शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

दिल्ली दरबारातील धुरळा, शिंदे-पवारांनी बाह्या सरसावल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 07:56 IST

जे काही सुरू आहे, त्यामुळे अल्पसंख्याक मते बिथरतील, अशी भीती आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांना वाटते म्हणे. नितीश कुमारदेखील कडव्या हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर सावध आहेत. 

सध्या दोन प्रश्नांकडे देशाचे लक्ष लागले आहे. पहिला प्रश्न दिल्ली कोण जिंकणार? आणि दुसरा लोकसभेत भारतीय जनता पक्षाला एकट्याला स्पष्ट बहुमत तयार करण्याच्या दृष्टीने काही हालचाली पडद्यामागे सुरू आहेत का? यापैकी पहिल्याचे उत्तर शनिवारी सकाळी काही तासांत मिळून जाईल. दुसऱ्याच्या सविस्तर उत्तराची सुरुवात पहिल्याच्या उत्तरापासून होईल. 

असा दावा केला जात आहे की, वक्फ बोर्डाच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी नवा कायदा करू पाहत आहे. त्यासाठी पुरेसे बहुमत नसल्याने ते विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावे लागले. जे काही सुरू आहे, त्यामुळे अल्पसंख्याक मते बिथरतील, अशी भीती आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांना वाटते म्हणे. नितीश कुमारदेखील कडव्या हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर सावध आहेत. 

अशावेळी शक्य तिथून खासदार आणायचे आणि भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ २७२ वर न्यायचे, अशी म्हणे योजना आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दणकून पराभव वाट्याला आलेली उद्धव सेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादी यांच्या मिळून सतरा खासदारांवर त्यासाठी भाजपची नजर आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी बाह्या सरसावल्या आहेत.

त्यातही शिंदे अधिक सक्रीय आहेत. त्यात त्यांचा हातखंडाही आहे. 'ऑपरेशन कमल' आता बदनाम झाल्यामुळे 'ऑपरेशन टायगर' असे नवे नाव या मोहिमेला देण्यात आले आहे. अमूक असे होणार व अमूक इतके फुटणार, असे दावे रोज छातीठोकपणे केले जात आहेत. संक्रांत आटोपून आता महिना होत आला, तरी राजकीय पतंगबाजी जोरात आहे. 

अशावेळी उद्धव सेनेच्या सर्व खासदारांनी शुक्रवारी एकत्र येऊन आमची वज्रमूठ भक्कम असल्याचे ठणकावून सांगितले. 'उगीच वावड्या उडवू नका, आधी आपला पक्ष सांभाळा' असा सल्ला शिंदे सेनेला दिला. तरीही, या चर्चा थांबणार नाहीत आणि भाजप यावर काही बोलणार नाही. कारण, हा विषय मित्रपक्षांकडे सोपविण्यात आला आहे. 

असा धुरळा उडवत राहणे मित्रपक्षांसाठी राजकीयदृष्ट्या सोयीचे आहे. आम्ही तुमच्यासाठी झटतोय, असे भाजपच्या दिल्लीश्वरांना दाखवता येते आणि राज्यात विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थताही कायम ठेवता येते. दिल्लीतील शुक्रवारची दुसरी पत्रकार परिषद मात्र थोडी गंभीर व थेट भाजपला बोलते करणारी होती. 

लोकसभेत उपस्थित केलेले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी संबंधित मुद्दे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी संजय राऊत व सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीतील अन्य दोन घटकपक्षांच्या खासदारांसोबत दिल्लीत या मुद्द्यांवर पत्रकार परिषद घेतली. 

महाराष्ट्रात मागील विधानसभा निवडणुकीपासून पाच वर्षांत जितके मतदार वाढले नाहीत, त्यापेक्षा अधिक मतदार एप्रिल-मे महिन्यातील लोकसभा निवडणुकीनंतरच्या पाच महिन्यांत कसे वाढले, राज्यातील प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या वीस लाखांनी अधिक कशी आणि लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेल्या सर्व मतदार याद्या आयोग वारंवार मागणी करूनही का देत नाही, हे राहुल गांधी यांचे प्रश्न आहेत. 

त्याला जोडून सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजविणारा माणूस व ट्रम्पेट या चिन्हांमधील घोळाचा मुद्दा उपस्थित केला, तर संजय राऊत यांनी हा मतदार यादीचा मुद्दा म्हणजे भाजपचा निवडणूक जिंकण्याचा नवा पॅटर्न असल्याचा आरोप केला. केंद्रीय निवडणूक आयोगाची आघाडी भाजप सांभाळतो. त्यामुळे अपेक्षेनुसार भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी हे पराभवानंतरचे रडगाणे असल्याचे प्रत्युत्तर दिले. 

निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना भाजप नेत्यांनी उत्तरे देण्यात गैर काही नाही. कारण, निवडणुकीत जे झाले असेल किंवा नसेल, त्याची अंतिम लाभार्थी भाजप व महायुतीच आहे. त्यामुळे राजकीय प्रश्नांना राजकीय उत्तरे देण्याचा त्यांचा अधिकार अबाधित राहतो. परंतु, त्यामुळे राजकीय धुरळा उडण्यापलीकडे साध्य काहीही होणार नाही. अर्थात राजकीय पक्षांना हा धुरळाच महत्त्वाचा असतो. 

एखादा मुद्दा तार्किकदृष्ट्या शेवटास जाणे वगैरे त्यांच्यासाठी महत्त्वाचे नसते. निवडणूक आयोगाचे मात्र तसे नाही. मतदारांच्या मनातील छोट्यातल्या छोट्या शंकेचे निरसन करणे त्यांची घटनादत्त जबाबदारी आहे.

टॅग्स :Mahayutiमहायुतीwaqf board amendment billवक्फ बोर्डAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा