शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पुणेकरांनी पाहिला तो थरारपटाचा फक्त ट्रेलर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 06:27 IST

‘पाऊस आणि तुंबणारी मुंबई’ या समीकरणाची आता सगळ्यांना सवय झाली आहे. त्याला ‘तुंबई’ असे नावही देऊन झाले. पण, तुंबणारे पुणे हे चित्र तसे अलीकडचे आहे.

संजय आवटे,संपादक, लोकमत, पुणे

‘पाऊस आणि तुंबणारी मुंबई’ या समीकरणाची आता सगळ्यांना सवय झाली आहे. त्याला ‘तुंबई’ असे नावही देऊन झाले. पण, तुंबणारे पुणे हे चित्र तसे अलीकडचे आहे. यंदाच्या पावसाळ्याने हे भयंकर चित्र समोर आले. पुण्याच्या पेठांमध्ये पाणी घुसले आहे आणि थेट दुकाने-घरे यात पाणी शिरले आहे, अशी ही रात्र होती. अगदी मध्यवर्ती पुण्यात रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. त्या पाण्यात लोकांची वाहने बुडून चालली होती. अनेक वाहने बंद पडत होती. चालणाऱ्या मुला-बाळांचे, वयोवृद्धांचे, महिलांचे, रुग्णांचे, रस्त्यांवरच जगणाऱ्यांचे अतोनात हाल होत होते. वीज गायब होती. एखाद्या अतिशय अविकसित आणि जुनाट गावातही अशी तारांबळ होणार नाही, असा अनुभव पुणेकर त्या भयाण रात्री घेत होते. 

हे चित्र या सोमवारचे. दिवाळी खरेदीची लगबग सुरू असल्याने मंडळी रस्त्यांवरच होती. घराकडे परतत होती. आणि अचानक रात्री नऊच्या सुमारास जोराचा पाऊस कोसळू लागला. पुण्यासाठी हा पाऊस अनपेक्षित होता. नेहमीपेक्षा अधिक होता. मात्र, अभूतपूर्व वगैरे नव्हता. शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस सामान्य नसला तरी गेल्या दहा वर्षांचा विचार करता, यापूर्वी तीन वेळा ऑक्टोबर महिन्यातच असा पाऊस झालेला आहे. मात्र, यावेळी झालेल्या पावसाने पुण्याच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली. 

अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणारे, ‘आयटी’ची राजधानी असणारे, ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’ म्हणून स्वतःचा जयजयकार करणारे हे तथाकथित स्मार्ट शहर किती तकलादू आहे, त्याचे पुरावे मिळत होते. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए या परिसराची लोकसंख्या आहे सुमारे सव्वा कोटी. युरोपातल्या एखाद्या देशाएवढी लोकसंख्या जिथे नांदते, ते शहर एवढे दुबळे आणि आजारी कसे, हा प्रश्न या पावसाने पृष्ठभागावर आणला. पावसाने बरेच काही उघडे पडले. त्यात पुण्याच्या शहर नियोजनाचे पितळही उघडे पडले. 

पुण्यासारख्या रम्य आणि निसर्गसंपदा लाभलेल्या शहराचे आपण काय केले? विकास हवा आहेच, पण कोणती किंमत मोजून? आपण डोंगर फोडले. झाडे तोडली. बांधकामासाठी नाले बुजवले. ड्रेनेजवर रस्ते बांधले. कोणत्याही कामांसाठी सतत रस्ते खोदले जातात. पाण्याचा निचरा व्हायला मग जागा उरत नाही. पाऊस आल्यावर पाणी वाहून जाणार कसे? पुणे महानगरपालिका स्थापन झाली १९५० मध्ये. पहिली निवडणूक झाली १९५२मध्ये. तेव्हाचे आयुक्त स. गो. बर्वे यांनी तेव्हाच लक्ष्मी रस्त्याच्या रुंदीकरणाचा ठराव सर्वसाधारण सभेत आणला होता. मात्र, तेव्हा तो ठराव नगरसेवकांनी हाणून पाडला. तीच अनास्था महापालिकेच्या कारभाऱ्यांची आजही आहे. रस्ते तयार करताना सच्छिद्र असे ‘हाय परफाॅर्मन्स परव्हियस काँक्रीट’ वापरावे लागते. मग त्यातून पाणी झिरपते. असे रस्ते तयार करण्यासाठी महापालिकेला पाच वर्षांपूर्वी प्रस्ताव दिला होता. पण त्यावर पालिकेने काहीच केले नाही. सत्ता कोणाचीही असो, महापालिकेवर सत्ता चालते ती धनदांडग्यांची आणि टक्केवारीची! ज्या पुणे शहरात पंधरा वर्षांपूर्वी २७५ ओढे-नाले होते, त्यातील आता केवळ ६० ते ७० शिल्लक आहेत. 

पाऊस तर असतोच बेताल, बेमुर्वतखोर आणि बेबंद. पण, नियोजन नावाची गोष्ट तुम्हाला करता यायला हवी. सिक्कीमसारख्या राज्यापेक्षा मोठा अर्थसंकल्प असणारी पुण्याची महानगरपालिका. देशभरातील विद्यार्थ्यांना पुण्यात शिकायला यायचे असते. लग्न होऊन पुण्यात येण्याची विवाहेच्छु मुलींची इच्छा असते. अधिकाऱ्यांना पुण्यात ‘पोस्टिंग’ हवी असते. कलावंतांना पुण्यात ‘परफॉर्म’ करायचे असते. नेत्यांना पुण्यावर मांड ठोकायची असते. पण, खिसा असणाऱ्या या शहरालाही हृदय आहे, हे किती जणांना समजते? तुम्ही या शहराच्या रक्तवाहिन्या बंद करत आहात. तुम्हाला जी वाढ वाटते, ती चरबी आहे, सूज आहे.

शहराच्या रक्तप्रवाहात त्यामुळे अडथळे निर्माण होतात. रक्तपुरवठा कमी झाला की, शहराला प्राणवायू कमी पडायला लागतो. मग हृदयविकाराचा झटका अटळ असतो. या स्थितीत आज पुणे आहे. अनेक शहरांची हीच स्थिती आहे. नागरिकरण वाढत असताना, शहर नियोजनात आपल्याला अपयश येत आहे. पुण्याने सोमवारी रात्री जे पाहिले, तो थरारपटाचा फक्त ‘ट्रेलर’ होता!

टॅग्स :Puneपुणेfloodपूर