शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉव्हिडंट फंडावर व्याज देताना इतकी चिरकूटगिरी का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2023 06:15 IST

प्रचंड वेगाने वाढणाऱ्या महागाईचा विचार न करता आणि यापेक्षा जास्त दराने व्याज देणे शक्य असतानाही ‘ईपीएफओ’ने व्याजदरात ००.०५% इतकी नगण्य वाढ करावी?

ॲड. कांतीलाल तातेड, अर्थशास्त्राचे अभ्यासक

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील (ईपीएफ) व्याजदर ८.१५ टक्के करण्याची शिफारस आहे. गतवर्षी (२०२१-२२) हा व्याजदर ८.१० टक्के होता. तो ४२ वर्षांतील नीचांकी दर होता. आता त्यात केवळ ००.०५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये एक लाख रूपये जमा असतील तर त्याला एका वर्षाला केवळ ५० रुपयांची वाढ मिळणार आहे.कामगार - कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने भविष्य निर्वाह निधी कायदा, १९५२ सक्तीने लागू केला होता.  प्रचंड वेगाने वाढणाऱ्या महागाईचा विचार करता तसेच यापेक्षा जास्त दराने व्याज देणे शक्य असतानाही ‘ईपीएफओ’ने व्याजदरात केलेली नगण्य वाढ योग्य आहे का? पीएफ ही कर्मचाऱ्यांचा निवृत्तीपश्चात आधार असलेली दीर्घकालीन गुंतवणूक आहे. वाढत्या महागाईपासून गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी या गुंतवणुकीवर जास्त दराने व्याज देणे आवश्यक असते. व्याजदर हाच या गुंतवणुकीचा आत्मा असतो. परंतु, महागाईत प्रचंड वाढ होत असताना ‘पीएफ’च्या व्याजदरात मात्र वाढ केली जात नाही.वास्तविक नोव्हेंबर व डिसेंबर २०२२ वगळता जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या काळात किरकोळ महागाई दर सतत ६ टक्क्यांपेक्षा जास्त होता. एप्रिल, मे, जून व ऑगस्ट २०२२मध्ये तर तो सात टक्क्यांपेक्षा जास्त होता. मुळात वाढणारी महागाई कोणत्याही महागाई निर्देशांकात प्रतिबिंबित होत नाही. प्रत्यक्षात ती त्यापेक्षा फारच जास्त असते. प्रत्येक गावात, शहरात, तसेच राज्यातील महागाईचा दर वेगवेगळा असतो. त्यामुळे काही राज्यात तर किरकोळ महागाईचा दर आठ टक्क्यांपेक्षा जास्त होता. एप्रिल २०२२ मध्ये अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ८३९४.८२ होता. जानेवारी २०२३ मध्ये तो ८७३०.०९ आहे. म्हणजेच केवळ दहा महिन्यांमध्ये निर्देशांकात ३३५.२७ अंशांची वाढ झालेली आहे. केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात गेल्या नऊ महिन्यात आठ टक्के वाढ केली आहे.रिझर्व्ह बँकेने मे २०२२ पासून रेपो दरात २.५० टक्के वाढ केली आहे. बहुतांश बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात दोन टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांच्या व्याजदरात ००.७० टक्क्यांपर्यंत वाढ केली गेली. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीसाठीदेखील अल्पबचत योजनांच्या व्याजदरात ००.२० ते १.१० टक्के इतकी वाढ झाली,  या पार्श्वभूमीवर ‘ईपीएफओ’ व्याजदरवाढ अन्यायकारकच आहे! वाढत्या महागाईमुळे गुंतवणुकीचे वास्तव मूल्य कमी होऊ नये म्हणून सरकार सदर गुंतवणुकीवरील व्याजदरात सातत्याने वाढ करीत असते. उदा. १९८७ ते १४ जानेवारी, २००० पर्यंत सरकार भविष्य निर्वाह निधीवर १२ टक्के दराने व्याज देत होते. परंतु, उद्योगपतींना स्वस्त दराने कर्ज देता येणे शक्य व्हावे म्हणून वाजपेयी सरकारने १५ जानेवारी, २००० पासून दोन वर्षात त्यामध्ये जवळपास चार टक्क्यांची कपात केली. त्याआधी भविष्य निर्वाह निधीवर सलग १३ वर्षे १२ टक्के दराने व्याज देणे शक्य होते तर आता ते का शक्य नाही ?कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये जमा झालेल्या रकमेवर त्यावर्षी मिळालेल्या उत्पन्नाचे संपूर्ण वाटप त्यावर्षीच्या संबंधित कर्मचाऱ्यांमध्येच करणे आवश्यक असते. कारण त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या तसेच नोकरीस मुकलेल्या लाखो कर्मचाऱ्यांना त्यांच्या बचतीच्या रकमेवर त्यांच्या हक्काची व्याजाची रक्कम मिळू शकत नाही. त्यामुळे वाटपयोग्य ६६३.९१ कोटी रुपये शिल्लक ठेवणे, हा अशा कर्मचाऱ्यांवर अन्याय नाही का ?रिलायन्स कॅपिटल, येस बँक, डीचएफएल आणि आयएलएफएसमध्ये अडकलेले कर्मचाऱ्यांच्या पीएफचे ४,५०० कोटी रूपये  वसूल होण्याची शक्यता धूसर असताना ‘ईपीएफओ’ने ‘ईटीएफ’मधील गुंतवणुकीत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. हे तर अयोग्यच आहे. केंद्र सरकार वजावटीसह प्राप्तिकर आकारण्याची जुनी पद्धत बंद करील, अशी चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे एका बाजूला पीएफवर कमी दराने व्याज देणे व दुसऱ्या बाजूला त्यावर मिळणारी प्राप्तिकराची सवलत काढून घेणे असा दुहेरी फटका देशातील लाखो कर्मचाऱ्यांना बसणार आहे. kantilaltated@gmail.com

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधी