शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

शेतकऱ्यांना सहा हजार; हा तर चुनावी जुमला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 1:25 AM

पाच राज्यांतील निवडणुकीत लोकांनी भाजपला जमिनीवर आपटल्याने मोदी सरकारला आता शेतक-यांची आठवण झाली आहे. गेल्या निवडणुकीच्या आधी त्यांनी इतरांना दाखविली तशी शेतकºयांनाही मोठमोठी स्वप्ने दाखविली.

- राजू शेट्टी(स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते)पाच राज्यांतील निवडणुकीत लोकांनी भाजपला जमिनीवर आपटल्याने मोदी सरकारला आता शेतक-यांची आठवण झाली आहे. गेल्या निवडणुकीच्या आधी त्यांनी इतरांना दाखविली तशी शेतक-यांनाही मोठमोठी स्वप्ने दाखविली. आम्हीही त्याला भुललो; परंतु अनेक चांगल्या गोष्टी करता येणे शक्य असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेती व शेतकºयांसाठी काही केले नाही.आता हा वर्ग खवळला आहे व तो येत्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला गाडल्याशिवाय राहणार नाही, असे वाटल्यानेच केंद्र सरकारने शेतकºयाला सहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु हा निर्णयही चुनावी जुमला आहे. गेल्या निवडणुकीत प्रचारादरम्यान प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये देतो, असे आश्वासन याच सरकारने दिले होते व नंतर त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी व ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी ‘तो एक चुनावी जुमला होता,’ असे जाहीर केले. त्यामुळे या सहा हजारांचाही ‘चुनावी जुमला’च होणार अशी भीती वाटत आहे. हा अर्थसंकल्प मतदारांना लालूच दाखविणारा व भाजपला मतदान करणाºया मध्यमवर्गीय जनतेचे हित साधणारा आहे.शेतमालाच्या दरावरच नियंत्रण का?सरकारने अर्थसंकल्प मांडताना महागाई नियंत्रणात आणली म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेतली; परंतु त्यांनी महागाई नियंत्रणात आणताना इंधनाचे दर, साबण-सोडा, कपडालत्ता यांचे दर नियंत्रणात आणले नाहीत; तर आणले ते फक्त शेतमालाचे दर. गेल्या निवडणुकीत याच मोदी सरकारने आम्ही शेतकºयांना दीडपट हमीभाव देतो, असे गाजर दाखविले व नंतर न्यायालयात तसे देता येणार नाही, असे लिहून दिले. साखर, वस्त्रोद्योग व प्रक्रिया यांबद्दल या अर्थसंकल्पात एक रुपयाचीही तरतूद नाही. दीडपट हमीभाव द्यायचा राहू दे, जो हमीभाव सरकारनेच निश्चित केला आहे, तोदेखील शेतकºयांना मिळालेला नाही. शेतकºयांच्या आत्महत्या सुरूच आहेत व त्याबद्दल या पंतप्रधानांना काहीच वाटत नाही.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी