शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

स्वच्छ भारत मोहिमेचा गोव्यात फज्जा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 09:46 IST

गोव्यातील खेडेगावांना स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत हागणदारीमुक्ती लाभावी म्हणून राज्य सरकारचे प्रयत्न अजूनपर्यंत तोकडे पडले असतानाच आता जैविक स्वच्छतागृहांचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.

राजू नायक 

पणजी - जैविक स्वच्छतागृहे सुरक्षित असल्याचा निर्वाळा देश विदेशातील तज्ज्ञ देत असले तरी भारतातील खेडेगावांमध्ये ती चालू शकतील काय याबद्दल नागरिकांमध्ये शंका आहे. 

गोव्यातील खेडेगावांना स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत हागणदारीमुक्ती लाभावी म्हणून राज्य सरकारचे प्रयत्न अजूनपर्यंत तोकडे पडले असतानाच आता जैविक स्वच्छतागृहांचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. त्यांचा दरही कमी करून नागरिकांना परवडेल अशा दरात ते दिले जाणार आहेत. परंतु राज्यातील अधिकाऱ्यांना त्याचे अद्याप प्रशिक्षण दिले नाही की त्यासाठी घरोघरी जाऊन जनजागृतीही करण्यासाठी पावले उचलली नाहीत. 

दोन ऑक्टोबरपर्यंत गोव्यात ६० हजार जैविक स्वच्छतागृहांची उभारणी करण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. परंतु त्यासाठी अजून कंत्राटदार निश्चित केलेला नसून ही जैविक स्वच्छतागृहे गोव्यात चालू शकणार काय, याचाही अभ्यास सरकारने केलेला नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मानवी मैला खाऊन टाकणारे जीवाणू ठरावीक प्रमाणात अशा स्वच्छतागृहांमध्ये ठेवले जातात. परंतु यांचे जतन करण्याचे काम ही स्वच्छतागृहे वापरणाऱ्याला करायचे असते. म्हणजे रसायनांचा किंवा साबणाचाही वापर जिवाणूंचा नाश करू शकतो. शिवाय बराच अवधी स्वच्छतागृहे बंदही ठेवता येत नाहीत. 

नागरिकांना ही स्वच्छतागृहे देऊनही भागणार नसून त्यांना ती वापरण्याचे प्रशिक्षण देणे व त्यांच्या सतत संपर्कात राहणे ही कामे सरकारला करावी लागतील. परंतु सध्या तरी सरकारी पातळीवर याबाबतीत अनास्था दिसून येते. राज्यातील बरेच जलस्रोत प्रदूषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर कमी पाणी वापरणारे व मलकुंड नसलेली स्वच्छतागृहे वापरण्याची गरज येथे निर्माण झाली आहे. 

इतर राज्ये जेव्हा स्वच्छतागृहे उभारण्याबाबत खूपच क्रियाशील भूमिका निभावत असता भाजपाचेच राज्य असलेल्या गोव्यात असलेली अनास्था मात्र नजरेत भरते. गोव्याने स्वच्छागृहांचे स्पेसिफिकेशन तीन महिन्यांत सात वेळा बदलले असून आताही या जैविक स्वच्छतागृहांची बाह्य रचना प्लास्टिकची नसावी असे मत पुढे आले आहे. 

एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात ही स्वच्छतागृहे आणण्यासाठी एक राजकीय लॉबी वावरत असून त्यांना खर्चिक व कार्यवाहीत आणण्यास कठीण असलेली ही व्यवस्था गोव्याच्या माथी मारायची आहे. हागणदारीमुक्ती अशा पद्धतीने धरसोड भूमिका घेऊन येणार नाही. त्यासाठी सरकारी पातळीवरही तळमळ व जिगर हवी आहे. गोव्यात एका कंत्राटदाराकडून महिनाकाठी केवळ एक हजार जैविक स्वच्छतागृहे उभारली जाऊ शकत असल्याने पुढच्या सात महिन्यात ६० हजारांचे उद्दिष्ट कसे काय साध्य केले जाऊ शकेल, याबद्दलही प्रश्नचिन्ह आहे. 

अनागोंदी कारभार

गोवा हाणगदारीमुक्त करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत अजूनपर्यंत राज्यात एकही स्वच्छतागृह उभारलेले नाही. कंत्राटदार निश्चिती नाही आणि त्यांना कामाला सुरुवातही करता आलेली नाही. दुसऱ्या बाजूला गोव्याने २२ गावे हागणदारीमुक्त असल्याचे जाहीर करण्याचा फार्स केला असून स्वच्छतागृहे न बांधता हा विक्रम कसा केला असा प्रश्न विचारला जातो. दुसऱ्या बाजूला ‘निर्मल भारत’ योजना जी चार वर्षापूर्वी बंद झाली, त्याच अंतर्गत फोंडा तालुक्यात अनेक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधली जात असल्याची माहिती मिळते. भाजपाच्याच एका राज्यात केंद्राची योजना राबविण्यात एवढी अनागोंदी कशी, असा प्रश्न नागरिकांना पडेल, परंतु त्यात तथ्य आहे. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानgoaगोवा