शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

शिवछत्रपती पुरस्कारांनी मिळावी उमेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 03:05 IST

राज्यात क्रीडा संस्कृती रुजावी, आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये खेळाडूंनी पदके मिळवावीत, हा पुरस्काराचा हेतू असतो. यानिमित्ताने वेळेत कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर खेळाडू आणखी जोमाने कामाला लागू शकतात.

- विजय बाविस्करराज्यात क्रीडा संस्कृती रुजावी, आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये खेळाडूंनी पदके मिळवावीत, हा पुरस्काराचा हेतू असतो. यानिमित्ताने वेळेत कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर खेळाडू आणखी जोमाने कामाला लागू शकतात.शिवछत्रपती पुरस्कारांच्या घोषणेला अखेर मुहूर्त लागला. १७ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमही होणार आहे. तब्बल तीन वर्षांच्या रखडलेल्या पुरस्कारांचे वितरण होईल. शासनाने यावेळी शिवजयंतीच्या दरम्यान पुरस्कार सोहळ्याचा मुहूर्तही पाळला आहे. परंतु, यानिमित्ताने एकंदरच या पुरस्कारांबाबत आणि क्रीडाक्षेत्राबाबत शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. क्रीडाक्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी दरवर्षी हे पुरस्कार दिले जावेत, अशी अपेक्षा असते. मात्र, गेल्या ४६ वर्षांमध्ये फार कमी वेळा याबाबत नियमितता पाळण्यात आली आहे. १९६९-७० पासून ही योजना सुरू करण्यात आली. वैयक्तिक व सांघिक खेळांमध्ये सलग तीन वर्षे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करणाºया खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. प्रशिक्षक, संघटक, कार्यकर्त्यांबरोबरच अनेक वर्षे क्रीडाक्षेत्रात अहोरात्र मेहनत करीत खेळाडू घडविणाºया ज्येष्ठ संघटकांना जीवनगौरव पुरस्कारही सुरू करण्यात आला आहे. महिला संघटकांकरिता जिजामाता पुरस्कार हा स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात आला. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या खेळाडूंकरिता एकलव्य पुरस्कार, तर साहसी क्रीडाप्रकारात नेत्रदीपक कामगिरी करणाºयांसाठी साहसी क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. यासाठी खेळाडूंनी अर्ज करणे अपेक्षित असते. पुरस्कारांसाठी अर्ज मागविणे हेच गैर आहे. मुळात शासनाच्या क्रीडा विभागाकडे खेळाडूंची माहिती, कामगिरी यांची माहिती असणे आवश्यक आहे; परंतु केवळ खेळाडूंनी दिलेल्या माहितीवरच पुरस्कार दिले जातात. त्यातही निवड समितीच्या बैठका वेळेवर होत नाहीत. निश्चित केलेल्या नावांवर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी त्यामध्ये अनेक दुरुस्त्या होतात. यादी निश्चित झाल्यानंतर क्रीडा खाते अन्य मंत्र्यांकडे गेल्यामुळे पुन्हा त्यांच्याकडून काही बदल होतात. शासनाने पुरस्कारांबाबत ठरविलेले अनेक निकष आता कालबाह्य झाले आहेत. काही महत्त्वाच्या स्पर्धांमधील कामगिरीचा पुरस्कारांसाठी विचारच केला जात नाही. त्यामुळे खेळाडूंवर अन्याय होतो. यंदाच्या पुरस्कारांबाबतही काही तक्रारी आता येऊ लागल्या आहेत. काही खेळाडू न्यायालयात जाण्याच्याही तयारीत आहेत. मुळात कोट्यवधी रुपये खर्च करून होत असलेल्या या सोहळ्याचा मूळ उद्देश राज्यात क्रीडा संस्कृती रुजावी, आॅलिम्पिकपासून इतर आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी पदके मिळवावीत, हा असतो. पुरस्काराच्या निमित्ताने वेळेत कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर खेळाडू आणखी जोमाने कामाला लागू शकतात. परंतु, अनेकदा खेळाडूचा सूर हरविल्यावर त्याला पुरस्कार मिळाल्याची घोषणा होते. त्यातही खेळाडूला मिळतात केवळ एक लाख रुपये. त्यापेक्षा पुरस्कारप्राप्त खेळाडूंना प्रशिक्षणाच्या आणि अन्य सुविधा दिल्या, तर त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो. यंदाच्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा होणार आहे. पुरस्कारांची केवळ खिरापत न वाटता त्यातून खेळाडूंना कामगिरी उंचावण्यासाठी नवी उमेद मिळावी, या दृष्टीने बदल करण्याची गरज आहे. तर, राज्यातील क्रीडा संस्कृती बहरून आॅलिम्पिकमध्येही आपले खेळाडू चमकतील.

टॅग्स :Sportsक्रीडा