शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

अधिवेशनादरम्यान एक दिवस स्फोट, गौप्यस्फोटासाठी?; जनतेला सत्याचा साक्षात्कार होईल

By अतुल कुलकर्णी | Updated: December 3, 2023 07:19 IST

सध्या दिवस उजाडला की संजय राऊत, नीलेश राणे, नितेश राणे, किरीट सोमय्या असे अनेक नेते माध्यमांना वेगवेगळ्या विषयांचा रतीब घालायला निघतात.

सर्व लोकप्रतिनिधींचे स्वागत..

विदर्भाच्या राजधानीत, नागपूर शहरात हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आपण सगळे जात आहात. अधिवेशनाचा कालावधी ओढून ताणून दहा दिवसांचा आहे. या काळात आरोप-प्रत्यारोप, गदारोळ, गोंधळ या अशा आयुधांचा वापर करून आपण हे सगळे दहा दिवस सार्थकी लावाल, याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. परवा अजितदादा मन मोकळे करून बोलले. अनेक गोष्टींचा स्फोट त्यांनी प्रथमच केला. त्यावर शरद पवार यांनीदेखील योग्य वेळी मला जे बोलायचे ते बोलेन, असे सांगून त्यांच्या बाजूने काय घडले नाही हे अद्याप कळू दिलेले नाही. अधिवेशनात एक दिवस सुटी आहे. त्या दिवशी दोन्ही बाजूंनी नेमके काय घडले हे महाराष्ट्राला सांगण्याचा कार्यक्रम घेता येईल का? ते देखील बघा. तसे झाले तर महाराष्ट्रातल्या जनतेला सत्याचा साक्षात्कार होईल.

भाजपसोबत सत्तेत सहभागी होताना झालेल्या बैठकांमध्ये शरद पवार होते. तुम्ही सरकारमध्ये जा, असे त्यांनीच सांगितले, असे अजित पवार यांनी सांगितले. मात्र, त्यांचेच मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी पक्षाचे एक सहकारी हसन मुश्रीफ यांनी मात्र वेगळेच मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या मते शरद पवार त्या बैठकीला होते; पण भाजपसोबत जावे अशी त्यांची भूमिका नव्हती, असे हसन मुश्रीफ यांचे मत आहे. त्यामुळे नेमके खरे कोणाचे मानायचे हा संभ्रम अजून संपलेला नाही.

यानिमित्ताने वेगवेगळ्या संभाव्य पुस्तकांविषयी देखील महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे. पुस्तक लिहून अनेक गोष्टी आपण उघड करणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. त्यावर शरद पवार यांनी ‘पक्ष सोडून कसे जातात’ यावर पुस्तक लिहावे, असा सल्ला दिला आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ या नेत्यांनी वेगवेगळी पुस्तके लिहावीत. त्यानिमित्ताने राजकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी चांगले विषय मिळतील. फक्त ही पुस्तके वाचल्यानंतर त्यांची पीएच.डी. निश्चित कालावधीत पूर्ण होईल, याची काळजी घेऊन सत्य घटना लिहाव्यात. नाहीतर पुस्तकांमधील घटनांचा क्रम लावता लावता पीएच.डी. करणाऱ्याचे आयुष्य जायचे... 

काँग्रेस पक्षाचे वेगळेच सुरू आहे. त्यांचे नेते माध्यमांशी कसे आणि किती वेळ बोलायचे याचा अभ्यास करण्यात व्यस्त आहेत. ग्राउंडवर जाऊन काम करावे लागते, लोकांना भेटावे लागते, त्यांचे प्रश्न ऐकून घ्यावे लागतात, या गोष्टींची आता फारशी गरज आहे असे त्यांना वाटेनासे झाले आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या विषयीची सहानुभूती अजूनही कायम आहे, या भ्रमात आहेत. ओबीसींची मते आपल्यालाच मिळाली पाहिजेत या नियोजनात भाजपचे काही नेते गुंतले आहेत. अशा विषयांच्या भाऊगर्दीत अधिवेशनात असे वेगळे काय घडणार? असाही प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. 

आपण सगळे नागपूरला जात आहात. छान गुलाबी थंडी आहे. आपण नागपुरी खाद्य यात्रेचा आस्वाद घ्या. होता होईल तेवढे एकमेकांविषयीचे गौप्यस्फोट करत रहा. लोकांना ते आवडतात. आरोप प्रत्यारोपांमुळे कार्यकर्त्यांमध्येही जान येते. त्यांना गावागावांत भांडायला, बोलायला मुद्दे मिळतात. उगाच दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले वाटोळे, अवयव विकायला मुंबईत आलेले शेतकरी, महागाई, बेरोजगारी अशा विषयांमध्ये फार गुंतून पडू नका. हे विषय निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये कामाला येतील. 

सध्या दिवस उजाडला की संजय राऊत, नीलेश राणे, नितेश राणे, किरीट सोमय्या असे अनेक नेते माध्यमांना वेगवेगळ्या विषयांचा रतीब घालायला निघतात. मध्येच ज्येष्ठ नेते स्फोट, गौप्यस्फोटाचे पार्सल पाठवत राहतात. महाराष्ट्रात एकदम छान वातावरण आहे. ते असेच कायम ठेवा. अधिवेशनानंतर आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिले? असा प्रश्न जर आपल्या घरातल्या मुलाबाळांनी, बायकापोरांनी विचारला, तर काय उत्तर द्यायचे ते देखील ठरवून ठेवा. उगाच तिथे खोटे बोलण्याची वेळ येऊ नये...

आपलाच, बाबूराव

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपा