शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

सेनेचे पाप, भाजपचे माफ? अजित पवारांसोबत भाजपने गुपचूप शपथविधी उरकला, तो धोका नव्हता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 11:46 IST

अजित पवार यांच्या समवेत पुरेसे आमदार पक्षातून बाहेर पडले नाहीत म्हणून तीनच दिवसांत राजीनामा देऊन सत्ता साेडावी लागली. चाळीस आमदारांचा गट बनवून अजित पवार भाजपला मिळाले असते तर ताे धाेका नव्हता का? 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी आघाडी करून शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, महाराष्ट्राच्या जनतेचा काैल अवमानित केला आणि हिंदुत्ववादी विचारांना धाेका दिला, असा आरोप करीत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बरीच टोलेबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना हाताशी धरून महाराष्ट्र जागा हाेण्यापूर्वी भाजपने गुपचूप शपथविधी उरकून घेतला हाेता, ताे हिंदुत्ववादी विचारांना धाेका नव्हता का? अजित पवार यांच्या समवेत पुरेसे आमदार पक्षातून बाहेर पडले नाहीत म्हणून तीनच दिवसांत राजीनामा देऊन सत्ता साेडावी लागली. चाळीस आमदारांचा गट बनवून अजित पवार भाजपला मिळाले असते तर ताे धाेका नव्हता का? 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडत नाही म्हणून अखेर शिवसेनेवर आघात करण्यात आला. गाेवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार, अरुणाचल आदी राज्यांत ताेडफाेड करूनच भाजपने सत्ता स्थापन केल्याचा गेल्या आठ वर्षांतील इतिहास आहे. उद्धव ठाकरे यांना शब्द दिला नसेल; पण म्हणून शिवसेनेने दुय्यम भूमिकाच घ्यावी, असे थाेडेच आहे? १९९० पूर्वी महाराष्ट्रात भाजपची स्वबळावर निवडून येण्याची क्षमता पंचवीस आमदारांचीच हाेती. शिवसेनेबराेबर युती झाल्यावर महाराष्ट्राच्या कानाकाेपऱ्यात भाजपचा स्वीकार सहज झाला. तत्पूर्वी जनसंघ किंवा भाजपनेही तत्त्वहीन आघाड्या केल्याच आहेत. बिहारमध्ये भाजपचे ७५ आमदार असताना केवळ पंचेचाळीस आमदार असणाऱ्या संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद बहाल केलेच हाेते. बिहारमध्ये एका रात्रीत आघाडीतील घटक पक्ष बदलतात, तेव्हा काेण काेणाला धाेका देते हे जनतेला समजणेच कठीण हाेऊन जाते. महाराष्ट्र हे आर्थिक आघाडीवरचे राज्य आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईच्या तुलनेत अहमदाबादचे महत्त्व वाढविण्याचे प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. शिवसेनेने मराठी माणसांच्या अस्मितेसाठीची लढाई सदैव केली आहे. त्याच पक्षात फूट पाडून शिवसेनेला संपवून टाकण्याची खेळी भाजपने केली. मुंबई महापालिकेची सत्ता एखाद्या राज्याएवढी बलदंड आहे. ती मिळविण्यासाठी आता धडपड चालू आहे. 

राजकारणात सर्व काही माफ असले तरी शिवसेनेने केले ते पाप ठरते आणि भाजपने केले ते माफ कसे? तीन दिवसांसाठी का असेना, अजित पवार यांच्याबरोबर आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न भाजपने केला, तो शरद पवारांच्या राजकीय, नैतिक  वजनामुळे आमदार माघारी फिरल्याने बारगळला.  अशा तत्त्वहीन राजकारणाचा मार्ग भाजपने अनेकदा पत्करला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्ती महमद सईद यांच्या नेतृत्वाखालील पीडीपी पक्षाबराेबर आघाडी केली, तेव्हा भाजपवर बरीच टीका  झाली हाेती. जम्मू-काश्मीरमध्ये अशाप्रकारे सत्ता मिळवून काय साध्य करायचे हाेते? अमित शहा यांच्या दौऱ्यात मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे अखेरचा लढा समजून भिडा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले, त्याहीवरून आता  वादंग उभे राहणार आहे. शिवसेनेतच फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांचे नैतिक बळ घसरले आहे. ते स्वत: मुख्यमंत्री असताना सत्ता जावी, हे माेठे धक्कातंत्र भाजपने वापरले. दुसरीकडे आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, ही सुडाची भाषा उचित नाही. केंद्रात सलग दाेनवेळा भाजपला बहुमत मिळाल्यानंतर प्रादेशिक किंवा घटक पक्षांची आता गरज उरलेली राहिली नाही, असे भाजपला वाटते आहे. 

नरेंद्र माेदी यांच्या प्रतिमेवर महाराष्ट्राने कौल दिला हाेता, असे त्यांचे मत आहे. मात्र, ते पूर्ण सत्य नाही. नरेंद्र माेदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय हाेण्यापूर्वीच शिवसेना-भाजप युतीने महाराष्ट्राची सत्ता हस्तगत केली हाेतीच. असे अनेक राज्यांत झाले आहे. ओडिशामध्ये बिजू जनता दलाने एक निवडणूक भाजपशी आघाडी करून जिंकली हाेती. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने भाजपशी आघाडी केली हाेती. अकाली दलाने पंजाबमध्ये नेहमीच भाजपशी आघाडी करीत राजकारण केले आहे. राजकीय वातावरण बदलले तसे अनेक प्रादेशिक पक्ष दुरावले. त्या सर्व पक्षांनी भाजपला धाेका दिला, असे झालेले नाही. काही पक्षांना भाजपनेही धाेका दिला आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखविताना मराठी अस्मितेचा विषयही पुढे येऊ शकताे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलने बंगाली अस्मितेमुळे भाजपवर मात केली हे विसरून कसे चालेल?

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाहBJPभाजपाShiv Senaशिवसेना