शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

रस्ते अपघात; निष्क्रिय यंत्रणेचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:28 IST

२०२० पर्यंत सरकारला बरेच काही करायचे आहे़ त्यात अपघातातील हानी ५० टक्क्यांवर कमी करायची आहे़ जे प्रत्यक्षात जवळपासही दिसत नाही़

- धर्मराज हल्लाळेनिवडणुका २०१९ मध्ये असल्या तरी केंद्रातील विद्यमान सरकार २०२० पर्यंत बरेच काही करू शकते, असे त्यांच्या घोषणा सांगतात़ त्यातीलच एक महत्त्वाची घोषणा ९ जून २०१६ रोजी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली़ देशात रस्ते अपघातामध्ये मोठी जीवितहानी होते़ जवळपास वर्षाला ५ लाख अपघात होतात़ त्यात १ लाख ८० हजार लोक मृत्युमुखी पडतात़ ज्यामध्ये १८ ते ४५ या वयोगटातील ६९ टक्के नागरिकांचा बळी जातो़गेल्या अनेक वर्षातील आकडेवारीचे विश्लेषण केले तर वर्षाला अपघात अन् मृत्यूंची संख्या वाढली आहे़ वाहनांच्या अमर्याद वेगामुळे ६१ टक्के अपघात होतात़ ओव्हरटेक, मद्यप्राशन, मोबाईलचा वापर अशी वेगवेगळी कारणे अलीकडे दिसत आहेत़ त्यावर दंडात्मक वाढ तसेच कायदेशीर कारवाई कठोरपणे करण्याचा निर्णय केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांनी घेतला, ही बाब स्वागतार्ह आहे़ काही कालावधी उलटल्यानंतर त्याचे चांगले परिणामही समोर येतील़ जानेवारी ते जून २०१६ मध्ये महाराष्ट्रात २१ हजार ३६५ अपघात झाले़ तर उपरोक्त कालावधीत २०१७ मध्ये अपघातांची संख्या १८ हजार ७३० वर आली आहे़ त्यामुळे ५० टक्क्यांनी अपघात कमी होण्याची घोषणा पूर्णत: सफल होणे जवळपास दिसत नाही़ तरीही काहीशी संख्या घटली हे मान्य करावे लागेल़ मात्र हा बदल राष्ट्रीय महामार्ग, विशेषत: मोठ्या शहरांना जोडणा-या महामार्गावरील नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे आहे़ गेल्या तीन-चार वर्षांत नव्याने घोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात उलट दिवसेंदिवस वाढत आहेत़ रत्नागिरी ते नागपूर जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा सोलापूर - लातूर ते नांदेड यादरम्यान अधिक धोकादायक बनला आहे़ मराठवाड्यातील सर्वाधिक अपघात होणारा रस्ता अशी त्याची ख्याती आहे़ राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यानंतर काही भागात रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झाले़ परंतु, अरुंद रस्ता, साईडपट्ट्या न भरलेल्या, वाहनांचा अमर्याद वेग आणि बेमुर्वतपणे वाहन चालविणारे चालक या सर्वांचा परिणाम म्हणून लातूर-नांदेड या १३५ किलोमीटर अंतरात वर्षाला बळींचा आकडा शतक पार करतो़ गेल्या पंधरवड्यात लातूर जिल्ह्यात १७ जणांनी प्राण गमावले़नव्याने घोषित झालेले राष्ट्रीय महामार्ग धोकादायक आहेतच, त्यात राज्य महामार्ग तर मृत्यूचे सापळे बनले आहेत़ सर्वात सुरक्षित समजल्या जाणाºया एसटीचा प्रवासही धडकी भरविणारा ठरत आहे़ देशात दिवसाला चारशेच्या वर लोक अपघाताचे बळी ठरतात़ त्यात महाराष्ट्र दुसºया स्थानावर असून, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येनंतर मृत्यूचे सर्वात मोठे कारण अपघात आहे़ महामार्ग पोलीस, स्थानिक पोलिसांचे संख्याबळ कमी पडते़ कारवाई करणाºया पोलिसांच्या अंगावर वाहन नेण्याइतपत धारिष्ट्य काही प्रसंगांमध्ये दिसले आहे़ दंडात्मक कारवाई वाढली आहे़ महाराष्ट्र महामार्ग सुरक्षा विभागाने जानेवारी ते जून २०१७ या कालावधीत ७४ कोटींचा दंड वसूल केला आहे़ तरीही सेव्ह लाईफ फाऊंडेशन, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांची आकडेवारी अंगावर शहारे आणणारी आहे़ तरुण, कर्तबगार नागरिक रस्त्यावरचे बळी ठरत आहेत़ महानगरांना जोडणाºया महामार्गांवरील अपघातातील बळींचे जितके मोल तितकेच जिल्ह्यांना जोडणा-या रस्त्यावरील मनुष्य हानीचे मोल निष्क्रिय यंत्रणा करणार आहे की नाही, हा सवाल आहे़

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गGovernmentसरकार