शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

शशी थरुरांचे चुकले काय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 1:05 AM

हिंदू पाकिस्तान हा शब्द प्रथम भाजपच्या अरुण शौरींनी व नंतर त्याच पक्षाच्या राम जेठमलानी या दोन माजी मंत्र्यांनी वापरला. आता तो काँग्रेसच्या शशी थरुर यांनी वापरला एवढेच.

हिंदू पाकिस्तान हा शब्द प्रथम भाजपच्या अरुण शौरींनी व नंतर त्याच पक्षाच्या राम जेठमलानी या दोन माजी मंत्र्यांनी वापरला. आता तो काँग्रेसच्या शशी थरुर यांनी वापरला एवढेच. पाकिस्तान हा स्वत:ला मुस्लीम राष्ट्र म्हणविणारा देश आहे. संघ आणि त्याच्या परिवारातले लोक जेव्हा हिंदू राष्ट्र म्हणतात तेव्हा त्यांच्याही मनात भारताला हे ‘हिंदूंचे राष्ट्र’ बनविण्याचाच विचार असतो.(शशी थरुर यांनी या दोन्ही विचारातील धर्मराष्ट्राचा मुद्दा अधोरेखित केला आहे एवढेच). भारतातील कोणत्याही अल्पसंख्य वर्गाला सुखासमाधानाने जगू न देण्याचा विडा उचललेल्या संघ परिवाराने त्याला एका धर्माचे राष्टÑ बनविण्याचा विडा उचलला आहे. तो इरादा ‘पाकिस्तान हे मुस्लीम राष्टÑ’ बनविण्याच्या मुस्लीम लीगच्या जुन्या इराद्याहून फक्त धर्माच्या नावाबाबत वेगळा आहे. त्यासाठी संसदेत थरुर आणि राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने एवढा गदारोळ उठविण्याचे कारण नाही. प्रत्यक्षात भारताला ‘हिंदू राष्टÑ’ म्हणायला पं. नेहरूंएवढेच सरदार पटेलही राजी नव्हते. बी.एम. बिर्ला या कोलकत्याच्या उद्योगपतीला लिहिलेल्या पत्रात पटेलांनी ‘भारताला हिंदू राष्टÑ म्हटले तर काश्मीरचे काय, पंजाबचे काय, अतिपूर्वेकडील राज्यांचे आणि केरळचे काय’ असा प्रश्न विचारला होता. साऱ्या वर्गांना सोबत घेऊन राष्टÑ पुढे न्यायचे तर त्यात सर्वधर्मसमभाव राखणेच आवश्यक आहे असे ते त्या पत्रात म्हणाले आहेत. आजच्या जगातली ९३ राष्टÑे स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारी आहेत. त्यात युरोप व आफ्रिकेसह, आशियातील बहुसंख्य देशांचा समावेश आहे. त्यातील अनेक देशात ख्रिश्चनांची बहुसंख्या आहे. तरीही ती राष्ट्रे स्वत:ला ख्रिस्ती राष्टÑ म्हणवत नाहीत. उलट कोणताही कायदा ख्रिस्ती धर्माच्या प्रभावापासून मुक्त राहिला पाहिजे याची ते डोळ्यात तेल घालून खबरदारी घेतात. इंग्लंडचे स्वत:चे चर्च आहे आणि इंग्लंडची राणी त्याची प्रमुख आहे. तरीही इंग्लंड हे सेक्युलर राष्टÑ आहे. जगातील कोणताही देश आता एकधर्मी, एकभाषी वा एका संस्कृतीचा राहिला नाही. नाही म्हणायला पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिरिया व सौदी अरेबिया ही राष्ट्रे स्वत:ला मुस्लीम राष्टÑे म्हणवितात. त्यात ज्यू धर्माच्या इस्रायलचाही समावेश आहे. पण अशी राष्टÑे बोटावर मोजता यावी एवढी थोडी आहेत. भारतात अल्पसंख्याकांची संख्या २० टक्क्यांहून अधिक आहे. प्रत्यक्षात ती २६ कोटींहून मोठी आहे. ही संख्या अमेरिका, रशिया व जपानहूनही मोठी आहे. तिचे वेगळे अस्तित्व नाकारून तिला ‘हिंदू राष्टÑ’ म्हणायला लावणे हाच मुळात एक धार्मिक अन्याय आहे. ‘तुम्ही जेव्हा भारताला हिंदू राष्टÑ बनविण्याची भाषा बोलता तेव्हा तुम्हाला भारताला हिंदू पाकिस्तान बनवायचे असते’ ही शशी थरुर यांची भाषा यासंदर्भात समजून घेतली पाहिजे. एकधर्मी देशांची कल्पना आता इतिहासजमा झाली आहे. तिला वर्तमानात स्थान नाही. मात्र वर्तमान मागे नेऊन त्यावर इतिहास लादायचा ज्यांचा प्रतिगामी प्रयत्न आहे त्यांना या बदलाशी काही देणेघेणे नाही. ते अजूनही वेदांच्या, उपनिषदांच्या, मनुस्मृतीच्या आणि रामायण व महाभारताच्या काळात वावरतात. त्याच काळाचे गोडवे गातात. त्यांना देशांच्या स्वातंत्र्यलढ्याशी कर्तव्य नसते व आताच्या संवैधानिक भारताविषयीही त्यांना आस्था नसते. अशी माणसे शशी थरुरांवर रागावणारच. ‘मोदींना मत न देणाºयांनी पाकिस्तानात चालते व्हावे’, ‘गाईचे रक्षक नाहीत ते देशद्रोही आहेत’ किंवा ‘या देशात राहायचे असेल तर आम्ही सांगू तीच भाषा तुम्ही बोलली पाहिजे’ असे म्हणणारे तथाकथित देशभक्त देशात आता फार आहेत. त्यांच्या एकारलेपणाला खंबीर उत्तर देण्याचे व तुम्हाला या देशाचा हिंदू पाकिस्तान बनवायचा आहे काय असा प्रश्न शशी थरुरांनी विचारला असेल तर त्यांचे साºया जाणकारांनी अभिनंदनच केले पाहिजे. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि त्याचे तसे असणे घटनेला मान्य आहे. मात्र धर्मनिरपेक्षतेचे मूल्यच ज्यांना मान्य नाही ते अजूनही हिंदूराष्ट्राची भाषा बोलतात व तसे राष्ट्र अस्तित्वात आणण्याची इच्छा बाळगतात. तात्पर्य, हा दोन मूल्यांमधील संघर्ष आहे व त्याकडे कमालीच्या डोळसपणे पाहणे गरजेचे आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणHinduहिंदूPakistanपाकिस्तान