शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवछत्रपती पुरस्कारांनी मिळावी उमेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 03:05 IST

राज्यात क्रीडा संस्कृती रुजावी, आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये खेळाडूंनी पदके मिळवावीत, हा पुरस्काराचा हेतू असतो. यानिमित्ताने वेळेत कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर खेळाडू आणखी जोमाने कामाला लागू शकतात.

- विजय बाविस्करराज्यात क्रीडा संस्कृती रुजावी, आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये खेळाडूंनी पदके मिळवावीत, हा पुरस्काराचा हेतू असतो. यानिमित्ताने वेळेत कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर खेळाडू आणखी जोमाने कामाला लागू शकतात.शिवछत्रपती पुरस्कारांच्या घोषणेला अखेर मुहूर्त लागला. १७ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमही होणार आहे. तब्बल तीन वर्षांच्या रखडलेल्या पुरस्कारांचे वितरण होईल. शासनाने यावेळी शिवजयंतीच्या दरम्यान पुरस्कार सोहळ्याचा मुहूर्तही पाळला आहे. परंतु, यानिमित्ताने एकंदरच या पुरस्कारांबाबत आणि क्रीडाक्षेत्राबाबत शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. क्रीडाक्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी दरवर्षी हे पुरस्कार दिले जावेत, अशी अपेक्षा असते. मात्र, गेल्या ४६ वर्षांमध्ये फार कमी वेळा याबाबत नियमितता पाळण्यात आली आहे. १९६९-७० पासून ही योजना सुरू करण्यात आली. वैयक्तिक व सांघिक खेळांमध्ये सलग तीन वर्षे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करणाºया खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. प्रशिक्षक, संघटक, कार्यकर्त्यांबरोबरच अनेक वर्षे क्रीडाक्षेत्रात अहोरात्र मेहनत करीत खेळाडू घडविणाºया ज्येष्ठ संघटकांना जीवनगौरव पुरस्कारही सुरू करण्यात आला आहे. महिला संघटकांकरिता जिजामाता पुरस्कार हा स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात आला. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या खेळाडूंकरिता एकलव्य पुरस्कार, तर साहसी क्रीडाप्रकारात नेत्रदीपक कामगिरी करणाºयांसाठी साहसी क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. यासाठी खेळाडूंनी अर्ज करणे अपेक्षित असते. पुरस्कारांसाठी अर्ज मागविणे हेच गैर आहे. मुळात शासनाच्या क्रीडा विभागाकडे खेळाडूंची माहिती, कामगिरी यांची माहिती असणे आवश्यक आहे; परंतु केवळ खेळाडूंनी दिलेल्या माहितीवरच पुरस्कार दिले जातात. त्यातही निवड समितीच्या बैठका वेळेवर होत नाहीत. निश्चित केलेल्या नावांवर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी त्यामध्ये अनेक दुरुस्त्या होतात. यादी निश्चित झाल्यानंतर क्रीडा खाते अन्य मंत्र्यांकडे गेल्यामुळे पुन्हा त्यांच्याकडून काही बदल होतात. शासनाने पुरस्कारांबाबत ठरविलेले अनेक निकष आता कालबाह्य झाले आहेत. काही महत्त्वाच्या स्पर्धांमधील कामगिरीचा पुरस्कारांसाठी विचारच केला जात नाही. त्यामुळे खेळाडूंवर अन्याय होतो. यंदाच्या पुरस्कारांबाबतही काही तक्रारी आता येऊ लागल्या आहेत. काही खेळाडू न्यायालयात जाण्याच्याही तयारीत आहेत. मुळात कोट्यवधी रुपये खर्च करून होत असलेल्या या सोहळ्याचा मूळ उद्देश राज्यात क्रीडा संस्कृती रुजावी, आॅलिम्पिकपासून इतर आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी पदके मिळवावीत, हा असतो. पुरस्काराच्या निमित्ताने वेळेत कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर खेळाडू आणखी जोमाने कामाला लागू शकतात. परंतु, अनेकदा खेळाडूचा सूर हरविल्यावर त्याला पुरस्कार मिळाल्याची घोषणा होते. त्यातही खेळाडूला मिळतात केवळ एक लाख रुपये. त्यापेक्षा पुरस्कारप्राप्त खेळाडूंना प्रशिक्षणाच्या आणि अन्य सुविधा दिल्या, तर त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो. यंदाच्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा होणार आहे. पुरस्कारांची केवळ खिरापत न वाटता त्यातून खेळाडूंना कामगिरी उंचावण्यासाठी नवी उमेद मिळावी, या दृष्टीने बदल करण्याची गरज आहे. तर, राज्यातील क्रीडा संस्कृती बहरून आॅलिम्पिकमध्येही आपले खेळाडू चमकतील.

टॅग्स :Sportsक्रीडा