शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघात; निष्क्रिय यंत्रणेचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:28 IST

२०२० पर्यंत सरकारला बरेच काही करायचे आहे़ त्यात अपघातातील हानी ५० टक्क्यांवर कमी करायची आहे़ जे प्रत्यक्षात जवळपासही दिसत नाही़

- धर्मराज हल्लाळेनिवडणुका २०१९ मध्ये असल्या तरी केंद्रातील विद्यमान सरकार २०२० पर्यंत बरेच काही करू शकते, असे त्यांच्या घोषणा सांगतात़ त्यातीलच एक महत्त्वाची घोषणा ९ जून २०१६ रोजी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली़ देशात रस्ते अपघातामध्ये मोठी जीवितहानी होते़ जवळपास वर्षाला ५ लाख अपघात होतात़ त्यात १ लाख ८० हजार लोक मृत्युमुखी पडतात़ ज्यामध्ये १८ ते ४५ या वयोगटातील ६९ टक्के नागरिकांचा बळी जातो़गेल्या अनेक वर्षातील आकडेवारीचे विश्लेषण केले तर वर्षाला अपघात अन् मृत्यूंची संख्या वाढली आहे़ वाहनांच्या अमर्याद वेगामुळे ६१ टक्के अपघात होतात़ ओव्हरटेक, मद्यप्राशन, मोबाईलचा वापर अशी वेगवेगळी कारणे अलीकडे दिसत आहेत़ त्यावर दंडात्मक वाढ तसेच कायदेशीर कारवाई कठोरपणे करण्याचा निर्णय केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांनी घेतला, ही बाब स्वागतार्ह आहे़ काही कालावधी उलटल्यानंतर त्याचे चांगले परिणामही समोर येतील़ जानेवारी ते जून २०१६ मध्ये महाराष्ट्रात २१ हजार ३६५ अपघात झाले़ तर उपरोक्त कालावधीत २०१७ मध्ये अपघातांची संख्या १८ हजार ७३० वर आली आहे़ त्यामुळे ५० टक्क्यांनी अपघात कमी होण्याची घोषणा पूर्णत: सफल होणे जवळपास दिसत नाही़ तरीही काहीशी संख्या घटली हे मान्य करावे लागेल़ मात्र हा बदल राष्ट्रीय महामार्ग, विशेषत: मोठ्या शहरांना जोडणा-या महामार्गावरील नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे आहे़ गेल्या तीन-चार वर्षांत नव्याने घोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात उलट दिवसेंदिवस वाढत आहेत़ रत्नागिरी ते नागपूर जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा सोलापूर - लातूर ते नांदेड यादरम्यान अधिक धोकादायक बनला आहे़ मराठवाड्यातील सर्वाधिक अपघात होणारा रस्ता अशी त्याची ख्याती आहे़ राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यानंतर काही भागात रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झाले़ परंतु, अरुंद रस्ता, साईडपट्ट्या न भरलेल्या, वाहनांचा अमर्याद वेग आणि बेमुर्वतपणे वाहन चालविणारे चालक या सर्वांचा परिणाम म्हणून लातूर-नांदेड या १३५ किलोमीटर अंतरात वर्षाला बळींचा आकडा शतक पार करतो़ गेल्या पंधरवड्यात लातूर जिल्ह्यात १७ जणांनी प्राण गमावले़नव्याने घोषित झालेले राष्ट्रीय महामार्ग धोकादायक आहेतच, त्यात राज्य महामार्ग तर मृत्यूचे सापळे बनले आहेत़ सर्वात सुरक्षित समजल्या जाणाºया एसटीचा प्रवासही धडकी भरविणारा ठरत आहे़ देशात दिवसाला चारशेच्या वर लोक अपघाताचे बळी ठरतात़ त्यात महाराष्ट्र दुसºया स्थानावर असून, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येनंतर मृत्यूचे सर्वात मोठे कारण अपघात आहे़ महामार्ग पोलीस, स्थानिक पोलिसांचे संख्याबळ कमी पडते़ कारवाई करणाºया पोलिसांच्या अंगावर वाहन नेण्याइतपत धारिष्ट्य काही प्रसंगांमध्ये दिसले आहे़ दंडात्मक कारवाई वाढली आहे़ महाराष्ट्र महामार्ग सुरक्षा विभागाने जानेवारी ते जून २०१७ या कालावधीत ७४ कोटींचा दंड वसूल केला आहे़ तरीही सेव्ह लाईफ फाऊंडेशन, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांची आकडेवारी अंगावर शहारे आणणारी आहे़ तरुण, कर्तबगार नागरिक रस्त्यावरचे बळी ठरत आहेत़ महानगरांना जोडणाºया महामार्गांवरील अपघातातील बळींचे जितके मोल तितकेच जिल्ह्यांना जोडणा-या रस्त्यावरील मनुष्य हानीचे मोल निष्क्रिय यंत्रणा करणार आहे की नाही, हा सवाल आहे़

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गGovernmentसरकार