शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

धक्कादायक वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:50 AM

उपराजधानीत पोलीस विभागात शिपायांच्या २१० पदांसाठी २५ हजारांवर तरुणांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे यापैकी अनेक अर्जदार हे एमबीए, वकील आणि अभियंते आहेत. याशिवाय एम.टेक, एम.ए., एम.कॉम आदी पदव्युतर शिक्षण पूर्ण करणा-या तरुणांचाही यात समावेश आहे.

उपराजधानीत पोलीस विभागात शिपायांच्या २१० पदांसाठी २५ हजारांवर तरुणांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे यापैकी अनेक अर्जदार हे एमबीए, वकील आणि अभियंते आहेत. याशिवाय एम.टेक, एम.ए., एम.कॉम आदी पदव्युतर शिक्षण पूर्ण करणा-या तरुणांचाही यात समावेश आहे. हे धक्कादायक वास्तव बेरोजगारीचा प्रश्न किती भीषण झालाय त्याची प्रचिती आणणारे आहे. कुठलेही काम कमी दर्जाचे नसते, हे खरे. पण एखादा तरुण जेव्हा कठोर मेहनत आणि अनेक अडचणी पार करीत उच्च शिक्षण घेतो तेव्हा त्याला त्याच्या शिक्षणानुसार रोजगार मिळावा अशी अपेक्षा असते. आणि तो त्याचा हक्कही आहे. पण आज मात्र परिस्थिती अत्यंत बिकट आहे. पोटापाण्यासाठी अनेक उच्चशिक्षित तरुणांवर वाट्टेल ते काम करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तरुणपिढीत प्रचंड असंतोष आहे. त्याचा आगडोंब होळीला उसळलेला दिसला. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तरुणांनी आपल्या पदव्यांची प्रतिकात्मक होळी पेटवून त्याचा निषेध नोंदविला. केंद्र आणि राज्य सरकारही रोजगार निर्मितीत अपयशी ठरले असल्याचा या तरुणांचा आरोप होता आणि तो रास्तही आहे. वर्षाला दोन कोटी रोजगारांचे आश्वासन देणारे केंद्र सरकार लाखातही नोकºया देऊ शकलेले नाही. उलट नोटाबंदी वा जीएसटी आदी निर्णयांमुळे असंख्य तरुणांना आहे त्या नोकºयाही गमवाव्या लागल्या. रोजगार वाढीसाठी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्कील इंडिया, स्टार्ट अप यासारख्या योजना सरकारने आणल्या खºया, पण अद्याप त्यांचा लाभ मिळालेला नाही. देशाच्या इतर भागाप्रमाणे विदर्भातही शिक्षण संस्थांचा सुळसुळाट झाला आहे. या संस्थांमधून वर्षाला हजारो पदवीधर बाजारपेठेत उतरतात. पण त्यांच्या हातांना काम देणारे उद्योग या क्षेत्रात नाहीत. कारण कुठलेही असेल पण विदर्भात मोठे उद्योग येत नाहीत, हे एक कटुसत्य आहे. आणि अस्तित्वात असलेल्या उद्योगांमध्ये स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य मिळेल, अशी तरतूद नाही. राज्य शासनाकडून कोट्यवधींच्या गुंतवणुकीच्या घोषणा तर केल्या जात आहेत. पण त्यातून येथील बेरोजगारांना किती रोजगार मिळणार हा प्रश्न आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी लढा देणाºया विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भाची स्थापना झाल्यास कदाचित या क्षेत्राचा कायापालट होईल अन् येथील रोगजाराचा प्रश्न मिटेल, अशी काहींना अपेक्षा आहे. पण ती कितपत पूर्ण होणार याची शाश्वती नाही. त्यामुळे शासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाहीतर भविष्यात ही बेरोजगारी भयावह स्थिती निर्माण करेल.

टॅग्स :jobनोकरीEmployeeकर्मचारीMaharashtraमहाराष्ट्र