शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

ही लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:48 AM

धर्मात दानाला अतिशय महत्त्व आहे. दान केल्यास पुण्य मिळते, या भावनेने दान करणाऱ्यांची संख्या कमी नाही. गुप्तदान करणा-यांचीही वानवा नाही.

धर्मात दानाला अतिशय महत्त्व आहे. दान केल्यास पुण्य मिळते, या  भावनेने दान करणाऱ्यांची संख्या कमी नाही. गुप्तदान करणा-यांचीही वानवा नाही. तिरुपती बालाजीपासून तर आपल्या शिर्डीच्या साईबाबापर्यंतची श्रीमंत मंदिरे याची मूर्तिमंत उदाहरणे आहेत. परंतु दान केवळ देव आणि मंदिरांपुरतेच मर्यादित असावे का? देव शोधायचा असेल तर माणसात शोधा, असे सा-याच महापुरुषांनी सांगितले आहे, मग रक्ताच्या एका थेंबासाठी माणूस मृत्युशय्येवर असताना त्याला रक्त का मिळत नाही? रक्त उपलब्ध नसल्याने जीवास मुकणा-यांची संख्या मोठी आहे. २५ ते ३० लाख लोकखंख्येच्या नागपुरात एक टक्का लोकही रक्तदान करीत नसल्याचा धक्कादायक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. संपूर्ण देशाचे हेच चित्र आहे, असे का व्हावे? या देशात देवावर नितांत विश्वास असणारे आणि दान करणाºयांची संख्या कमी नसतानाही ही परिस्थिती का निर्माण व्हावी. रक्तदान हेच श्रेष्ठदान असे मोठ्या अभिमानाने म्हटले जाते. परंतु ते वास्तवात का उतरत नाही. आपण कुठे कमी पडतोय? एखाद्या रुग्णाला त्याची जितकी गरज आहे, तितकीच देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढत असलेल्या सैनिकांनाही रक्ताची गरज भासते. देशभक्तीच्या भावनेने आपले मोबाईलचे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसह सोशल मीडियावरील संदेश ठासून भरलेले दिसून येतात, मग रक्तदान करण्याची इच्छा निर्माण का होत नाही. रक्ताला जात-धर्म नाही म्हणून तर नव्हे ना? रक्तालाही कदाचित जात-धर्म असता तर जाती-धर्मनिहाय रक्तदान शिबिरे झाली असती. परंतु या परिस्थितीतही अनेकजण मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदानासाठी पुढाकार घेतात. मात्र शासकीय व सेवाभावी ब्लड बँक सोडल्या तर अनेक रक्तपेढ्यांनी रक्ताचा धंदा उघडला आहे, त्यामुळेही अशा स्वेच्छेने रक्तदान करणाºयांच्याही उत्साहावर पाणी फेरले जात आहे. असो रक्ताचा रंग एकच आहे आणि त्याची सर्वांनाच गरज आहे. त्यामुळे स्वेच्छेने रक्तदान करण्यासाठी शासनाला याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. ती केलीही जात आहे. परंतु त्याची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. समाजातील जातीय, धार्मिक आणि सामाजिक संघटनांच्या नेत्यांचे समाज ऐकतो. अशा लोकांनीही स्वत: पुढाकार घेऊन आणि शासनानेही अशा लोकांच्या सहकार्याने रक्तदानासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे, ही बाब प्रत्येकाच्या मनपटलावर कोरली जाईल, तेव्हाच खºया अर्थाने रक्तदानाची चळवळ ही लोकचळवळ होईल.

टॅग्स :Healthआरोग्यSocialसामाजिकMaharashtraमहाराष्ट्र