शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘आर-पार’च्या लढाईचा सांगावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:28 IST

एखाद्या विषयात राजकारण येत नाही, तोपर्यंत तो विषय सरकारी यंत्रणांच्या दृष्टीने फारसा गंभीर अगर दखलपात्र ठरत नाही. त्यातही व्यापक समाजहिताच्या दृष्टीने व हक्काच्या लाभासाठी जेव्हा विषयाला राजकीय किनार लाभू पाहते तेव्हा तो तडीस जाण्याबद्दलची अपेक्षाही उंचावून जाते.

- किरण अग्रवालएखाद्या विषयात राजकारण येत नाही, तोपर्यंत तो विषय सरकारी यंत्रणांच्या दृष्टीने फारसा गंभीर अगर दखलपात्र ठरत नाही. त्यातही व्यापक समाजहिताच्या दृष्टीने व हक्काच्या लाभासाठी जेव्हा विषयाला राजकीय किनार लाभू पाहते तेव्हा तो तडीस जाण्याबद्दलची अपेक्षाही उंचावून जाते. ‘नार-पार’ गिरणा नदीजोड प्रकल्पातील गुजरात धार्जिणेपणाबद्दल तेच होऊ घातले आहे. कारण सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या मुद्यावर आता एकवटले आहेत.केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नाने साकारणा-या ‘नार-पार’ नदीजोड प्रकल्पाला प्रादेशिकता, स्थानिक-परकीय व महाराष्ट्र-गुजरातच्या हक्काची किनार लाभली असल्याने तो वादविषय ठरला आहे. मागे दिल्लीतील एका कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील अशा ३० प्रकल्पांची घोषणा केली होती, तेव्हाच ‘नार-पार’चा विषय उपस्थित होऊन गेला होता. परंतु अपवाद वगळता त्या विरोधाला राजकीय पाठबळ लाभू शकले नव्हते.या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राखेरीज गुजरातला वळविल्या जाणाºया पाण्याबाबत नाशिक, खान्देशसह नगर व औरंगाबादेतील पाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम करणाºया संस्था व व्यक्तींनी नाशकात एकत्र येत जलपरिषदही घेतली होती. परंतु गुजरातमुळे केंद्राचे स्वारस्य त्यात दडलेले असल्याने त्या विषयाला फारशी चालना मिळू शकलेली नव्हती. एकूणच हा निर्णय भाजपाचा असल्याकारणाने या लाभक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे जिल्ह्यातील पक्षाचे नेते तोंडावर बोट व हाताची घडी घालूनच होते. अन्य पक्षीयांनीही सदरचा विषय तितकासा गांभीर्याने घेतलेला दिसून आला नाही. त्यामुळे प्रबळ जनमत उभे राहू शकले नव्हते, जे प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी गरजेचे असते.विशेष म्हणजे, राज्यमंत्री दादा भुसे यांनी पाचारण केलेल्या यासंबंधीच्या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावून आपण स्थानिकांच्या भावनांसोबत असल्याचे स्पष्टपणे सांगितले. शिवसेना, माकपा व राष्ट्रवादीसोबत भाजपाच्या खासदार, आमदारांनीही पाणीवाटपाचा फेरआढावा घेण्याची मागणी केलीच; शिवाय राज्याचे जलसंधारणमंत्री व मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. यातील दखल घेण्यासारखी बाब म्हणजे, नार-पारच्या उगम क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण व माकपाचे आमदार जे. पी. गावित यांच्यात राजकीय सख्य नसल्याचे सर्वजण जाणून आहेत. परंतु पारंपरिक राजकारण बाजूला ठेवून हे दोन्ही लोकप्रतिनिधी एकवटले.‘नार-पार’साठी नवीन अहवालाऐवजी, सन २०११ मध्ये तयार केला गेलेला प्रकल्प अहवाल प्रमाण मानून नदीजोड योजना राबवावी, यावर या बैठकीत एकमत झाले. यामुळे त्रुटीच्या गिरणा खोºयात व जळगावसह औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावपर्यंत पाणी देता येणार आहे.नवीन प्रकल्पात सुमारे ४०० पेक्षा अधिक दशलक्ष घनमीटर पाणी गुजरातमध्ये वळविण्याचे प्रस्तावित असले तरी, त्या बदल्यात उकई धरणातून दिल्या जाणाºया पाण्याची स्पष्टता नाही. परिणामी, गुजरातकडे जाऊ पाहणारे पाणी रोखण्याचा अजेंडा या बैठकीतून समोर येऊन गेला आहे. तोच ‘आर-पार’च्या लढाईचा सांगावा देणारा आहे.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी