शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

झिरपली वरची सत्ता; जिल्हा बँकांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

By सुधीर महाजन | Updated: March 24, 2021 08:32 IST

बागडे पराभूत; पण पॅनल विजयी; बाबाजानींची खेळी चुकली, पंकजाचा रडीचा डाव : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड आणि परभणी या तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले. औरंगाबादेत हरिभाऊ बागडेंचा पराभव हा महाविकास आघाडीकडे बँक जाण्याचा मार्ग बनला. बीडमध्ये पंकजा मुंडेंनी शर्यत अर्ध्यावर सोडली.

झिरपणे हा जसा पाण्याचा, विचारांचा गुणधर्म, तसा तो सत्तेचाही असतो. सत्ताही झिरपते तशी ती खालून वर अशी शिडीदेखील चढते, तर यावेळी मराठवाड्यातील तीन जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकीत ती झिरपली. जे मुंबईमध्ये तेच या तिन्ही ठिकाणी घडले. फरक इतकाच की या तिन्ही बँकांच्या निवडणुकांचा बाज वेगळा असला तरी सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली.

भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा पराभव ही औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. विशेष म्हणजे शिवसेना- राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पॅनलप्रमुख बागडे होते. या दोन्ही पक्षांचे संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे मंत्री आणि सतीश चव्हाण आणि अंबादास दानवे हे दोन आमदार निवडून आले; परंतु पॅनलचे नेतृत्व करणारे हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाला. पॅनलचा विजय अपेक्षित असला तरी बागडेंचा पराभव अनपेक्षित आहे. त्यामुळे एका अर्थाने बँकांवर सेनेचे वर्चस्व असल्याचे म्हणावे लागेल. बागडेंच्या पराभवामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात अब्दुल सत्तार व्यापणार, हे स्पष्टच आहे. सतीश चव्हाण यांना या राजकारणात स्वारस्य नाही आणि अंबादास दानवे पुढील लोकसभा निवडणुकीवर नजर ठेवत येथे खेळी खेळणार. संदीपान भुमरे यांचे व्यक्तिमत्त्व संयत राजकारणाचे राहिलेले असल्याने अप्रत्यक्षपणे बँकेचा रिमोट सत्तार यांच्या हाती पडण्याची शक्यता आहे.

सगळे निवडून येताना फक्त बागडेंचाच पराभव का होतो, हा कळीचा प्रश्न; पण त्यावर कोणी बोलायला तयार नाही. बँक आणि जिल्ह्याच्या राजकारणात बागडे हे वजनदार समजले जातात. ते निवडून आले असते, तर नियंत्रण आपसूक त्यांच्याकडेच राहणार होते. कारण सुरेश पाटलांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव नितीन पाटील यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आणि निवडणुकीपूर्वीच नितीन यांनाच भावी अध्यक्ष म्हणून घोषित करणारे बागडेच होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना पॅनलमधूनच दगाफटका झाला का, अशी शंका पुढे येते. ज्या बिगर शेती मतदारसंघात ते पराभूत झाले, त्यात त्यांना सर्वांत कमी मते मिळाली. अविनाश देशमुख, अभिषेक जैस्वाल हे त्यांच्यापुढे नवखे; पण त्यांना जास्त मते मिळाली. या गोष्टी पचणी पडणाऱ्या नाहीत. राजकारणातील त्यांचे परंपरागत विरोधक काँग्रेसचे माजी आ. कल्याण काळे यांनी मात्र येथे शक्तिप्रदर्शन केले. त्यांचे बंधू आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे विजयी झाले. विधानसभेत पराभव झाला असला तरी विरोधक म्हणून आपली ताकद काळेंनी या निमित्ताने दाखवून दिली.

परभणीत सुरेश वरपूडकर गटाने बँक ताब्यात घेत भाजपचे रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलचा पराभव केला. येथे राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी महाविकास आघाडीत जागा वाटपावरून प्रारंभी घोळ घातला आणि बोर्डीकरांसोबत घरोबा केला; पण भाजपच्या पॅनलला बहुमत मिळू शकले नाही. या निवडणुकीत हाणामारीही झाली. सोनपेठ गटात बोर्डीकरांचे बंधू गंगाधर आणि जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या गटांत हाणामारी झाली. शेवटी एका मताने बोर्डीकरांचा पराभव झाला. बाबाजानी दुर्राणी हे भाजप गोटात गेल्यामुळे महाविकास आघाडी अडचणीत येण्याची शक्यता दिसत होती. 

बीड मध्यवर्ती बँकेची निवडणूक गाजली ती पंकजा मुंडे यांच्या पॅनलच्या माघारीमुळे. निवडणूक न लढण्याचा त्यांचा निर्णय केवळ ‘झाकली मूठ सव्वालाखाची’ या म्हणीची आठवण करून देणारा होता. क आणि ड गटातील सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना निवडणूक लढता येणार नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आणि याचे त्यांनी राजकीय भांडवल केले. वस्तुत: या निर्णयाने त्याचवेळी औरंगाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरही त्याचा परिणाम होऊन, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द ठरली; पण पंकजा यांनी याचा राजकीय अर्थ लावत निवडणुकीवर बहिष्कारच टाकला. वास्तविक निवडणूक झाली असती तरी निकाल फारसे वेगळे दिसले नसते आणि नेमकी हीच बाब स्पष्ट झाल्याने त्यांनी माघारीची संधी साधली. यानिमित्ताने २० वर्षांनंतर बँकेवरचे भाजपचे वर्चस्व संपुष्टात आले आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पकड घट्ट केली.

-सुधीर महाजन

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाbankबँकAurangabadऔरंगाबाद