शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

रूप आणि रुपया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 04:34 IST

शरीर निरोगी, तंदुरुस्त राहावे यासाठी केलेला हा प्रयत्न चुकीचा नाही

- नीता ब्रह्मकुमारी

शहरातील धावते जीवन, रस्त्यावर वाहनांची गर्दी, फेरीवाल्यांचे वेगवेगळे आवाज, मनामध्ये कामाची वर्दळ... असे हे आजचे मानवी जीवन. कधी कधी प्रश्न पडतो की ही धावपळ कोणासाठी, कशासाठी? आज भले कोणी श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येक जण रूप आणि रुपयाच्या मागे धावत आहे. एक वेळ अशी होती की लोक सकाळी लवकर उठून काकड आरतीसाठी मंदिरामध्ये पोहोचायचे आणि मग आपल्या दैनंदिन कार्यक्रमाची सुरुवात करायचे, पण आज तरुण असो की वृद्ध, सगळे एखाद्या उद्यानामध्ये मॉर्निंग वॉक करताना दिसून येतात.

शरीर निरोगी, तंदुरुस्त राहावे यासाठी केलेला हा प्रयत्न चुकीचा नाही, परंतु शरीराची जशी काळजी घेतली जाते तशी मनाची काळजी घेणे हेही तितकेच गरजेचे आहे. कारण आपल्या प्रत्येक विचारांचा परिणाम शरीराच्या अनेकानेक अवयवांवर सतत होत असतो. संपूर्ण दिवसामध्ये आपण काय आणि किती खावे, याची जागृती सध्या वाढत चालली आहे.

एखादा पदार्थ खाल्ल्याने किती चरबी वाढते, किती जीवनसत्त्वे मिळतात याचा चार्ट सतत बघितला जातो. पण या मनामध्ये कितीतरी व्यर्थ, नकारात्मक विचार चालतात व त्याचाच परिणाम म्हणून आज मधुमेह, रक्तदाब, कर्करोग असे नानाविध आजार शरीरात घर करत आहेत. आपण हे जाणतो की तन आणि धन (रूप आणि रुपया) या दोन्ही गोष्टींपासून लाभणारे सुख क्षणभंगुर आहे. याची जीवनात नितांत गरज आहे, परंतु जितकी आवश्यकता आहे तितकेच आपल्याजवळ असावे. पैसै आणि शरीराचा मोह अतिशय हानिकारक आहे. व्यक्ती हा रूपाने सुंदर असण्यापेक्षा गुणाने सुंदर असला तर जीवन सुंदर बनते. पैसा खूप असला तरी सरळ मार्गाने त्याची प्राप्ती केली नसेल तर तो सुख लाभू देत नाही. मनुष्य आपली व्यक्तिरेखा रूप आणि रुपया या दोघांनी बनवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु या दोन्ही कालांतराने आपल्यापासून दूर जातील.

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य