शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

तेच ते वाचणं, तेच ते पाहणं; यात कसलं ‘वेड’?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 9:33 AM

मराठी माणूस नाटकवेडा आहे हे, अत्यंत बालिश व धादांत खोटं विधान आहे. आम्ही पैसे देतो, तुम्ही विनोद करा, कोलांट्या मारा, यातच मराठी लोकांना भयंकर रस!

- मोहित टाकळकर(लेखक, दिग्दर्शक)

प्रदीर्घ काळानंतर नाट्यगृहांचे दरवाजे उघडताहेत...जगात सगळीकडेच सध्या सादरीकरणाबद्दल कठीण स्थिती आहे. कोरोना साथीमध्ये जपान -आफ्रिकेचा असो किंवा आपल्याकडचा असो, प्रेक्षक आणि नाटकवाले एकाच पानावर येऊन पोहोचलेत. लोकप्रिय व्यावसायिक नाटकं आणि आम्ही करतो ती प्रायोगिक नाटकं यांचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. व्यावसायिक नाटकाच्या उपलब्ध, तयार प्रेक्षक वर्गाला धक्का पोहोचेल असं वाटत नाही. मात्र प्रामाणिकपणे सांगायचं तर, कोरोनापूर्वीही प्रयोगशील नाटकांना अत्यंत मर्यादित प्रेक्षकवर्ग होता, तो आणखी रोडावेल की, काय असं वाटतं. अशा नाटकवाल्यांनी सक्तीच्या विरामाचं महत्त्व ओळखायला तर हवंच, पण, आपण जो नाट्य विचार करतोय तो खरोखर वेगळा आहे का?, - हे बारकाईनं तपासावं लागेल. तसा विचार होऊन रसरशीत, आव्हानात्मक आशय दिला तर, भवितव्य आहे.

दोन दशकं तू सातत्याने प्रायोगिक नाटक करतो आहेत. जगभर तुझे मित्र. एकूणच काय चित्र दिसतंय? ऑनलाईन प्रयोगांमुळे  लंडन-पॅरिसमधले चांगले प्रयोग बघायला मिळताहेत. त्यातून लक्षात येतंय की, आपल्याकडे नाटक ही गोष्ट गांभीर्यानं घेतलीच गेली नाही. मराठी माणूस नाटकवेडा आहे हे ऐकायला सुंदर व प्रत्यक्षात अत्यंत बालिश व धादांत खोटं विधान आहे. ‘आम्ही जरा संगीतवेडे आहोत’ असं म्हणताना आपण जुनं भावगीत पुन्हा पुन्हा ऐकत आळवत बसतो की, जगभरातल्या संगीताला मोकळेपणानं मिठी मारतो?, मराठी माणसाला अन्य देशातली सोडा, आपल्या प्रादेशिक भाषांमधली वेगळा आशय घेऊन येणारी नाटकंही बघायची नसतात. सोयीस्कर पांघरूणाच्या उबेत आपण तेच ते वाचतो, तेच ते पाहातो. याला वेड कसं म्हणता येईल?, वेड नव्या शक्यता अनुभवण्यासाठी तयार असतं. परदेशात कोविडोत्तर काळात अशा कलांचं कसं होणार ही भीती किंवा प्रश्नच त्यांना पडलेला मला दिसलेला नाही. खरं तर त्यांनीही आपल्याइतकंच सोसलंय, पण, तिथं अत्यंत नवेनवे प्रयोग सुरू आहेत. 

अत्यंत जिद्दीनं लोक या स्तब्ध व उलथापालथीच्या काळात जे बदललं त्याचा शोध आपापल्या माध्यमातून घेताहेत.  आपल्याकडे अशा प्रयोगांना जागा नाही, कारण आपल्याला त्याची गरज वाटत नाही. बंद अंधाऱ्या जागेत, असुरक्षित सोबतीने चावून चोथा झालेला खेळ पाहाणं व याला मनोरंजन मानणं हे दुर्दैवी आहे. आम्ही पैसे देतो, आमच्या समोर विनोद सादर करा, कोलांट्या उड्या मारा, मोठे भपकेदार सेट्स लावा यामध्ये मराठी लोकांना भयंकर रस आहे. प्रेक्षक नावाची एन्टिटी आधीच टेस्टलेस होती, तिला कुठलाही चेहरा नव्हता. आता तर, ती आणखी अस्तित्वहीन झालेली आहे.

म्हणजे? ‘आसक्त’नं कोविडकाळात ‘द व्हाईट बुक’ या हँग कँग नावाच्या बुकर पुरस्कार विजेत्या कोरियन लेखिकेच्या पुस्तकावर बेतलेलं ‘कलर ऑफ लॉस’ नावाचं नाटक बसवलं. आधी मी ऑनलाईन नाटकाबद्दल साशंक होतो, पण, करून बघितल्याशिवाय नकारात्मक बोलण्याचा  हक्क नाही. म्हणून आम्ही तंत्र नीट समजून घेत त्यातल्या शक्यता आजमावल्या. डिजिटल नाटक म्हणजे नाट्य शूट करून दाखवणं नव्हे. तसं केलं तर, ते सपाट होऊ शकतं हे कळलं. या माध्यमातही हळूहळू नाटक उभं राहातंय हे कळलं. मृत्यू, हरवलेपण या गोष्टींबद्दल चर्चा करणारं ते अतिशय त्रास देणारं नाटक आहे. जपान, आफ्रिका, अमेरिका व कुठूनकुठून या नाटकाला तिकीट काढून प्रेक्षक उपस्थित होते. प्रयोगाला प्रतिसाद मिळाला. मात्र त्यात एकही ‘नाटकवेडा’ मराठी माणूस नव्हता.

पण, लोकांवर मनोरंजनाची चढलेली धुंदी... त्याचं काय होणार? ‘लोकांनी कोविडकाळात खूप गमावलं आहे, समोर शून्य वाढून ठेवलेलं आहे असं वाटावं इतका दबाव आहे. त्यामुळं प्रेक्षक जर, येणार असतील तर, त्यांनी गंभीर काही का बघावं?, त्यांना हसवायला हवं.’ - असा एक मतप्रवाह आहे. म्हणजे गंभीर दाखवण्यानं लोक आरसा बघितल्यासारखं बघणार आहेत का?, असं का बघतील लोक?, आणि बघितलं तर, का बघू नये?, विश्वयुद्धानंतर पोलंडसारख्या व अन्य युरोपियन देशांतही जिथं सगळं काही जमीनदोस्त झालं तिथंही सर्वात चांगलं साहित्य, संगीत, सिनेमे त्या काळात व त्या पश्चात बाहेर येताना घडले आहेत. सार्त्र, काम्यू, ब्रेख्त, बेकेट अशासारख्यांना युद्धानंतर झालेल्या तीव्र नैराश्याच्या काळात व्यक्त होण्याची, विचार करण्याची नवी वाट सापडलेली आहे. ज्या लोकांना भविष्याबद्दल कसलीच आशा उरलेली नव्हती त्या समुदायानं प्रतिसादाचे मार्ग शोधले आहेत. त्यामुळं कोविडच्या झळांनंतर आता प्रेक्षकांना स्वस्त मनोरंजन हवं हा मूर्ख युक्तिवाद आहे. मान्य की, सगळ्याच कलांचं मूलभूत उद्दिष्ट प्रेक्षकांचं मनोरंजन करणं आहे. पण, त्याहीपेक्षा त्यांच्या जगण्याबद्दल प्रश्न विचारावेत, काही गोष्टी जाणवून द्याव्यात हे ही कलेचं काम आहे. या दोन वर्षात जे गमावलं, हातून निसटलं त्यामधून अशी एखादी ताकदीची गोष्ट बघणं ज्यातून वेगळ्या ऊर्मी कळतील, ते मनोरंजनच नव्हे का?, मनोरंजन म्हणजे निव्वळ हसणं नव्हे. नाटक ही अभिजात कला नाही. सगळ्या कलांना जरूरीनुसार पोटात सामावून घेऊन नाटकाचा प्रयोग घडतो. त्यामुळे विशिष्ट परिभाषा नसणारं नाटक सतत बदलतं राहाण्याची ताकद ठेवतं. जेवणात जसं आंबट, तिखट, तुरट, गोड सगळं आपल्याला रूचतं, त्यातले देशी-परदेशी बदल आपण काळाच्या ओघात स्वीकारले तसंच मनाचा परिपोष करणाऱ्या नाटकाचीही परिमाणं व बदलत्या संहिता समजून घ्याव्या लागणार. त्यातून आपल्या मनाला सत्त्व मिळेल. नव्या व अवघड चवी मान्य करणं कठीण असतं, पण, इतिहासाचं ओझं बाळगलं नाही व तोच कुरवाळत बसलो नाही तर, दिशा शोधता येतात! 

(मुलाखत : सोनाली नवांगुळ)

टॅग्स :Natakनाटक