शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अधिवेशनादरम्यान एक दिवस स्फोट, गौप्यस्फोटासाठी?; जनतेला सत्याचा साक्षात्कार होईल

By अतुल कुलकर्णी | Updated: December 3, 2023 07:19 IST

सध्या दिवस उजाडला की संजय राऊत, नीलेश राणे, नितेश राणे, किरीट सोमय्या असे अनेक नेते माध्यमांना वेगवेगळ्या विषयांचा रतीब घालायला निघतात.

सर्व लोकप्रतिनिधींचे स्वागत..

विदर्भाच्या राजधानीत, नागपूर शहरात हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आपण सगळे जात आहात. अधिवेशनाचा कालावधी ओढून ताणून दहा दिवसांचा आहे. या काळात आरोप-प्रत्यारोप, गदारोळ, गोंधळ या अशा आयुधांचा वापर करून आपण हे सगळे दहा दिवस सार्थकी लावाल, याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. परवा अजितदादा मन मोकळे करून बोलले. अनेक गोष्टींचा स्फोट त्यांनी प्रथमच केला. त्यावर शरद पवार यांनीदेखील योग्य वेळी मला जे बोलायचे ते बोलेन, असे सांगून त्यांच्या बाजूने काय घडले नाही हे अद्याप कळू दिलेले नाही. अधिवेशनात एक दिवस सुटी आहे. त्या दिवशी दोन्ही बाजूंनी नेमके काय घडले हे महाराष्ट्राला सांगण्याचा कार्यक्रम घेता येईल का? ते देखील बघा. तसे झाले तर महाराष्ट्रातल्या जनतेला सत्याचा साक्षात्कार होईल.

भाजपसोबत सत्तेत सहभागी होताना झालेल्या बैठकांमध्ये शरद पवार होते. तुम्ही सरकारमध्ये जा, असे त्यांनीच सांगितले, असे अजित पवार यांनी सांगितले. मात्र, त्यांचेच मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी पक्षाचे एक सहकारी हसन मुश्रीफ यांनी मात्र वेगळेच मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या मते शरद पवार त्या बैठकीला होते; पण भाजपसोबत जावे अशी त्यांची भूमिका नव्हती, असे हसन मुश्रीफ यांचे मत आहे. त्यामुळे नेमके खरे कोणाचे मानायचे हा संभ्रम अजून संपलेला नाही.

यानिमित्ताने वेगवेगळ्या संभाव्य पुस्तकांविषयी देखील महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे. पुस्तक लिहून अनेक गोष्टी आपण उघड करणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. त्यावर शरद पवार यांनी ‘पक्ष सोडून कसे जातात’ यावर पुस्तक लिहावे, असा सल्ला दिला आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ या नेत्यांनी वेगवेगळी पुस्तके लिहावीत. त्यानिमित्ताने राजकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी चांगले विषय मिळतील. फक्त ही पुस्तके वाचल्यानंतर त्यांची पीएच.डी. निश्चित कालावधीत पूर्ण होईल, याची काळजी घेऊन सत्य घटना लिहाव्यात. नाहीतर पुस्तकांमधील घटनांचा क्रम लावता लावता पीएच.डी. करणाऱ्याचे आयुष्य जायचे... 

काँग्रेस पक्षाचे वेगळेच सुरू आहे. त्यांचे नेते माध्यमांशी कसे आणि किती वेळ बोलायचे याचा अभ्यास करण्यात व्यस्त आहेत. ग्राउंडवर जाऊन काम करावे लागते, लोकांना भेटावे लागते, त्यांचे प्रश्न ऐकून घ्यावे लागतात, या गोष्टींची आता फारशी गरज आहे असे त्यांना वाटेनासे झाले आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या विषयीची सहानुभूती अजूनही कायम आहे, या भ्रमात आहेत. ओबीसींची मते आपल्यालाच मिळाली पाहिजेत या नियोजनात भाजपचे काही नेते गुंतले आहेत. अशा विषयांच्या भाऊगर्दीत अधिवेशनात असे वेगळे काय घडणार? असाही प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. 

आपण सगळे नागपूरला जात आहात. छान गुलाबी थंडी आहे. आपण नागपुरी खाद्य यात्रेचा आस्वाद घ्या. होता होईल तेवढे एकमेकांविषयीचे गौप्यस्फोट करत रहा. लोकांना ते आवडतात. आरोप प्रत्यारोपांमुळे कार्यकर्त्यांमध्येही जान येते. त्यांना गावागावांत भांडायला, बोलायला मुद्दे मिळतात. उगाच दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले वाटोळे, अवयव विकायला मुंबईत आलेले शेतकरी, महागाई, बेरोजगारी अशा विषयांमध्ये फार गुंतून पडू नका. हे विषय निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये कामाला येतील. 

सध्या दिवस उजाडला की संजय राऊत, नीलेश राणे, नितेश राणे, किरीट सोमय्या असे अनेक नेते माध्यमांना वेगवेगळ्या विषयांचा रतीब घालायला निघतात. मध्येच ज्येष्ठ नेते स्फोट, गौप्यस्फोटाचे पार्सल पाठवत राहतात. महाराष्ट्रात एकदम छान वातावरण आहे. ते असेच कायम ठेवा. अधिवेशनानंतर आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिले? असा प्रश्न जर आपल्या घरातल्या मुलाबाळांनी, बायकापोरांनी विचारला, तर काय उत्तर द्यायचे ते देखील ठरवून ठेवा. उगाच तिथे खोटे बोलण्याची वेळ येऊ नये...

आपलाच, बाबूराव

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपा