शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

उत्तर प्रदेशमधील चकमकीचा देखावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 04:20 IST

योगींचे सरकार गुन्हेगारांचा नायनाट करीत आहे, असे भासविले जाते. गुन्हेगारी संपविण्यापेक्षा पोलीस, राजकारणी आणि गुन्हेगारांतील हातमिळवणीवर पडदा टाकण्याचा उद्देश त्यामागे आहे का, अशी शंका दुबे आणि त्याच्या साथीदारांशी झालेल्या चकमकीतून येते.

उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबे याचा पोलीस चकमकीत झालेला मृत्यू अनेक प्रश्न उपस्थित करणारा असला, तरी उत्तर प्रदेशपोलिसांना त्याची फिकीर नाही, असे त्यांच्या वर्तनावरून दिसते. विकास दुबे याने पोलिसांच्या गाडीतून पळताना पोलिसांचे पिस्तूल हस्तगत करून हल्ला केला व त्या वेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला, असे पोलीस सांगतात. पोलिसांच्या गाडीला अपघात झाल्याने विकासला पळण्याची संधी मिळाली, असेही सांगितले जात आहे. रस्त्यावर उलटलेली पोलिसांची गाडी सर्वांनी पाहिली. तरीही अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि हे प्रश्न विकास दुबेच्या बचावासाठी नसून, पोलिसांचा खुलासा व घटनाक्रमावर आहेत.मुळात विकास दुबे याला उज्जैन येथे अटक झाली की तो शरण आला, इथंपासून संशयाला सुरुवात होते. उज्जैनमधील महाकाल मंदिरातील सुरक्षारक्षकाने त्याला हटकले तेव्हा त्याने स्वत:हून नाव जाहीर केले. पोलिसांचा ससेमिरा चुकविणारी व्यक्ती असे नाव जाहीर करीत नाही. याचा अर्थ तो पोलिसांना शरण येण्याच्या तयारीत होता. शरण येणारी व्यक्ती पोलिसांवर हल्ला करील हे संभवत नाही. ज्या गाडीतून त्याला कानपूरला नेण्यात आले, त्याच गाडीला अपघात झाला की दुसऱ्या गाडीला याबाबतही संशय आहे. शिवाय बेड्या घातलेल्या विकास दुबेने पोलिसांचे पिस्तूल हस्तगत केले कसे? एका पायाने लंगडणारा दुबे सुमारे अर्धा किलोमीटर पळाला कसा? विकास दुबेला घेऊन येणा-या गाड्यांच्या मागे असणाºया पत्रकारांच्या गाड्यांना टोलनाक्यावर का रोखले गेले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

चकमकीचा जो बनाव पोलिसांनी उभा केला आहे तो हास्यास्पद आहे. तथापि, त्याहून चिंताजनक बाब म्हणजे माध्यमांचे बारीक लक्ष असूनही अशी चकमक करण्यास पोलीस धजावले. पोलिसांच्या निर्ढावलेपणाचे हे उदाहरण आहे. गेल्या तीन दशकांत देशात अनेक चकमकी झाल्या. त्यातील खºया किती व बनाव किती, हे निर्विवादपणे कधीच बाहेर आले नाही. परंतु, दुबेला चकमकीत ठार मारले जाईल, असे जाहीरपणे बोलले जात असतानाआणि दुबेच्या मागोमाग माध्यमांचे कॅमेरे असताना ही चकमक घडली किंवा घडवून आणली गेली, ही बाब केवळ उत्तर प्रदेश नव्हे, तर देशासाठी चिंताजनक आहे. कानपूरच्या रस्त्यावर दुबेची गाडी उलटवून योगी आदित्यनाथ यांनी आपले सरकार उलटण्यापासून वाचविले, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिली आहे. सध्याच्या घटनेपुरती ती बरोबर असली तरी अखिलेश, मायावती यांची आधीची सरकारे धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नव्हती. दुबेच्या कुटुंबीयांचे राजकारणातील संवर्धन अखिलेश यांच्या समाजवादी पार्टीने केले. भाजपच्या राज्यमंत्र्यांवर पोलीस ठाण्यातच खुनी हल्ला करण्याचे धाडस दुबेने वीस वर्षांपूर्वी दाखविले ते सर्वपक्षीय राजकीय संरक्षणाच्या जोरावर. कानपूर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २०० पोलीस दुबेचे खबरे होते असे म्हणतात. दुबेच्या घरावर धाड टाकताना दुबेने केलेल्या गोळीबारात ठार झालेल्या अधिकाºयाने दोन महिन्यांपूर्वीच वरिष्ठांना पत्र लिहून दुबेने पसरविलेल्या जाळ्याची माहिती दिली होती. दुबे याला सर्वपक्षीय पाठिंबा होता आणि तो त्याने एका व्हिडिओत उघडही केला होता. त्याची रीतसर चौकशी झाली असती, तर दुबेचे अनेक लागेबांधे उघड झाले असते. तसे होऊ न देण्यात उत्तर प्रदेशातील भ्रष्ट यंत्रणा या चकमकीतून यशस्वी ठरली.
योगींचे सरकार गुन्हेगारांचा नायनाट करीत आहे असे भासविले जाते. असा नायनाट करण्यामागे उद्देश काय, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. गुन्हेगारी संपविण्यापेक्षा पोलीस, राजकारणी आणि गुन्हेगार यांच्यातील हातमिळवणीवर पडदा टाकण्याचा उद्देश त्यामागे आहे का, अशी शंका दुबे आणि त्याच्या साथीदारांशी झालेल्या चकमकीतून येते. योगींचा उद्देश साफ असेल तर दुबेला मदत करणाºया भ्रष्ट यंत्रणेतील सर्व म्होरके त्यांनी शोधून काढावेत आणि त्यांना न्यायालयात हजर करावे. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता योगींनी हे काम केले, तर त्यांच्या उद्देशाबद्दल खात्री पटेल.

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबेUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस