शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

छोटे मासे, मोठे मासे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 5:23 AM

अनेक पुनर्विकास योजनांमध्ये रहिवाशांमधील संघर्षामुळे अडथळे निर्माण होतात. विकासकांनी लोकांची फसवणूक करू नये हे जेवढे रास्त आहे, तेवढेच रहिवाशांनीही छोट्या लाभाच्या आमिषाने पुनर्विकास योजनांमध्ये खोडा घालू नये, ही अपेक्षा चुकीची नाही.

समूह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट)ची व्याप्ती वाढवून संपूर्ण एमएमआर क्षेत्रात त्याची अंमलबजावणी करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. ठाणे शहरात या योजनेचा श्रीगणेशा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी झाला.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कळवा, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, मीरा रोड, भार्इंदर अशा अनेक शहरांमध्ये गेल्या २० वर्षांत अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत. याबाबतच्या न्यायालयीन खटल्यांत न्यायालयाने या इमारती जमीनदोस्त करण्याचीच भूमिका घेतली आहे. काही भागात इमारतीला लागून इमारती उभ्या केल्याने लोकांना मोकळा श्वास घेता येत नाही किंवा त्यांच्या घरात पुरेसा प्रकाश येत नाही. अशा कोंदट वातावरणामुळे काही भागात राहणाऱ्यांना सतत साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर समूह विकास योजना राबवण्यात सरकारला यश आले तर त्याचा मोठा फायदा एमएमआर क्षेत्रातील कोट्यवधी लोकांना होईल, याबद्दल दुमत नाही. एका इमारतीचा पुनर्विकास करताना इमारतीभोवतीची मोकळी जागा, प्रकाशाची व्यवस्था अशा अनेक बाबींचा विचार करण्यास मर्यादा येतात. अनेकदा एका इमारतीच्या पुनर्विकासात विकास नियंत्रण नियमावलीचे पालन करण्याकरिता काही सवलतींची अपेक्षा विकासकांना करावी लागते. मात्र समूह विकास योजनेत सलग दहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर योजना राबवायची असल्याने मोकळ्या जागा, खेळण्याची ठिकाणे, पार्किंग प्लेस, हरित क्षेत्र अशा अनेक गोष्टींचा बारकाईने विचार केला जाऊ शकतो. दीर्घकालीन नियोजन करून झालेला असा विकास ठाणे किंवा कुठल्याही शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो. गेल्या चार-पाच वर्षांत बांधकाम क्षेत्रात मरगळ आली आहे. नोटाबंदीनंतर बांधकाम क्षेत्रातील खेळत्या भांडवलावर मर्यादा आल्या आहेत. इमारतीचे बांधकाम सुरू असताना घराची नोंदणी केल्यास जीएसटी भरावा लागतो. त्यामुळे बांधून तयार असलेली घरे खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. बहुतांश विकासक हे जमीन संपादनाकरिता प्रकल्प खर्चाच्या दहा टक्के गुंतवणूक करून बांधकाम सुरू करतात व उर्वरित ८० टक्के रक्कम घरांचे आगाऊ बुकिंग करून उभी करतात.

गेल्या काही वर्षांत बिल्डरांच्या फसवणुकीची अनेक प्रकरणे घडल्याने बँका बºयाच चिकित्सेनंतरच कर्ज मंजूर करतात. त्यामुळे अनेक घरांच्या योजना अपूर्णावस्थेत आहेत. अशा परिस्थितीत समूह विकास योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास बांधकाम क्षेत्रातील बड्या कंपन्या विकासाकरिता पुढे येतील. त्यांच्याकडे आर्थिक क्षमता असल्याने छोट्या योजनांमध्ये विकासकांची जी आर्थिक कोंडी सध्या होत आहे ती त्यांची होणार नाही. बँका, वित्तसंस्था अशा बड्या कंपन्यांना कर्जपुरवठा करण्यास पुढे येतील. ‘रेरा’ कायद्यामुळे एखाद् दुसºया योजनेकरिता बांधकाम क्षेत्रात उतरणारे भुरटे बिल्डर व्यवसायातून हद्दपार झाले. व्यवसायाकरिता निधी कसा उभा करणार हे दाखवण्याची सक्ती ‘रेरा’मध्ये असल्याने अनेकांना आपला गाशा गुंडाळावा लागला. समूह विकास योजना हीदेखील अशा भुरट्या बिल्डरांवर बुलडोझर फिरवणारी आहे. समूह विकास योजनेत सगळ्यात मोठा अडसर हा लोकांची संमती मिळवण्याचा असेल.

एका इमारतीचा पुनर्विकास करताना सर्व रहिवाशांना एकत्र करून त्यांची संमती मिळवताना विकासकांच्या नाकीनऊ येतात. येथे वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांची संमती मिळवणे विकासकावर बंधनकारक असेल. ज्या शहरांमध्ये खंबीर राजकीय नेतृत्व आहे तेथील असे नेते लोकांना समूह विकासाकरिता राजी करू शकतील. आणखी एक अडचण आहे ती वेगवेगळ्या एजन्सींची ना-हरकत प्राप्त करण्याची. त्याकरिता एक खिडकी योजना राबवण्याची गरज आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर समूह विकासाकरिता प्राधिकरण स्थापन करण्यामागे सरकारची तीच भूमिका असेल. बांधकाम क्षेत्रातील छोटे मासे संपुष्टात येऊन मोठे मासे उरणे हे स्वागतार्ह आहे. 

टॅग्स :thaneठाणेUddhav Thackerayउद्धव ठाकरे