शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

रूप आणि रुपया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 04:34 IST

शरीर निरोगी, तंदुरुस्त राहावे यासाठी केलेला हा प्रयत्न चुकीचा नाही

- नीता ब्रह्मकुमारी

शहरातील धावते जीवन, रस्त्यावर वाहनांची गर्दी, फेरीवाल्यांचे वेगवेगळे आवाज, मनामध्ये कामाची वर्दळ... असे हे आजचे मानवी जीवन. कधी कधी प्रश्न पडतो की ही धावपळ कोणासाठी, कशासाठी? आज भले कोणी श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येक जण रूप आणि रुपयाच्या मागे धावत आहे. एक वेळ अशी होती की लोक सकाळी लवकर उठून काकड आरतीसाठी मंदिरामध्ये पोहोचायचे आणि मग आपल्या दैनंदिन कार्यक्रमाची सुरुवात करायचे, पण आज तरुण असो की वृद्ध, सगळे एखाद्या उद्यानामध्ये मॉर्निंग वॉक करताना दिसून येतात.

शरीर निरोगी, तंदुरुस्त राहावे यासाठी केलेला हा प्रयत्न चुकीचा नाही, परंतु शरीराची जशी काळजी घेतली जाते तशी मनाची काळजी घेणे हेही तितकेच गरजेचे आहे. कारण आपल्या प्रत्येक विचारांचा परिणाम शरीराच्या अनेकानेक अवयवांवर सतत होत असतो. संपूर्ण दिवसामध्ये आपण काय आणि किती खावे, याची जागृती सध्या वाढत चालली आहे.

एखादा पदार्थ खाल्ल्याने किती चरबी वाढते, किती जीवनसत्त्वे मिळतात याचा चार्ट सतत बघितला जातो. पण या मनामध्ये कितीतरी व्यर्थ, नकारात्मक विचार चालतात व त्याचाच परिणाम म्हणून आज मधुमेह, रक्तदाब, कर्करोग असे नानाविध आजार शरीरात घर करत आहेत. आपण हे जाणतो की तन आणि धन (रूप आणि रुपया) या दोन्ही गोष्टींपासून लाभणारे सुख क्षणभंगुर आहे. याची जीवनात नितांत गरज आहे, परंतु जितकी आवश्यकता आहे तितकेच आपल्याजवळ असावे. पैसै आणि शरीराचा मोह अतिशय हानिकारक आहे. व्यक्ती हा रूपाने सुंदर असण्यापेक्षा गुणाने सुंदर असला तर जीवन सुंदर बनते. पैसा खूप असला तरी सरळ मार्गाने त्याची प्राप्ती केली नसेल तर तो सुख लाभू देत नाही. मनुष्य आपली व्यक्तिरेखा रूप आणि रुपया या दोघांनी बनवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु या दोन्ही कालांतराने आपल्यापासून दूर जातील.

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य