शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

सनदी अधिकाऱ्यांच्या पाठीच्या कण्याचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 09:55 IST

प्रशासनाचा कणा असलेले अधिकारी अटकेत जातात, न्यायालयाच्या संशयाचे कारण होतात, हे लक्षण ठीक नव्हे! तक्रार आल्यावरच जागे होते ते प्रशासन कसले?

महेश झगडे, निवृत्त सनदी अधिकारी.गेल्या काही दिवसांमध्ये आयएएस अधिकाऱ्यांशी निगडित तीन बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसृत झाल्या. त्यापैकी दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या  गुन्हेगारी सहभागाबाबत  होत्या. तिसरी बातमी मंत्र्यांकडून प्रशासनावर येणाऱ्या दबावाची होती. अर्थात,  या घटना सत्य, असत्य किंवा अर्धसत्य आहेत, हे शेवटी संबंधित तपास यंत्रणा आणि न्यायालयाच्या सर्व उतरंडीतून जाऊन ठरेलच. शिवाय, सर्व प्रशासन असेच चालत असावे, असा गैरसमज करून घेण्याचे कारण नाही. तसे असते तर ही व्यवस्था केव्हाच कोलमडून पडली असती. त्याचबरोबर सर्व काही आलबेल आहे  असेही नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षेत गैरप्रकारांचे प्रकरण राज्यात गाजले.  अनेकांना अटक झाली. प्रकरण घडले त्यावेळी शिक्षण विभागात उपसचिव पदावर कार्यरत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यालाही पोलिसांनी  अटक केली.  शिक्षण परिषदेचे प्रमुख आणि या गुन्ह्यातील मुख्य आरोपी यांची अन्य प्रकरणातील चौकशी या आयएएस अधिकाऱ्यांकडे असल्याने त्यांनी त्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रमुख आरोपीस भाग पाडले, असाही आरोप ठेवण्यात आला.  याचा अर्थ अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसणे, भ्रष्टाचाराला वाव राहील अशी पद्धत चालवून घेणे आणि प्रामाणिकपणापासून फारकत घेणे, याचा व्यवस्थेत शिरकाव झालेला आहे हे मान्य करावे लागेल. या घटनेत तक्रार झालीच नसती, तर हे प्रकरण बाहेर आलेही नसते. असे प्रकार होऊ नयेत म्हणून तशी प्रणाली विकसित करणे आणि कोणी गैरवर्तन करीत असेल, तर त्यास प्रतिबंध करणे, पोलीस चौकशीची वाट न पाहता संबंधितांवर कारवाई करणे, हे सचिवांकडून अपेक्षित असते. त्यामुळे हे अपवादात्मक प्रकरण न समजता सचिवांनी जागरूक राहून तशी प्रशासकीय संस्कृती जोपासली पाहिजे.दुसरी घटना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बांधकाम गैरप्रकाराबाबतची!  दोन आयएएस आयुक्तांनी सकृद्दर्शनी गुन्हेगारी कृत्य केल्याच्या एका तक्रारीवरून न्यायालयाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्येही तक्रारीवरूनच प्रकरण उद्भवले, त्यामुळे ज्यामध्ये तक्रारी झालेल्या नाहीत, ते सर्व नियमितच आहे, असा अर्थ अजिबात नव्हे. देशात बांधकाम परवानग्या, अनधिकृत बांधकामे इत्यादींमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी असतात. शिवाय या प्रकरणांतले निर्णय  प्रशासकीय पातळीवर होत असल्याने  त्यात लोकप्रतिनिधींचा थेट समावेश नसतो. मग गेल्या सात दशकांमध्ये बांधकामांबाबतची प्रणाली निकोप व भ्रष्टाचारविरहित करण्यास प्रशासकीय नेतृत्वास कोणी अडविले? पुणे येथे मी महापालिका आयुक्त असताना कोथरूड येथील वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या इमारतीचे रेकॉर्डवरील अस्तित्व नष्ट करून तो एफएसआय इतर इमारत बांधकामाकरिता वापरला गेला. त्या वेळेस संबंधित वास्तुविशारदावर कारवाई करू नये म्हणून राजकीय नेतृत्वापेक्षाही प्रशासकीय नेतृत्व जास्त आग्रही होते. निकोप व्यवस्था राबविण्याची शीर्ष जबाबदारी ज्या नगरविकास खात्याच्या सचिवांची असते, त्यांनी अशा अनियमिततांचा नियमित आढावा घेतला, तर परिस्थिती सुधारेल; पण हे होत नाही. प्रणालीत सुधारणा होण्याऐवजी क्लिष्टता वाढवून अधिकाऱ्यांना नियमांऐवजी “स्वयंअधिकार निर्णयां”चे अधिकार देऊन भ्रष्टाचारास कुरण मोकळे केले जाते.मंत्र्यांनी बदल्यांची यादी दिल्याने व मला त्याअंतर्गत काम करावे लागल्याने दबाव सहन करावा लागला, असे वक्तव्य अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या  अधिकाऱ्याने केल्याचे वाचले. लोकप्रतिनिधींनी चुकीची कामे सांगू नयेत, हे स्पष्ट आहे. पण, नियमबाह्य कामे होणार नाहीत, यावर ठाम राहण्याची वैधानिक जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यावरच असते. त्याकरिता ठाम भूमिका घेण्यासाठी राज्यघटनेत अधिकाऱ्यांना कवचकुंडले दिलेली आहेत. त्यामुळे दबाव हे कारण होऊ शकत नाही. भारतीय राज्यघटना आणि नियम इतके तकलादू नाहीत, की अनाठायी राजकीय दबावामुळे देशात अराजक माजेल. बहुतांश वेळा  प्रशासकीय अधिकारी राजकीय दबावांवर  मात करून, चुकीचे काही घडणार नाही याची काळजी घेतात. त्यामुळेच व्यवस्था चालू आहे. अर्थात, वर नमूद केलेली अपवादात्मक प्रकरणे अलीकडे वाढत चालल्याने प्रशासकीय वाटचाल विदीर्ण अवस्थेकडे होत असून, त्यास वेळीच आवर घालणे, ही प्रशासकीय नेतृत्वाची जबाबदारी आहे.mahesh.alpha@gmail.com 

टॅग्स :GovernmentसरकारCourtन्यायालयPoliceपोलिस