शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

आकडेवारीची चलाखी; कागदावर जसे दिसते, तसे शेतावर दिसत नाही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 03:39 IST

कागदावर जसे दिसते, ते शेतावर अजिबात दिसत नाही. याची प्रचिती परवा राज्याच्या कृषी विभागाने खरीप हंगामाचा अहवाल जाहीर केला, त्यात दिसली. कारण ती केवळ आकडेवारीची करामत म्हणावी लागेल.

कागदावर जसे दिसते, ते शेतावर अजिबात दिसत नाही. याची प्रचिती परवा राज्याच्या कृषी विभागाने खरीप हंगामाचा अहवाल जाहीर केला, त्यात दिसली. कारण ती केवळ आकडेवारीची करामत म्हणावी लागेल. अशा आकडेवारीने परिस्थिती रंगविता येते, पण वास्तव लपवून ठेवता येत नाही. परवाची आकडेवारीही त्यापेक्षा वेगळी नाही. या अहवालात मराठवाडा, खान्देश आणि विदर्भात पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या उत्पादनावर परिणाम होणार, असे म्हटले आहे, पण हे सांगण्यासाठी सरकारच्या अहवालाची आवश्यकता नाही. शिवारावर एक नजर टाकली, तर माना टाकलेली पिकेच बोलतात. गेल्या वर्षीही अशीच अवस्था होती. जूनमध्ये पेरणीच्या वेळी आलेला पाऊस जुलैमध्ये गायब होतो, हा कोरडा कालावधी वाढत आहे. या वर्षी तो २६/२७ दिवसांचा होता. त्यानंतर, १६/१७ आॅगस्ट असे दोन दिवस राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आणि खरिपाची पिके सुधारली; परंतु त्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांचा खंड पडल्याने, आता ऐन निसवणीत आलेला मका, बोंडावर आलेला कापूस माना टाकायला लागला. उत्पादनात घट येणे हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा घटक आहे. राज्यातील पर्जन्यमानाचा विचार केला, तर कोकण, कोल्हापूर, प. महाराष्टÑ आणि पूर्व विदर्भ हे भरपूर पावसाचे प्रदेश. कोकण, प. महाराष्टÑात अरबी समुद्राकडून पाऊस येतो, तर पूर्व विदर्भासाठी बंगालच्या उपसागराकडून, परंतु तो प. विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यापर्यंत पोहोचताना कमजोर होताना दिसतो, म्हणून या प्रदेशांना दरवर्षी अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. या वर्षी तर नाशिकमध्येही नेहमीसारखा पाऊस नाही. कृषी खात्याने नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या विभागांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या जिल्ह्यांची आकडेवारी जाहीर केली. निश्चितपणे बहुतेक ठिकाणी सरासरीइतका पाऊस झाला. मात्र, पावसाचे दिवस कमी झाले. सरासरीचा पाऊस दोन-तीन दिवसांत पडला. सरासरीच्या भाषेत त्याने उद्दिष्ट पूर्ण केले, परंतु तो जमिनीत मुरला नाही. पडला आणि वाहून गेला. पावसाचे दिवस कमी झाले, याचा अर्थ कोरडा कालावधी जास्त, पण त्याचा परिणाम पिकांवर झाला. एक तर अतिपावसाने किंवा पावसाअभावी पिके संकटात आली आहेत. पावसापेक्षा आकाश बराच काळ अभ्राच्छादित राहिल्याने रोग वाढले, त्याचाही फटका बसला. हे संकट असे दुहेरी आहे. कापसावर बोंडअळी, सोयाबीनवर बुरशी, असा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. पावसाअभावी नुकसान झालेच आणि किडींच्या प्रादुर्भावाने आणखी ते होणार आहे. पाऊस सरासरी गाठतो; पण त्याचा तºहेवाईकपणा वाढला आहे. सगळीकडे त्याची हजेरी नसते. तो येतो, कोसळतो आणि गायब होतो. याचा परिणाम आता पीक पद्धतीवर होताना दिसतो. यावर्षी कापूस न लावण्याचा निर्णय अनेक गावांनी घेतला. अस्मानी संकट हेच कारण नाही, तर कापसाला भाव मिळत नाही, सगळ्याच शेतमालाची ही अवस्था आहे. पावसाअभावी यावर्षी उडीद, मूग ही कडधान्ये हातातून गेली आहेत. उत्पादनातील घट प्रत्यक्ष उत्पादनानंतरच लक्षात येईल, असे कृषी खात्याचे म्हणणे असले, तरी त्याची मोजदाद करणारी यंत्रणाच नाही. पीक पाहणीचीही तीच अवस्था आहे. कोणीही अधिकारी शिवारात जात नाही. नुकसान झाले ते दिसते आहे. कुठे पावसाअभावी, तर कुठे अतिपावसाने फटका बसला. आकडेवारीची चलाखी परिस्थिती बदलू शकत नसते, याचे भान असणे आवश्यक आहे. पावसाच्या या लहरीपणावर सरकारने मार्ग शोधला होता, कृत्रिम पावसाचे प्रयोग जे जगभर यशस्वीपणे राबविले जातात, तो प्रयोग मराठवाड्यात प्रथम केला, यंत्रणा उभी केली. आता ही सगळी यंत्रणा सोलापूरला हलविली आहे, परंतु या वर्षी प्रयोग का केला नाही, याचे कोडे उलगडत नाही. अशा प्रयोगातून एखाद-दुसरा पाऊस पाडण्यात यश आले, तर खरिपाची हमी देता येते. पाऊस पाडणे आता दुरापास्त नाही, हे सरकार विसरले असावे.

टॅग्स :Farmerशेतकरी