शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
2
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
3
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
4
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
5
Stock Markets News: फार्मावर १००% टॅरिफ, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी २४,८०० च्या खाली, फार्मा शेअर्स आपटले
6
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
7
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
8
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
9
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
10
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
11
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
12
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
13
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
14
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
15
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
16
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
17
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
18
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
19
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
20
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश

...सुशांतसिंह अनैसर्गिक मृत्यू प्रकरणाला आता तरी न्याय मिळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 06:58 IST

सुशांत प्रकरणात मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांच्यावर ऊठसूट टीका करणारी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील मंडळी तेव्हा सीबीआयवर अशी तुटून पडली नाहीत की जिया खान प्रकरण बॉलिवूड मंडळींनी असे लावून धरल्याचे दिसले नाही.

सीबीआयकडून या प्रकरणात न्याय मिळायला हवा. मात्र, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा तसेच अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येचा छडा सात वर्षे होऊनही सीबीआयला अद्याप लावता आलेला नाही. सुशांत प्रकरणात मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांच्यावर ऊठसूट टीका करणारी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील मंडळी तेव्हा सीबीआयवर अशी तुटून पडली नाहीत की जिया खान प्रकरण बॉलिवूड मंडळींनी असे लावून धरल्याचे दिसले नाही.हिंदी चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या अनैसर्गिक मृत्यू म्हणजेच आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयमार्फत होणार, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या चौकशीची सारी कागदपत्रे मुंबई पोलिसांना सीबीआयकडे सोपवावी लागतील. एवढेच नव्हे, तर या प्रकरणात यापुढे जे काही एफआयआर दाखल होतील, त्यांचाही तपास सीबीआयच करू शकेल. या निर्णयाने मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्काच बसला आहे. या निर्णयाने बिहार पोलीस आणि सरकार आनंद व्यक्त करीत आहेत, तर आता आम्हाला न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया सुशांतच्या कुटुंबीयांनी दिली आहे. मुंबई अन् त्यातच पोलिसांवर सुरुवातीपासून बिहार पोलीस, सरकार आणि सुशांतचे कुटुंबीय अविश्वासच व्यक्त करू लागले. मुंबई पोलीस कोणाला तरी वाचवू पाहात आहेत, असा आरोप सुशांतच्या नातेवाइकांनी चालविला. त्याच्या अनैसर्गिक मृत्यूस त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती जबाबदार आहे आणि तिने त्याचे पैसे हडपले, असा आरोपही त्याच्या कुटुंबीयांनी केला. सीबीआयच्या तपासातून या साऱ्या आरोपांवर प्रकाश पडायला हवा.

मात्र, रियाने पैसे हडपल्याची तक्रार सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या जबानीत न करता पाटणा पोलिसांकडे का केली, असा प्रश्नच आहे. हे खरे असले तरी या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल न केल्यामुळेच तपास सीबीआयकडे जाऊ शकला, हे विसरून चालणार नाही. सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पाटणा पोलिसांनी लगेच तो नोंदविला. गुन्हा एका शहरात आणि एफआयआर दुसºया शहरात या प्रकाराला मुंबई पोलिसांनी आक्षेप घेतला होता आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. उद्या बिहारमधील गुन्ह्याचा एफआयआर मुंबई वा इटानगरमध्ये नोंदवून त्या पोलिसांनी तपास सुरू केला, तर गोंधळच उडेल; पण पाटण्यातील एफआयआर कायद्याला धरून असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले. तसेच मुंबई पोलिसांनी चौकशी करताना अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हाच नोंदविला नाही, याचाही उल्लेख न्यायालयाने केला. याचाच अर्थ एफआयआर न नोंदविण्याची चूक वा निर्णय मुंबई पोलिसांच्या अंगाशी आला. हा तपास सीबीआयद्वारे व्हावा, अशी बिहार सरकारने केलेली शिफारस कायद्याला धरून आहे, असे नमूद करतानाच दोन्ही राज्यांनी एकमेकांवर केलेले पक्षपाताचे आणि राजकीय आरोप तसेच मुंबई पोलिसांकडून तपास नीट होईल का, याविषयी नातेवाइकांनी उपस्थित केलेल्या शंका यामुळे सीबीआय या त्रयस्थ यंत्रणेकडे तपास देण्यास न्यायालयाने संमती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने केवळ मुंबई पोलिसांची नव्हे, तर महाराष्ट्र सरकारचीही अडचण झाली आहे. पोलिसांसाठी तर ही नामुष्कीच आहे.

गुन्हा अन्वेषणात देशात पहिल्या स्थानी असलेल्या पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर का नोंदविला नाही, त्याची नेमकी कारणे काय, या प्रकरणात पोलिसांवर दबाव येत होता काय, हे कळायलाच हवे. कदाचित मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचाही हा प्रयत्न असू शकेल. हल्ली कोणत्याही प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी सर्रास केली जाते; पण सीबीआयकडे जादूची छडी नाही आणि ती यंत्रणाही राज्य पोलिसांच्या मदतीनेच तपास करीत असते. त्याचबरोबर प्रकरण सीबीआयकडे सोपविल्याने लगेच गुन्हेगारांना शिक्षा होईल, अशी स्थिती किंवा खात्री आता राहिलेली नाही. सुशांतसिंह अनैसर्गिक मृत्यू प्रकरणातील सत्य समोर यायला हवे आणि त्यासाठी त्याला कोणीच भाग पाडले असेल, तर त्यांना शिक्षाही व्हायला हवी; पण स्वत:च्या सोयीने आवाज उठविणारे व गप्प बसणारे लोक पाहिले की त्यांच्या हेतूंविषयीही शंका घेतल्या जातात. सुशांतप्रकरणी बिहार सरकार इतके आक्रमक झाले, त्याला यावर्षी तिथे होणाºया विधानसभा निवडणुका हेही एक महत्त्वाचे कारण असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत