शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

साहेब, आपलं नेमकं काय चाललंय?

By अतुल कुलकर्णी | Published: February 21, 2018 5:20 AM

आपण भाजपावाल्यांना सुनावले आणि स्वतंत्र लढण्याचा आपल्या पक्षाचा ठराव केला. त्यामुळे गावागावात शिवसैनिकांमध्ये एकदम दांडगा उत्साह संचारलाय.

प्रिय उद्धवराव ठाकरेजी,जय महाराष्टÑ,आपण भाजपावाल्यांना सुनावले आणि स्वतंत्र लढण्याचा आपल्या पक्षाचा ठराव केला. त्यामुळे गावागावात शिवसैनिकांमध्ये एकदम दांडगा उत्साह संचारलाय. हल्ली भाजपाचा कार्यकर्तासुध्दा आपल्या आॅफिससमोरून जाण्याची हिंमत करत नाही. भाजपाने आपल्याला गृहित धरून वागायचं म्हणजे काय गंमत आहे का साहेब? आपण खरं तर यांचे मोठे बंधू. पण ते स्वत:ला मोठा भाऊ मानायला लागले. लहान भावाने मोठ्या भावाची कापडं घातली म्हणून काय तो मोठा भाऊ होतो का साहेब? शेवटी आपणच मोठे आहोत हे खडसावून सांगायची वेळ आलीच. (खडसावून म्हणजे खडसेंचा काही संबंध नाही बरं का साहेब. उलट तुम्ही म्हणालात तर ते आपल्याकडे येतीलही...) बरं झालं तुम्ही आपल्या पक्षाच्या बैठकीत स्वतंत्र लढण्याची भूमिका जाहीर करुन टाकली ते. नाहीतर पुन्हा २०१४ सारखं व्हायचं. भाजपावाल्यांचा काही भरवसा नाही साहेब, आयत्यावेळी हे सांगतील की एवढ्याच जागा देतो, नाहीतर स्वतंत्र लढतो. त्यावेळी शोधाशोध करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तयारी केलेली बरी.कोकणात रिफायनरी होऊ देणार नाही हे सांगायला तुम्ही मुख्यमंत्र्यांना वर्षावर भेटला. लगेच कुजबुजी सुरू झाल्या. आपले खा. संजय राऊत. शरद पवारांना जे हवं तेच ते बोलतात. मिलिंद नार्वेकर पूर्वी सतत मुख्यमंत्र्यांकडे जायचे. आता त्यांना पक्षाचं पद दिलं ते बरं झालं. त्यामुळे तरी ते तिकडे गेल्यास अधिकृत कामासाठी गेले असं बोलता येईल. तेवढ्याच अफवा थांबतील.पण आणखी बºयाच अफवा आहेत साहेब. परवा दादासाहेब भेटले. ते सांगत होते, की भाजपा-शिवसेनेतील भांडणं ही लुटूपुटूची आहेत. तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो हे तुम्ही ठरवून करत आहात असाही त्यांचा आक्षेप होता. त्यासाठी त्यांनी काही तर्कही दिले. त्यांच्या मते तुम्ही दोघं आतून एकच आहात. बाहेर मात्र तुमच्यात फार पटत नाही असं तुम्ही मुद्दाम दाखवता. याआधी तुमच्या मंत्र्यांनी राजीनामे देण्याची घोषणा केली होती. खिशात ठेवलेले राजीनामेही दाखवले होते. पुढे काय झाले त्यांचे...?नंतर कर्जमाफीवरून देखील आम्हाला या असल्या सरकारमध्ये रहायचे नाही असेही तुम्ही घोषित केले होते. मात्र त्याचेही पुढे काहीच झाले नाही. नवी मुंबई विमानतळाच्या कार्यक्रमावर तुम्ही बहिष्कार टाकणार असं तिकडे ठाण्यात आपल्या पक्षाने जाहीर केलं, मात्र ठाण्याचेच मंत्री एकनाथ शिंदे स्वत:च तिकडे हजर होते म्हणे... शिवाय आपले मंत्री सुभाष देसाई देखील बीकेसीमध्ये झालेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्टÑ’ कार्यक्रमात व्यस्त होते. मग आपला बहिष्कार होता की नाही...?२०१७ हे या सरकारमध्ये राहण्याचं शेवटचं वर्ष असेल असं आपले नेते आदित्य ठाकरेंनी जाहीर केलं होतं. आता २०१८ चे दोन महिने संपत आले. काहीच झालं नाही. उलट याच वर्षात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी वर्षावर बंद दाराआड चर्चाही केलीत... त्यामुळे नेमकं काय चालू आहे ते काही केल्या कळत नाही असंही ते म्हणत होते. त्यामुळे आमचा पार केमिकल लोचा झालाय. काय करावं ते जरा सांगता का? आपण नेमकं कुठं आहोत हे जरा समजावून सांगता का साहेब...-अतुल कुलकर्णी

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे