शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

मराठवाड्यात नेत्यांना धक्के

By सुधीर महाजन | Published: October 11, 2017 1:06 AM

पाण्यात उभी म्हैस पंचवीस शेर दूध देते. ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाची हीच गत आहे. भाजपपासून शिवसेनेपर्यंत सगळेच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती आमच्या ताब्यात असा दावा करतात.

पाण्यात उभी म्हैस पंचवीस शेर दूध देते. ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाची हीच गत आहे. भाजपपासून शिवसेनेपर्यंत सगळेच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती आमच्या ताब्यात असा दावा करतात. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपच्या दाव्याकडे गंभीरपणे पाहिले तर त्यांनी गावपातळीवर सत्तेत शिरकाव करणे साहजिक आहे; पण या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नसल्याने कोणत्या पक्षाच्या ताब्यात किती ग्रामपंचायती असे स्पष्ट चित्र नाही. मराठवाड्यात हीच परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद वगळता सात जिल्ह्यातील १७७३ ग्रामपंचायतींचे निकाल लागले. उस्मानाबादेतील १६५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका दुसºया टप्प्यात आहेत. दावे प्रतिदावे काहीही असले तरी प्रमुख नेत्यांच्या बाबतीत धक्का देणाºया गोष्टी घडल्या.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जवखेडा हे भोकरदन तालुक्यातील गाव ते भाजपकडे असणे साहजिक आहे पण येथे भाजपचीच तीन पॅनल्स एकमेकांच्या विरोधात लढत होती. कोणतेही जिंकले तरी ते दानवेंचेच असणार. अशा अडचणीच्या वेळी नेते मंडळी सर्वांनाच आशीर्वाद देतात. बीडमध्ये भाऊबंदकी जोरावर आहे. मुंडे-क्षीरसागर दोघेही त्रस्त आहेत. मुंडे भावंडामध्ये येथेही वरचढ ठरले. गोपीनाथगड असलेली पांगरीची ग्रामपंचायत त्यांच्या समर्थकांनी जिंकली. तर आमदार जयदत्त क्षीरसागर यांची नवगण राजुरी येथील ग्रामपंचायत पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी पळविली.लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना त्यांच्या तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायती ताब्यात घेता आल्या नाहीत. येथे काँग्रेस वरचढ ठरली. दापका, अंबुलगा या ग्रामपंचायती त्यांच्या हातून निसटल्या. परभणीत तर ग्रामपंचायतींचा कौल सत्ताधाºयांच्या विरोधात गेला. माजी खासदार गणेश दूधगावकर यांना दूधगावातील ग्रामपंचायत गमवावी लागली आणि पुतण्या दिलीप हा पराभूत झाला. नांदेडमध्ये शिवसेनेचा जोर कायम होता. तर हिंगोलीत काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली. औरंगाबादमध्ये भाजप-शिवसेना या दोन पक्षांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे जनतेतून थेट निवडून येणारा सरपंच त्यामुळे त्याला अधिकारही जास्त. दीड वर्षांनंतर होणाºया लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने गावपातळीवरील ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची ठरते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भाजपला आपले बस्तान बसवता आले नाही; पण आता उद्या होणाºया महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोर लावला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना धक्का देण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकर तळ ठोकून आहेत. दोघांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. नांदेड जिल्ह्यात भाजप अजून स्थिर होऊ शकलेला नाही. तेथे काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रभाव असल्याने महापालिका निवडणुकीसाठी भाजपने येथे शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना गळास लावले. चिखलीकरांनी आपले साथीदार भाजपमध्ये पाठविले. आणि उघडपणे भाजपचा प्रचार केला. किंबहुना या निवडणुकीचे नेतृत्व केले; पण ग्रामपंचायत निवडणुकीत लाभ भाजपला मिळाला नाही. उद्या होणाºया महापालिका निवडणुकीत त्यांची भाजपसाठीची उपयुक्तता स्पष्ट होईल. शिवाय या निकालाचे दूरगामी परिणाम मराठवाड्याच्या राजकारणावर होतील. sudhir.mahajan@lokmat.com  

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत