शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

एकारणारे संस्कार थांबवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 12:15 AM

ज्या वयात धार्मिक व सामाजिक सलोख्याचा व एकोप्याचा संस्कार घडवायचा त्या वयात मुला-मुलींवर आपापले धर्म व सामाजिक प्रथांचे वेगवेगळे संस्कार लादण्याचा उद्योग समाजात ऐक्य निर्माण करील की दुरावा?

ज्या वयात धार्मिक व सामाजिक सलोख्याचा व एकोप्याचा संस्कार घडवायचा त्या वयात मुला-मुलींवर आपापले धर्म व सामाजिक प्रथांचे वेगवेगळे संस्कार लादण्याचा उद्योग समाजात ऐक्य निर्माण करील की दुरावा? राज्यातील शाळांमधून भगवद्गीतेचे वाटप करण्याचा काही संस्थांनी सरकारच्या मदतीने चालविलेला प्रयत्न अशा प्रश्नांना जाग आणणारा आहे. गीता हा हिंदूधर्माचा पवित्र ग्रंथ आहे आणि त्यावर गेल्या अनेक शतकांच्या ज्ञानाच्या परंपरा विकसित झाल्या आहेत. या ग्रंथाविषयी हिंदू मुला-मुलींना प्रेम, भक्ती व आपलेपणा वाटावा ही गोष्टही स्वाभाविक आहे. मात्र धार्मिक शिक्षण न देण्याच्या आपल्या घटनेच्या धर्मनिरपेक्ष संकेतांशी हा प्रकार जुळणारा नाही. सरकारी शाळांमधून धर्म शिकविला जाणार नाही आणि सरकारच्या मदतीने चालणाऱ्या शाळांमध्ये त्याविषयीची सक्ती केली जाणार नाही असे वचन घटनेतील धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराने जनतेला दिले आहे. या स्थितीत सरकारच एका, तो मग बहुसंख्याकांचा धर्म का असेना, धर्माच्या ग्रंथाचे वाटप विद्यार्थ्यांत करीत असेल तर तो प्रकार घटनाविरोधी व स्वातंत्र्याच्या अधिकाराला बाधा पोहचविणारा ठरेल की नाही? त्याहून महत्त्वाचा प्रश्न हा की उद्या एखाद्या मुस्लीम संघटनेने किंवा काश्मीरच्या प्रशासनाने आपल्या शाळांमधून पवित्र कुराणाच्या प्रतींचे असे वाटप केलेले सरकारला चालेल काय? अरुणाचल, मेघालय, नागालॅण्ड, मणिपूर व त्रिपुरा ही ख्रिश्चनबहुल राज्ये आहेत. त्यातील शाळांमधून उद्या बायबलचे असे वाटप झाले तर सरकार काय करील? हा निर्णय केंद्राचा की महाराष्ट्राचा? तो जर केंद्राचा असेल तर त्याचा अंमल मणिपूर व नागालॅन्डमधील सरकारांनाही करावा लागेल व तेथील राज्ये ते करणारच नाहीत याची खात्री कोण देईल? प्रत्यक्ष महाराष्ट्रात मुस्लीम धर्माच्या संस्थांनी शाळा व कॉलेजेस काढली आहेत. त्यात कुराणाचे वाटप झालेले महाराष्ट्र सरकारला चालेल काय? जगातील अनेक प्रगत देशांनी त्यांच्या शिक्षण संस्था भारतात आणायला सुरुवात केली आहे. त्या संस्थांनी बायबल, तोराह किंवा कुराण यांचे वाटप केले तर ते भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशाला चालेल काय? सरकारमार्फत अशा ग्रंथांचे वाटप होत नाही असे याबाबत सांगितले जात असले तरी त्या या वाटपाला सरकारची परवानगी आहे की नाही? हे ग्रंथ संस्थांच्या संचालकांकडे दिले जातात व त्यांनीच त्याचे योग्य ते वाटप करून त्याविषयीचा अहवाल सादर करावा ही बाबही सरकारी सहभाग दाखविणारी आहे की नाही? प्रश्न गीतेचा आहे म्हणून याची चर्चा नाही व कदाचित पुढेही ती होणार नाही. मात्र ही सुरुवात बायबल व कुराणापासून झाली असती तर आपल्यातल्या बहुबोल्या व भांडखोर संघटना गप्प राहिल्या असत्या काय? आपल्यातील हवे ते चालू द्या. त्यावर कुणी आक्षेप घेत नाही तोवर गप्प बसा आणि उद्या कुणी याविषयी बोलू लागले तर आम्ही आहोतच हा अशा संघटनांचा पवित्रा आता साºयांच्या परिचयाचा झाला आहे. त्यामुळे असे प्रयत्न मुळातच थांबविले पाहिजेत. ते सरकारनेच थांबविले पाहिजे. एखादी बाहेरची संस्था सरकारी वा निमसरकारी संस्थांमध्ये येऊन आज अशी पुस्तके वा ग्रंथ वितरित करू लागली तर ती उद्या प्रचारी साहित्याचे वाटपही करील की नाही? ज्या वयात मुलांवर सर्वसमावेशकतेचा व राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार करायचा त्या काळात एका धर्माचा, पंथाचा वा विचाराचा प्रचार त्यांच्यात करणे ही बाब एकात्मतेला बाधा आणणारी आहे. गीता आहे म्हणून तिला कदाचित कुणी विरोध करणार नाही. कारण मग अशा विरोधकांना धर्मविरोधी ठरविता येईल हा राजकीय फायदाही अशा प्रयत्नांमागे नसेलच असे कोण खात्रीने सांगू शकेल? तात्पर्य, हा विस्तवाशी खेळ आहे. तो कोण सुरू करतो व त्याकडे कोण दुर्लक्ष करतो त्या साºयांना याबाबतचा जाब सरकारने व सर्व संबंधित जबाबदार व्यवस्थांनी मागितला पाहिजे. ही सुरुवात आहे. ती येथेच थांबली पाहिजे. अन्यथा अशा व्यवहारांचा काळ सोकावत जातो व तो देशव्यापी होतो. तसे होणे या देशाच्या ऐक्याला घातक आहे हे येथे लक्षात घ्यायचे.