शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
2
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
3
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
4
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
5
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
6
SMAT 2025 : दोन टी-२० सामन्यात नाबाद २१४ धावा! १८ वर्षीय मुंबईकराचा शतकी धडाका
7
परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
8
500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
9
पत्नीने PUBG खेळू दिले नाही, पतीने बायकोची हत्या केली; सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
10
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
11
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
12
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
13
उघडताच पूर्ण भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट प्रीमिअमवरुन बंपर लिस्टिंगची शक्यता, पाहा डिटेल्स
14
Renuka Chaudhary: चक्क श्वानाला घेऊन काँग्रेस खासदार संसदेत पोहचल्या; सत्ताधारी भाजपानं घातला गोंधळ, काय घडलं?
15
मोठा निष्काळजीपणा! मध्य प्रदेशात ५० वर्षे जुना पूल कोसळला; १० जण जखमी
16
अर्थव्यवस्थेसाठी 'चिंताजनक' बातमी! रुपया डॉलरपुढे गडगडला, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम!
17
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
18
अफगाणिस्तानने उघडला नवा मार्ग, पाकिस्तानमध्ये हाहाकार; सीमेवरील व्यापार बंदीचा उलटाच झाला परिणाम
19
Holiday: डिसेंबरमध्ये शेअर बाजारात ९ दिवस कामकाज बंद! तुमचं ट्रेडिंग प्लॅनिंग आजच करा! ही घ्या सुट्टीची संपूर्ण यादी
20
यशस्वीची 'तेरे नाम' हेअर स्टाइल पाहून विराटमध्ये अवतरला सलमान; "लगन लगी.." स्टेप्सचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शोध श्रीखंड्याचा

By admin | Updated: March 30, 2016 03:00 IST

जनतेच्या रांजणाला व्यवस्थेनेच छिद्रे पाडली आहेत. वरून योजनारूपी घागरीने पाणी टाकले जाते आणि ते छिद्रांमधून वाहून जाते. ५५ वर्षांपासून असेच चालू आहे. जनतेचा रांजण कधीच

- सुधीर महाजनजनतेच्या रांजणाला व्यवस्थेनेच छिद्रे पाडली आहेत. वरून योजनारूपी घागरीने पाणी टाकले जाते आणि ते छिद्रांमधून वाहून जाते. ५५ वर्षांपासून असेच चालू आहे. जनतेचा रांजण कधीच भरला जात नाही हेच खरे दु:ख आहे. संतपरंपरेतील एकनाथांकडेच व्यवहारचातुर्य, तसेच प्रशासनाचे कसब होते. शिवाय सर्वांठायी ईश्वर पाहून त्यांनी सामाजिक उत्थानाचा प्रयत्नही त्यांनी इतर संतांप्रमाणे वारंवार केला. ते गाढवाला गंगाजल पाजणे असो, की पितरांच्या श्राद्धात अस्पृश्यांना बोलावणे. माणसाप्रती प्रेम आणि ईश्वरावरील अढळ निष्ठा यामुळेच श्रीकृष्ण श्रीखंड्याच्या रूपाने नाथांच्या घरी घरगडी म्हणून राहिला. पडेल ती कामे केली. ज्याक्षणी याचा साक्षात्कार नाथांना झाला, त्यावेळी त्यांना दु:ख झाले ते श्रीकृष्णाला कष्टाची कामे करावी लागली याचे. पुढे नाथांच्या निर्वाणानंतर गावातील नाथांच्या वाड्यातील रांजण नाथषष्ठीला भरण्याची परंपरा सुरू झाली. तुकाराम बीजेपासून हा रांजण भरण्यास सुरुवात होते आणि नाथषष्ठीला तो भरतो. त्यासाठी शेकडो लोक गोदावरीतून पाणी आणतात. ज्याच्या घागरीने तो भरतो त्याला श्रीखंड्याचा मान मिळतो. त्याचा सत्कार केला जातो. त्याच्या ठायी वारकरी श्रीकृष्णाला पाहतात.याही वर्षी नाथषष्ठीचा सोहळा झाला. नाथांचा रांजण भरला. औरंगाबादच्या श्रीराम कुलकर्ण्यांना श्रीखंड्याचा मान मिळाला; पण तो भरण्यासाठी वारकऱ्यांना आटापिटा करावा लागला. याचे कारण गोदावरी कोरडीठाक पडली आहे. जायकवाडीसारखे धरण अगदी काखेला असताना नाथांच्या पैठणमध्ये ही परिस्थिती. रणरणत्या उन्हात वारकऱ्यांची एक प्रकारे घेतलेली परीक्षाच होती, असे म्हणायला हरकत नाही. नाथांच्या काळात गोदावरीला महामूर पाणी होते. म्हणून श्रीखंड्यापुढे पाणी शोधण्याचा प्रश्न नव्हता; पण आज तो प्रश्न पडला. पाण्याअभावी रांजण भरतानाच त्रास झाला नाही, तर संपूर्ण यात्रेवरच या पाण्याच्या दुर्भिक्ष्याचे सावट पडले आहे. एकनाथ आणि श्रीखंड्या हे भक्त आणि भगवंत यांच्या नात्याचे एक सुंदर उदाहरण आहे. मराठवाड्याला भीषण पाणी टंचाईने घेरले आहे. ११ पैकी ७ मोठे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. जायकवाडी आणि माजलगाव धरणात मृत साठा उरला आहे. येलदरीमध्ये ५/६ टक्के पाणी आहे. ७३५ मध्यम व लघुप्रकल्पांपैकी ६० टक्के धरणे कोरडीठाक आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढणार. सध्या टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवण्यासाठी १६०० टँकर धावतात. मेमध्ये हा आकडा २५०० वर पोहोचू शकतो.टँकर काय वाढविता येतील; पण ते भरण्यासाठी पाणी असायला हवे. टंचाई निवारणासाठी सरकारने साडेतीनशे कोटींची तरतूद केली. पाण्यासारखा पैसा वाहणार; पण पाणी मिळणार नाही, ही अवस्था आहे. गेल्या दोन महिन्यात पाण्यासाठी ३१ जणाना जीव गमवावा लागला. लातूर शहराची अवस्था बिकट आहे. पाण्यावरून कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून १४४ कलम लावले. याचा अर्थ पाणी येथे स्फोटक बनले आहे. लोकानी पाण्याचे टँकर लुटू नयेत, पाणी मिळविण्यासाठी जमाव बेभान होऊ नये यासाठी सरकारलासुद्धा या पातळीवर उपाय योजावे लागले यावरून परिस्थिती किती नाजूक आहे याचा अंदाज येतो. लातूर हे शिक्षणाचे मोठे केंद्र आहे. या शहरात शिक्षणासाठी लाख-सव्वा लाख विद्यार्थी आलेले आहेत. त्यांनासुद्धा येथे थांबता येणार नाही अशी स्थिती आहे. पाण्यासाठी यापेक्षा आणखी कोणती परिस्थिती निर्माण होणार?नाथांचा रांजण भरण्यासाठी श्रीखंड्याच्या रूपात प्रत्यक्ष भगवंत आला होता. नाथ हे सामान्य माणसाचे प्रतीक समजले तर आज राज्यकर्त्यांना श्रीखंड्या समजावे लागेल. कारण या श्रीखंड्यांच्या सत्तेचा आधार जनतेची सेवाच असतो आणि आता श्रीखंड्यांची संख्याही मोठी आहे. हे सर्व श्रीखंडे कोरडा पडलेला जनतेचा रांजण कसा भरणार? कारण या रांजणाला व्यवस्थेनेच छिद्रे पाडली आहेत. वरून योजनारूपी घागरीने पाणी टाकले जाते आणि ते छिद्रांमधून वाहून जाते. ५५ वर्षांपासून असेच चालू आहे. जनतेचा रांजण कधीच भरला जात नाही हेच खरे दु:ख. या जनतेच्या रांजणाला श्रीखंड्या खरंच मिळणार का?