शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

‘डिजिटल हेल्थ आयडी’ देऊन रुग्णांचे काय भले होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 09:22 IST

‘आयुष्मान भारत डिजिटल योजना’ या नव्या योजनेनुसार प्रत्येक नागरिकाची आरोग्याबाबतची सर्व माहिती ‘इंटरनेट’वर साठवली जाऊन प्रत्येक नागरिकाला ‘डिजिटल हेल्थ आयडी कार्ड’ दिले जाईल.

डॉ. अनंत फडके,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे अभ्यासक सहसमन्वयक, जनआरोग्य अभियानरुग्ण कुठेही गेला तरी रुग्णाने हा ‘डिजिटल हेल्थ आयडी’  नंबर सांगितला की गरजेप्रमाणे डॉक्टरला त्याच्याशी संबंधित माहिती इंटरनेटवरून बघता येईल व वापरता येईल. असे केल्याने गरीब व मध्यमवर्गीय लोकांनाही फायदा होईल, असा दावा केला जात आहे. इंटरनेटचा असा वापर लाभदायक होईल यात वाद नाही. मात्र, आरोग्य माहिती ही अत्यंत खाजगी माहिती असते व म्हणून ती व्यक्ती व तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांनाच फक्त ती उपलब्ध असायला हवी. त्यासाठी ती माहिती एका पूर्णपणे स्वतंत्र आरोग्यसंस्थेकडे असायला हवी. कुठल्याही परिस्थितीत सरकारसकट बाकी कोणालाही ती उपलब्ध होता कामा नये. दुसरे म्हणजे कुठलीही आरोग्यसेवा मिळण्यासाठी  ‘डिजिटल हेल्थ आयडी’ ही पूर्वअट असू नये. कारण अनुभव असा आहे की, सर्वांत वंचित लोकांकडेच असा ‘आयडी’ अनेकदा नसतो.

खरे तर मुळातच ‘आयुष्मान भारत’ योजनेमार्फत गरीब जनतेला आरोग्यसेवा मिळते हा दावाच खोटा आहे. ‘जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना’ असा दावा करत ही योजना मोदी सरकारने २०१८ मध्ये आणली. त्यासाठी पहिल्या वर्षी फक्त २४०० कोटी रुपये, तर दुसऱ्या वर्षीही  फक्त २००० कोटी रुपयांची तरतूद केली. आयुष्मान भारतमार्फत १० कोटी कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंत संरक्षण देणार, अशी घोषणा होती. ती प्रत्यक्षात आणायची तर वर्षाला निदान ३०००० कोटी रुपये लागतील. १० लाख लोकांना या योजनेमुळे २०१८ साली लाभ मिळाला, असा दावा करण्यात आला. तो खरा मानला तरी उपलब्ध सरकारी आकडेवारी सांगते की १० कोटी कुटुंबांमध्ये वर्षाला २.३ कोटी लोकांना हॉस्पिटल उपचारांची गरज असते.

‘आयुष्मान भारत’ योजनेचे दोन भाग आहेत. एक म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या गरीब रुग्णांसाठीची ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (पी.एम. जय योजना) त्यामार्फत गरीब रुग्णांना ठरावीक १३५४ शस्त्रक्रिया, प्रोसिजर्स, उपचार या योजनेंतर्गत मोफत करून मिळतात. उच्च-तंत्रज्ञान लागणाऱ्या या शस्त्रक्रिया, प्रोसिजर्स करू शकणाऱ्या मूठभर खाजगी हॉस्पिटल्सना चांगला धंदा मिळतो; पण सामान्य लोकांचा आरोग्यावरील खर्च फारसा कमी होणार नाही, असे अशा योजनांबाबत झालेल्या अभ्यासांवरून दिसते. 

सरकारी पैशातून चाललेल्या अशा आरोग्य विमा योजनांबद्दल झालेल्या १३ अभ्यासांपैकी ९ अभ्यासांमध्ये आढळले की, या योजनांमुळे लोकांचा औषधोपचारांवर होणारा खर्च कमी न होता वाढला! इस्पितळात दाखल होऊन कराव्या लागणाऱ्या औषधोपचारांमुळे मोठा आर्थिक फटका बसण्याचे प्रमाण कमी झाले का हे पाहणाऱ्या अभ्यासांपैकी तीनचतुर्थांश अभ्यासांमध्ये आढळले की, हे प्रमाण कमी न होता उलट वाढले! खुद्द ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’बाबतचा छत्तीसगडबाबतचा समीर गर्ग आदी संशोधकांचा अभ्यास सांगतो की, लोक करत असलेला आरोग्य खर्च कमी होणे किंवा इस्पितळात दाखल होऊन कराव्या लागणाऱ्या औषधोपचारांमुळे मोठा आर्थिक फटका बसण्याचे प्रमाण कमी होणे हे झालेले नाही.

सरकारचा दावा असतो की, नेहमीचे साधे उपचार, शस्त्रक्रिया सरकारी हॉस्पिटल्समध्ये होतात. तिथे न होऊ शकणारे उपचार, शस्त्रक्रिया, प्रोसिजर्स यांच्यासाठी ही योजना आहे; पण खाजगीकरणाच्या धोरणामुळे सरकारी इस्पितळांची स्थिती फारच खालावली आहे. ‘इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्डस्’ या सरकारी मानकानुसार किती सरकारी केंद्रांचा दर्जा उत्तम आहे असे पाहिले तर उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये यांच्यापैकी अनुक्रमे फक्त ७%, १२%, १३% केंद्रे या दर्जानुसार आहेत. ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर्सची कमतरता ८०% आहे. ही परिस्थिती न सुधारल्याने अधिकाधिक रुग्ण खाजगी हॉस्पिटल्सकडे जातात. तिथे खोट्या नोंदी करून साधा रुग्ण गंभीर दाखवून अकारण हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, अकारण तपासण्या, अकारण सलाइन इ. गैरप्रकारामुळे सरकारचे पैसे काही प्रमाणात वाया जातात. ते जनतेकडून करामार्फत गोळा केलेले असूनही रुग्ण तक्रार करत नाही! 

एकंदरीत विचार करता आयुष्मान भारत योजनेमार्फत गरीब लोकांना हॉस्पिटल सेवा मोफत सेवा मिळेल, हा दावा मुळात खोटा आहे. ‘आयुष्मान भारत डिजिटल योजना’मार्फत त्यात काही मोठा फरक पडेल, अशी आशा धरण्यात अर्थ नाही. शिवाय ही योजना विमा कंपन्यांमार्फत राबवली जात असल्याने त्यांच्या नफेखोरीमुळे काहीतरी कारणे काढून रुग्णांना वंचित ठेवणे ही मोठी समस्या राहणारच आहे.anant.phadke@gmial.com

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार