शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शेतकऱ्याची मान मुरगाळून ग्राहकाला साखरेचा घास !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 06:05 IST

ऊसकरी शेतकरी हा श्रीमंत, गाड्या उडवणारा असल्याचा समज वस्तुस्थितीला धरून नाही. या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून कसे चालेल ?

-विश्वास पाटील

साखरेचे खाणार त्याला देव देणार, अशी म्हण प्रचलित आहे. परंतु,  एकरकमी वाजवी व किफायतशीर (एफआरपी) किंमत देण्याचा कायदा बदलण्याच्या केंद्र शासनाच्या हालचाली म्हणजे देशभरातील मध्यमवर्गीय ग्राहकाला साखरेचे खायला देणार परंतु त्यासाठी सामान्य शेतकऱ्याची मात्र मान मुरगळणार, अशा स्वरुपाच्या आहेत. त्यावरून महाराष्ट्रात नव्याने संघर्ष सुरु होण्याची चिन्हे आहेत. प्रतिवर्षी एफआरपी किती देणार, यासाठी होणारी आंदोलने यापुढे एफआरपीचे तुकडे पडू देणार नाही, यासाठी करावी लागतील, असे दिसत आहे. कच्च्या मालाचा भाव केंद्र सरकार अगोदर हंगाम सुरु होण्यापूर्वीच निश्चित करणार परंतु पक्क्या मालाला दर किती मिळणार, हे मात्र बाजार ठरवणार, असा उफराटा व्यवहार साखर उद्योगाच्या बाबतीत कित्येक दशके सुरु आहे. त्यात स्वत:ला शेतकऱ्यांचे तारणहार समजणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे कृषिमंत्री असतानाही फरक पडला नाही आणि आताही भाजप सरकारच्या काळात तसाच अनुभव आहे. 

केंद्रीय कृषी मूल्य आयोग प्रतिवर्षी उसाला किती दर द्यावा, याची शिफारस करतो व केंद्र सरकार त्याला मंजुरी देते. ऊस गाळपासाठी गेल्यानंतर ती किंमत १४ दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याचे कायद्याने बंधन आहे. नाही जमा केली तर जेवढे दिवस लांबेल तेवढ्या दिवसाचे व्याज संबंधित कारखान्याने देणे बंधनकारक आहे. परंतु, आजपर्यंत या देशातील एकाही कारखान्याने शेतकऱ्याला असे व्याज दिलेले नाही. कारण  मूळ ऊस बिल देतानाच कारखान्यांना घाम फुटतो. 

महाराष्ट्रात एकूण १९० कारखाने आहेत, त्यापैकी सहकारी व खासगी प्रत्येकी ९५ आहेत. आताच्या हंगामातील या कारखान्यांची १५ एप्रिलअखेर २,०७३ कोटी रुपये एफआरपी देय आहे. त्याचे कारण बाजारातील साखरेचे दर कमी आहेत. साखरेला ३१ रुपये दर मिळाला तर त्यातून शेतकऱ्यांना टनाला एकरकमी ३ हजार रुपये दर देणे कारखान्यांना शक्य होत नाही. भाजपचे सरकार केंद्रात आल्यावर त्यांनी साखर कारखानदारीच्या दृष्टीने अत्यंत चांगला निर्णय घेतला. या सरकारने कारखान्यांकडून किती रुपयांना साखर खरेदी करायची, हे निश्चित करून दिले.  हा दर सुरुवातीला क्विंटलला २,७०० रुपये होता तो आता ३,१०० रुपयांपर्यंत आहे. हा दर ३,८०० रुपये करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाने केली आहे. परंतु, दोन वर्षे हा दर वाढवला जात नाही. 

हा दर वाढवून द्यायला केंद्र सरकार तयार नाही. त्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे साखरेचा खुल्या बाजारातील दर वाढला तर ग्राहकांतून ओरड होते. साखर ही जीवनावश्यक वस्तू नसतानाही ती जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत असल्याने महागाई निर्देशांकामध्ये तिला १९ टक्के अधिभार आहे. त्यामुळे साखर महागली की एकूण महागाई निर्देशांक वधारतो म्हणून केंद्र सरकार साखरेचा दर वाढवायला तयार नाही. बाजारात आज भांडी घासण्याची एक किलो पावडरही ५० रुपयांच्या खाली मिळत नाही. पाच जणांच्या एका कुटुंबाला महिन्याला सरासरी ५ किलो साखर लागते. त्यामुळे किलोला १० रुपये दर वाढला तरी कुटुंबाचा खर्च ५० रुपयांपेक्षा जास्त वाढत नाही. तरीही साखरेचा दर वाढवला जात नाही किंबहुना तो वाढू दिला जात नाही. त्यामागे राजकारण आणि आकसही आहे. 

राजकारण असे की, दरवाढीचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला होतो. कारण देशाच्या एकूण उत्पादनापैकी ३३ टक्के साखर महाराष्ट्र उत्पादित करतो. महाराष्ट्रातील कारखानदारीवर दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे ही कारखानदारी अस्वस्थ ठेवण्यात केंद्र सरकारला धन्यता वाटते. दुसरे असे की, साखर कारखानदारीबद्दल समाजातील मोठ्या वर्गाच्या मनात आकस आहे. ऊसकरी शेतकरी हा श्रीमंत, गाड्या उडवणारा आहेे, असे त्याला वाटते. ते वस्तुस्थितीला धरून नाही. उसामुळे त्याचे अर्थकारण बळकट झाले हे खरे असले तरी कारखान्याला ऊस घालणारा ७० टक्क्यांहून जास्त शेतकरी हा सरासरी ५० टनाच्या आतील आहे. 

सहकाराच्या माध्यमातून एकत्र येऊन त्याने हा प्रक्रिया उद्योग उभा केला आहे. त्यामुळे या उद्योगातील धोरणाचा थेट परिणाम त्याच्या जीवन-मरणावर होतो. त्यामुळेच आता एफआरपी एकरकमी देण्याऐवजी कारखान्यांनी पैसे उपलब्ध होतील, तशी टप्प्याटप्याने द्यायची ही नीती आयोगाची शिफारस ऊसकरी शेतकऱ्यांच्या मुळावर येणारी आहे. गेली दोन दशके या शेतकऱ्यांनी संघर्ष करून जे मिळवले, ते पुन्हा काढून घेण्याचा डाव यामागे आहे. महाराष्ट्रातील बहाद्दर शेतकरी तो यशस्वी होऊ देणार नाही.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र