितासाठी खर्च केली.  पुढे त्यांनी देशभर कामगार चळवळ मजबूत करून कामगारांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. 

अच्युतराव पटवर्धनांनी पुढे राजकारणातून संन्यास घेतला. जे. कृष्णमूर्तींच्या सल्ल्यानुसार त्यांनी विधायक कार्य केले व शैक्षणिक क्षेत्रातही खूप भरीव कार्य केले. समाजातील वरच्या स्तरांतील अनेक नामवंत व्यक्तींबरोबर अच्युतरावांचा स्नेह होता, याचा भूमिगत चवळवळीस फार फायदा झाला. अहमदनगरच्या मातीत जन्मलेला नेता, अशी त्यांची ख्याती देश- विदेशात हाेती. 

स्वातंत्र्यानंतर नेहरू पर्व सुरू झाले. रावसाहेब पटवर्धन हे नेहरूंच्या जवळचे होते. नेहरूंनी रावसाहेबांना उपराष्ट्रपतिपद स्वीकारण्याची विनंती केली. मात्र, रावसाहेबांनी ती नम्रपणे नाकारली. सत्तेच्या जागा नाकारण्याचे त्यांनी ठरवले होते. काहीही न मागणारा मित्र म्हणून मला राहू द्या, अशी गळ रावसाहेबांनी नेहरूंना घातली, अशी त्यांची विशुद्ध मैत्री होती. अन्यथा रावसाहेब पटवर्धन उपराष्ट्रपतीही झाले असते! 

संकलन : सुदाम देशमुख वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, अहमदनगर

टॅग्स :Indiaभारत