शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

या ‘पुष्पां’ना आवरा! वाळूमाफियांची दहशत ग्रामीण महाराष्ट्र अनुभवतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 06:14 IST

‘प्रयत्ने कण रगडिता वाळूचे तेलही गळे’ या कवितेला वाळू माफियांनी आजवर आपल्या राज्यात उलटे टांगले आहे.

‘प्रयत्ने कण रगडिता वाळूचे तेलही गळे’ या कवितेला वाळू माफियांनी आजवर आपल्या राज्यात उलटे टांगले आहे. कारण आपले वाळूचे धोरण हे सांगते की कुठलेही कष्ट करण्याऐवजी वाममार्गाने दांडगाई करा आणि वाळूतून पैसे कमवा. ‘वाळूमाफिया’ हा गुन्हेगारी शब्द आता ग्रामीण व शहरी भागात रुळला आहे.

आपल्या सरकारांनीही तो रुजू दिला. हे माफिया इतके गब्बर झाले आहेत, की ग्रामपंचायत, महसूल यंत्रणा, पोलिस या कुणालाही न जुमानता ते थेट नदीपात्रात जेसीबी सारखी यंत्रे घेऊन उतरतात. अवाढव्य यंत्रांनी नदी पोखरतात आणि शहरांकडे वाळूच्या डंपरच्या रांगा लावतात.  पोलिस पाटील, सरपंच, तहसीलदार, पोलिस अधिकारी हे सगळे हा उपसा उघड्या डोळ्यांनी पाहत राहतात.

‘पुष्पा’मधल्या चंदन चोरांनाही लाजवेल अशी वाळूमाफियांची दहशत ग्रामीण महाराष्ट्र अनुभवतो आहे. महाराष्ट्र सरकार आता वाळूबाबत नवीन धोरण आणते आहे. त्यास मंत्रिमंडळाने गत आठवड्यात मंजुरी दिली. या धोरणाचा मसुदा जनतेसमोर अजून यावयाचा आहे. पण, या धोरणाने वाळू चोरी थांबून या उत्खननाला शिस्त लागेल असा दावा महसूलमंत्री करत आहेत. खरेच तसे  झाले तर ते गावोगावच्या नद्यांचे भाग्य म्हणायचे. पण, या नव्या धोरणाने तरी नद्या सुरक्षित होतील का? कारण, या धोरणात ही ठेकेदार नावाची जमात राहणारच आहे व अंमलबजावणी करणारी ही तीच महसूल यंत्रणा दिसते.  

नदीतून वाळू उत्खनन करणे, त्यानंतर या वाळूचा डेपो तयार करणे व तेथून पुढे ती नागरिकांना वितरित करणे असे तीन टप्पे नवीन धोरणात दिसतात. आजवरचा अनुभव हे सांगतो की ठेकेदार एक हजार ब्रास वाळूचा ठेका घेतो व प्रत्यक्षात चार हजार ब्रास उपसतो. कारण बहुतांश महसूल यंत्रणाच त्याला सामील असते. वाळू यंत्राने उपसू नका, नदीत सीसीटीव्ही बसवा, तहसीलदारांनी दररोज हे फुटेज तपासावे असे गोंडस नियम यापूर्वीही होते. पण, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी ही तपासणी करण्याची तसदी घेतली नाही. काही प्रामाणिक अधिकाऱ्यांनी हे नियम पाळले.

पण, त्यांच्यावर हल्ले करण्याची मुजोरी तस्करांनी दाखवली. ‘वाळूत लघुशंका केली तरी तिच्या खाणाखुणा उरत नाहीत’ अशा अर्थाची एक ग्रामीण म्हण आहे. ही म्हण या भ्रष्ट साखळीला चपखल लागू पडते. कारण, पाऊस आला की वाळू उपशामुळे नदीत निर्माण झालेले भ्रष्टाचाराचे खड्डे आपोआप बुजतात आणि भ्रष्ट साखळी ही निर्धोक राहते. त्यामुळे महसूलमंत्री आपल्याच यंत्रणेला कशी शिस्त लावणार? यावर या धोरणाचे भवितव्य ठरेल. नागरिकांना ६०० रुपये ब्रासने वाळू मिळेल असेही शासनाचे धोरण आहे. खरेतर वाळू फुकट मिळावी ही नागरिकांची अपेक्षा नव्हती.

ती रास्त दरात असावी व चोरीची नसावी.  घराच्या बांधकाम परवान्यासोबत वाळूची रॉयल्टी प्रत्येक बांधकामामागे घेतल्यास चोरीची वाळूच कुणी घेणार नाही. पण सरकार ठेकेदारांवर अधिक अवलंबून आहे. तेलंगणा राज्यानेही ऑनलाइन वाळू बुकिंगचे धोरण राबविले. कर्नाटक, गुजरात या राज्यांनीही वेळोवेळी धोरणे बदलली. गुजरातमध्ये ड्रोनद्वारे नद्यांवर नजर ठेवली गेली.  संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने २०१८ साली अहवालात सांगितले की भारत व चीन या देशांत वाळूचे गंभीर हॉटस्पॉट निर्माण झाले आहेत. अतिरिक्त वाळू उपशाने अनेक नदीकाठ आटले आहेत.

सन २०२०-२१ मध्ये वाळू उपसा व दंडात्मक कारवाईतून राज्याला २ हजार ७९१ कोटींचा महसूल मिळाला. हे अर्थकारण खूप मोठे आहे. त्यामुळेच या धंद्यात अनेकजण उतरले. काही ठिकाणी नेतेही तस्करीत भागीदार आहेत. तस्करांमुळे गावे गुन्हेगारीच्या विळख्यात सापडली आहेत. गावांमध्येही कट्टे व वाळूच्या गॅंग पोहोचल्या. त्यामुळे महसूलपेक्षा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. वाळू उत्खनन हे समाज व नद्या या दोघांसाठीही घातक ठरत आहे. त्यामुळे वाळूला पर्याय काय देणार आहोत याचाही विचार महसूल विभागाला करावा लागेल. राज्यात क्रश सॅण्ड व वॉश सॅण्डचे ही उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. बांधकाम व्यावसायिकांनी हा पर्याय स्वीकारला आहे. मात्र, या पर्यायी वाळूला बळकटी देण्याबाबत शासन उदासीन दिसते. शासनाला वाळूचे संवर्धन करण्यात रस असायला हवा. निव्वळ वाळू उपशात नको.

टॅग्स :sandवाळू