शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

तेच ते आणि तेच ते!

By admin | Updated: October 9, 2015 04:06 IST

राज्यातील गुन्ह्यांच्या तपासाचे काम समाधानकारक आहे, पण शिक्षांचे काम मात्र निराशाजनक असल्याने यात सुधारणा करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे राज्याचे नवे पोलीस

राज्यातील गुन्ह्यांच्या तपासाचे काम समाधानकारक आहे, पण शिक्षांचे काम मात्र निराशाजनक असल्याने यात सुधारणा करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे राज्याचे नवे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी म्हटले असले तरी असा संकल्प सोडणारे ते पहिलेच पोलीस अधिकारी नव्हेत. मुळात त्यांच्या या विधानातील गृहीतक किती लोकाना मान्य होईल याचीच शंका आहे. तपास आणि त्यानंतरची शिक्षा या भानगडीतच पडायचे नाही आणि म्हणून गुन्हे नोंदवूनच घ्यायचे नाहीत, असा नवाच पायंडा पोलीस खात्यात अलीकडच्या काळात रुजू झाला आहे. अगदी अंगाशी येऊ शकेल असेच गुन्हे नोंदविले जातात. ते नोंदविताना भक्कम पंच आणि फुटू न शकणारे साक्षीदार गोळा करण्याचे कष्ट घेतले जात नाहीत. परिणामी अलीकडच्या काळात खुनासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांंमध्येही खून तर झाला, पण तो कोणीच केला नाही, कारण सारेच दोषमुक्त, अशी चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचे आढळून येते. त्याचबरोबर न्यायालयीन प्रक्रियेतील दिरंगाईमुळेही अनेकदा गुन्हेगार मोकळे सुटण्याचे आढळून येते. कारण साक्षीदार कितीही पक्का असला तरी संबंधित घटना घडून गेल्यानंतर दीर्घ काळाने सारा तपशील त्याच्या स्मरणात राहतोच असे नसल्याने गुन्हेगाराचा वकील त्याचाच लाभ घेत असतो. पोलीस महासांचालक याबाबत फारसे काही करु शकतील अशी स्थिती नाही. सरकारच्या कायदा खात्याशी चर्चा करुनही याबाबत फारसे काही हाती लागू शकेल अशी स्थिती नाही. सर्वोच्च न्यायालयाने वा मुंबई उच्च न्यायालयाने काही मनावर घेतले तरच महाराष्ट्रातील गुन्हे सिद्ध होणे आणि गुन्हेगारांना शिक्षा होणे, याबाबत काही होऊ शकेल. दीक्षित यांचा दुसरा संकल्प आहे पोलीस जनतेला आपला मित्र वाटेल अशी स्थिती निर्माण करण्याचा. राज्याचे एक माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी याबाबत त्यांचे स्पष्ट मत व्यक्त करताना असे म्हटले होते की, जनतेला पोलिसांचा धाकच वाटला पाहिजे. मित्र वाटण्याचे काही कारण नाही. कालांतराने पोलीस दलाने शंकररावांचे हे विधान मनावर घेऊन तशी स्थिती निर्माण करुन ठेवली. त्यामुळे पापभीरु जनसामान्यांना खरोखरी पोलिसांचा धाक वाटू लागला! पोलीस आणि जनता यांच्यात जवळीकीचे नाते निर्माण व्हावे आणि गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी दीक्षित यांच्या पूर्वसुरींनी ‘आपला शेजारी, खरा पाहरेकरी’ किंवा मोहल्ला कमिटी आदिसारख्या योजना अस्तित्वात आणून पाहिल्या. त्यांचा परिणाम तेवढ्यापुरता जाणवलाही असेल पण पुढे पहिले पाढे पंचावन्न. याचा अर्थ नव्याने याबाबत कोणी प्रयत्म करुच नयेत असे मात्र नाही.