शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

विद्यार्थी वाहतुकीची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 02:37 IST

मुंबई उच्च न्यायालयात पीटीए फोरम (पॅरेंट-टीचर्स असोसिएशन फोरम) यांनी दाखल केलेली जनहित याचिका नुकतीच उच्च न्यायालयात सुनावणीस आली होती.

- डॉ. खुशालचंद बाहेती (निवृत्त सहायक पोलीस आयुक्त)

स्कूल बस आणि विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात पुरेशा तरतुदी आहेत. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयांनीही यात अनेक आदेश दिले आहेत. मात्र या आदेशांची पूर्तता होते किंवा नाही हे मात्र गांभीर्याने पाहिले जात नाही. सरकारी यंत्रणा नियमभंग करणाऱ्या स्कूल बसविरुद्ध विशेष मोहीम राबविल्याचे दावे करतात आणि किती चालान फाडले याचे आकडे दाखवतात. मात्र, ही कारवाई परिणामकारक ठरत नाही. सातारा (औरंगाबाद) येथे स्कूल बसचालक व त्याच्या २ साथीदारांनी अल्पवयीन मुलीची छेडछाड करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. असे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत.मुंबई उच्च न्यायालयात पीटीए फोरम (पॅरेंट-टीचर्स असोसिएशन फोरम) यांनी दाखल केलेली जनहित याचिका नुकतीच उच्च न्यायालयात सुनावणीस आली होती. या याचिकेत सरकारने २०१६च्या केंद्रीय मोटार वाहन कायद्यात १३ व्यक्तींपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांनाच स्कूल बसचा परवाना मिळू शकेल, अशी तरतूद असतानाही राज्य सरकार रिक्षांना व १२ व्यक्तींपेक्षा कमी आसनी वाहनांना स्कूल बसचे परवाने देत असल्याचे न्यायालयास सांगण्यात आले. याबद्दल न्यायालयाने विचारणा केली असता सरकारने २०११च्या महाराष्ट्र मोटार वाहन नियमांचा आधार दाखविला. यापूर्वी न्यायालयानेही रिक्षातून विद्यार्थी वाहतुकीविरुद्ध आदेश दिले होते. मात्र शासनाने सोयीचे ‘अर्थ’ लावून परवाने दिले.

उच्च न्यायालयाने वाहनचालकांचे हित पाहू नका, मुले ही देशाची संपत्ती आहे, या शब्दात फटकारले. केंद्राचा कायदा हा राज्यांपेक्षा श्रेष्ठ असतो व २०११च्या तरतुदीपेक्षा २०१६च्या तरतुदींची अंमलबजावणी कायदेशीर असते हे कायद्याचे साधे तत्त्वही उच्च न्यायालयाला समजावून सांगावे लागले. सरकारच्या अशा धोरणांमुळेच गावोगाव खचाखच विद्यार्थी भरून नेणाºया रिक्षा व व्हॅन्स भररस्त्यांवरून धावतात व त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास परिवहन व पोलीस विभाग अयशस्वी ठरतो. अर्थात याला पालकही तितकेच जबाबदार आहेत.उच्च न्यायालयाने जनहित याचिकेत नियमभंग करणाºया स्कूल बसविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश यापूर्वी दिले होते. याप्रमाणे कारवाई करण्यात आल्याचे सरकारने न्यायालयात सांगितले. विशेष मोहिमेत १७ हजार ५०० चालान देऊन ३६ लाख रुपये दंड गोळा केल्याचेही सांगितले. यात सर्वाधिक ७ हजार ३०० खटले नो-पार्किंगचे व २ हजार ४६६ खटले वाहतुकीस अडथळा आणल्याचे होते. सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालय या कारवाईमुळे प्रभावी झाल्याचे दिसले नाही. इतकेच नव्हे तर विशेष मोहिमेचा उल्लेख करताच कोणी कायद्याचा भंग करीत असेल तर कारवाई करून तुम्ही सर्वांना उपकृत करीत आहात काय, असा सवाल केला. कारवाई करणे तुमचे कर्तव्यच आहे, अशी जाणीव करून दिली, यापुढेही कारवाई चालूच राहील, अशी अपेक्षाही व्यक्त केली.स्कूल बसचा रंग कसा असावा, आपत्कालीन खिडक्या कशा असाव्यात येथपासून ते दप्तर ठेवण्यास जागा कशी असावी, वेग नियंत्रक यंत्र असावे, बसची पायरी कशी असावी व बसमध्ये किती विद्यार्थी घेता येतील याच्या सविस्तर तरतुदी कायद्यात आहेत. जीपीएस, सीसीटीव्हीबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशही आहेत. सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आकडेवारीत धोकादायक पद्धतीने स्कूल बस चालविल्याबद्दल ४६ व विनालायसन्ससाठी ११६ जणांकडून दंड वसूल करण्यात आला. मात्र यानंतरही ते पुन्हा बसवर आहेत काय हे पाहण्याची जबाबदारी कोण घेणार? बसमध्ये अटेंडंट असण्याची तरतूद आहे. चालकाने संगीत वाजवूनये, अनावश्यक बोेलू नये, धूम्रपान करू नये, अशीही तरतूद आहे. बसमध्ये घडणारी प्रत्येक नियमबाह्य घटना पालकांनी शिक्षकांना कळवावी, असेही नियम आहेत. अशा अनुचित घटना करणाºया तसेच सुरक्षा यंत्रणा न बसविणाºया किंवा त्यात फेरफार करणाºया स्कूल बसचालक व मालकांविरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंदविता येतो, पण तसे होताना दिसत नाही.राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी प्राचार्यांची असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०१२ साली दिलेल्या निर्देशात विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षकांनी स्कूल बसमध्ये प्रवास करून सुरक्षिततेच्या नियमांची अंमलबजावणी होते काय हे पाहावे, असेही म्हटले आहे. तरीही पालक अभावानेच असा प्रवास करून सुरक्षित वाहतुकीची खात्री करून घेतात. पालक व शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

 

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण