शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

असंवेदनशील राज्यकर्त्यांपासून राज्य वाचवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 00:30 IST

- चंद्रकांत पाटील कोरोना महामारीच्या फैलावानंतर महाराष्ट्रात जे चित्र बघायला मिळत आहे, ते अत्यंत भयानक आहे. लॉकडाऊनच्या आदेशाची कडक ...

- चंद्रकांत पाटीलकोरोना महामारीच्या फैलावानंतर महाराष्ट्रात जे चित्र बघायला मिळत आहे, ते अत्यंत भयानक आहे. लॉकडाऊनच्या आदेशाची कडक अंमलबजावणी न झाल्याने राज्यातील रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे. राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, कुणाचा पायपोस कुणाला नाही. त्याचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत म्हणून या सरकारने आता तरी जागे होऊन कारभार करावा, यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘महाराष्ट्र बचाओ’ हे आंदोलन राज्यभर केले.

दोन महिन्यांहून अधिक काळ आपण राज्य सरकारचे काम बघत आहोत. या काळात ‘सरकार’ नावाची चीज अस्तित्वात असल्याचे चित्र कुठेही न दिसल्याने आपल्याला सरकारला इशारा देण्यासाठी हे आंदोलन करावे लागले. सरकारवर वचक ठेवणे, हे विरोधी पक्षांचे कामच असते. गेल्या दोन महिन्यांत विविध माध्यमांतून आम्ही राज्य सरकारला कारभारातील चुका आणि त्रुटी दाखवत आहोत. मात्र, त्यातून हेसरकार काहीच बोध घेताना दिसत नाही, असेच चित्र दिसते आहे. मुंबईतील चित्र तर अत्यंत भयानक आहे. कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयांत जागाच नाही.

‘ही वेळ आंदोलनाची नाही,’ असे तोंड वर करून सांगताना राज्यकर्त्यांना थोडीही चाड राहिलेली नाही. सरकारमधील एका मंत्र्याच्या घरात नेऊन विरोधी मत व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्याला अमानुष मारहाण केली जाते, यावरून राज्यकर्ते कोणत्या थराला जाऊ शकतात, याचा अनुभव जनता घेते आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तसेच अन्य माध्यमांतून सरकारला वेगवेगळ्या सूचना केल्या. डॅशबोर्ड बनवून कोणत्या रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती जनतेला द्यावी, यांसारख्या सूचना फडणवीस यांनी केल्या. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीतही आम्ही विविध सूचना केल्या. या सूचनांवर काहीच कार्यवाही केली नाही म्हणून आम्हाला सरकारला इशारा देण्यासाठी आंदोलन करावे लागले. सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवणे आणि चुका, त्रुटी दाखविणे हे विरोधकांचे कर्तव्य असते.

राज्यात शेतमालाची खरेदी थांबली आहे. शेतमाल घरातच पडून आहे. खरिपाचा हंगाम तोंडावर असताना त्याची अवस्था वाईट आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. राज्य सरकारकडून शेतकºयांच्या कापसाची खरेदी केली जात नाही. शेतकºयांच्या बांधावर जाऊन सात-बारा कोरा करू म्हणत शेतकºयांचा विश्वासघात या सरकारने केला आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मानधनाचे वाटप नाही. रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम उपलब्ध नाही. केंद्र सरकारने शेतकºयांसाठी कापूस खरेदी केंद्रे (सीसीआय) सुरू केली आहेत; परंतु नोंदणीकृत सर्व शेतकºयांचा कापूस खरेदी करणे शक्य नसल्याने राज्य सरकारने कापूस खरेदी केंद्रे सुरू करणे आवश्यक आहे. असे असताना राज्य सरकार त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही.

ज्यांचे हातावर पोट आहे, अशांना तत्काळ पॅकेज देण्याची आवश्यकता आहे. देशातील छोट्या-छोट्या राज्यांनीसुद्धा पॅकेज जाहीर करण्यात पुढाकार घेतला. अशात महाराष्ट्रासारखे मोठे राज्य एकाही घटकासाठी एकसुद्धा पॅकेज जाहीर करू शकत नाही, ही बाब वेदनादायी आहे. फळबाग आणि भाजीपाला उत्पादक शेतकºयांना मदतीचा हात नाही. बांधकाम कामगारांना हक्काचे अनुदान नाही. नाभिकबांधव किंवा गटई कामगार यांना सरकारने वाºयावर सोडले आहे. हातावर पोट असणाºया लहान व्यावसायिकांना तसेच हमाल, मापाडी प्रवर्गात काम करणाºयांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत सरकारकडून झालेली नाही. ना कोणत्या घटकाला मदत, ना कोरोनाग्रस्त रुग्णांची काळजी. मृतदेहांशेजारी उपचार, एका खाटेवर दोन रुग्ण! कोविड योद्धयांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी नाही. कोरोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांवरील उपचारांची स्थितीसुद्धा अतिशय वाईट बनली आहे.

आमचे पोलिसबांधव तर प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना त्यातील सुमारे १४०० पोलिसांना लागण, त्यांच्याही उपचारांची काळजी नाही. अतिशय वेदनादायी चित्र आहे. केवळ रुग्णवाहिका नाही म्हणून अनेकांचे मृत्यू होत आहेत. राज्यातले सत्ताधारी केंद्र सरकारच्या पॅकेजवर टीका करतात; पण केंद्राने बँकेत जनधन खाते असलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. गोरगरिबांसाठी अन्नधान्य पाठविले आहे. लाखो गोरगरिबांना उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस दिला जात आहे.

भाजपचे हे आंदोलन सरकारला जागे करण्यासाठी आहे. रुग्णसंख्या ४० हजारांवर गेली असताना आरोग्यसेवेकडे अजूनही सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील. सरकारने आपला कारभार सुधारला नाही, तर भारतीय जनता पक्षाला यापुढील काळात आणखी मोठे आंदोलन करावे लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार