शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

शिवछत्रपती पुरस्कारांनी मिळावी उमेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 03:05 IST

राज्यात क्रीडा संस्कृती रुजावी, आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये खेळाडूंनी पदके मिळवावीत, हा पुरस्काराचा हेतू असतो. यानिमित्ताने वेळेत कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर खेळाडू आणखी जोमाने कामाला लागू शकतात.

- विजय बाविस्करराज्यात क्रीडा संस्कृती रुजावी, आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये खेळाडूंनी पदके मिळवावीत, हा पुरस्काराचा हेतू असतो. यानिमित्ताने वेळेत कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर खेळाडू आणखी जोमाने कामाला लागू शकतात.शिवछत्रपती पुरस्कारांच्या घोषणेला अखेर मुहूर्त लागला. १७ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमही होणार आहे. तब्बल तीन वर्षांच्या रखडलेल्या पुरस्कारांचे वितरण होईल. शासनाने यावेळी शिवजयंतीच्या दरम्यान पुरस्कार सोहळ्याचा मुहूर्तही पाळला आहे. परंतु, यानिमित्ताने एकंदरच या पुरस्कारांबाबत आणि क्रीडाक्षेत्राबाबत शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. क्रीडाक्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी दरवर्षी हे पुरस्कार दिले जावेत, अशी अपेक्षा असते. मात्र, गेल्या ४६ वर्षांमध्ये फार कमी वेळा याबाबत नियमितता पाळण्यात आली आहे. १९६९-७० पासून ही योजना सुरू करण्यात आली. वैयक्तिक व सांघिक खेळांमध्ये सलग तीन वर्षे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करणाºया खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. प्रशिक्षक, संघटक, कार्यकर्त्यांबरोबरच अनेक वर्षे क्रीडाक्षेत्रात अहोरात्र मेहनत करीत खेळाडू घडविणाºया ज्येष्ठ संघटकांना जीवनगौरव पुरस्कारही सुरू करण्यात आला आहे. महिला संघटकांकरिता जिजामाता पुरस्कार हा स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात आला. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या खेळाडूंकरिता एकलव्य पुरस्कार, तर साहसी क्रीडाप्रकारात नेत्रदीपक कामगिरी करणाºयांसाठी साहसी क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. यासाठी खेळाडूंनी अर्ज करणे अपेक्षित असते. पुरस्कारांसाठी अर्ज मागविणे हेच गैर आहे. मुळात शासनाच्या क्रीडा विभागाकडे खेळाडूंची माहिती, कामगिरी यांची माहिती असणे आवश्यक आहे; परंतु केवळ खेळाडूंनी दिलेल्या माहितीवरच पुरस्कार दिले जातात. त्यातही निवड समितीच्या बैठका वेळेवर होत नाहीत. निश्चित केलेल्या नावांवर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी त्यामध्ये अनेक दुरुस्त्या होतात. यादी निश्चित झाल्यानंतर क्रीडा खाते अन्य मंत्र्यांकडे गेल्यामुळे पुन्हा त्यांच्याकडून काही बदल होतात. शासनाने पुरस्कारांबाबत ठरविलेले अनेक निकष आता कालबाह्य झाले आहेत. काही महत्त्वाच्या स्पर्धांमधील कामगिरीचा पुरस्कारांसाठी विचारच केला जात नाही. त्यामुळे खेळाडूंवर अन्याय होतो. यंदाच्या पुरस्कारांबाबतही काही तक्रारी आता येऊ लागल्या आहेत. काही खेळाडू न्यायालयात जाण्याच्याही तयारीत आहेत. मुळात कोट्यवधी रुपये खर्च करून होत असलेल्या या सोहळ्याचा मूळ उद्देश राज्यात क्रीडा संस्कृती रुजावी, आॅलिम्पिकपासून इतर आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी पदके मिळवावीत, हा असतो. पुरस्काराच्या निमित्ताने वेळेत कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर खेळाडू आणखी जोमाने कामाला लागू शकतात. परंतु, अनेकदा खेळाडूचा सूर हरविल्यावर त्याला पुरस्कार मिळाल्याची घोषणा होते. त्यातही खेळाडूला मिळतात केवळ एक लाख रुपये. त्यापेक्षा पुरस्कारप्राप्त खेळाडूंना प्रशिक्षणाच्या आणि अन्य सुविधा दिल्या, तर त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो. यंदाच्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा होणार आहे. पुरस्कारांची केवळ खिरापत न वाटता त्यातून खेळाडूंना कामगिरी उंचावण्यासाठी नवी उमेद मिळावी, या दृष्टीने बदल करण्याची गरज आहे. तर, राज्यातील क्रीडा संस्कृती बहरून आॅलिम्पिकमध्येही आपले खेळाडू चमकतील.

टॅग्स :Sportsक्रीडा