शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

रस्ते अपघात; निष्क्रिय यंत्रणेचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:28 IST

२०२० पर्यंत सरकारला बरेच काही करायचे आहे़ त्यात अपघातातील हानी ५० टक्क्यांवर कमी करायची आहे़ जे प्रत्यक्षात जवळपासही दिसत नाही़

- धर्मराज हल्लाळेनिवडणुका २०१९ मध्ये असल्या तरी केंद्रातील विद्यमान सरकार २०२० पर्यंत बरेच काही करू शकते, असे त्यांच्या घोषणा सांगतात़ त्यातीलच एक महत्त्वाची घोषणा ९ जून २०१६ रोजी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली़ देशात रस्ते अपघातामध्ये मोठी जीवितहानी होते़ जवळपास वर्षाला ५ लाख अपघात होतात़ त्यात १ लाख ८० हजार लोक मृत्युमुखी पडतात़ ज्यामध्ये १८ ते ४५ या वयोगटातील ६९ टक्के नागरिकांचा बळी जातो़गेल्या अनेक वर्षातील आकडेवारीचे विश्लेषण केले तर वर्षाला अपघात अन् मृत्यूंची संख्या वाढली आहे़ वाहनांच्या अमर्याद वेगामुळे ६१ टक्के अपघात होतात़ ओव्हरटेक, मद्यप्राशन, मोबाईलचा वापर अशी वेगवेगळी कारणे अलीकडे दिसत आहेत़ त्यावर दंडात्मक वाढ तसेच कायदेशीर कारवाई कठोरपणे करण्याचा निर्णय केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांनी घेतला, ही बाब स्वागतार्ह आहे़ काही कालावधी उलटल्यानंतर त्याचे चांगले परिणामही समोर येतील़ जानेवारी ते जून २०१६ मध्ये महाराष्ट्रात २१ हजार ३६५ अपघात झाले़ तर उपरोक्त कालावधीत २०१७ मध्ये अपघातांची संख्या १८ हजार ७३० वर आली आहे़ त्यामुळे ५० टक्क्यांनी अपघात कमी होण्याची घोषणा पूर्णत: सफल होणे जवळपास दिसत नाही़ तरीही काहीशी संख्या घटली हे मान्य करावे लागेल़ मात्र हा बदल राष्ट्रीय महामार्ग, विशेषत: मोठ्या शहरांना जोडणा-या महामार्गावरील नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे आहे़ गेल्या तीन-चार वर्षांत नव्याने घोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात उलट दिवसेंदिवस वाढत आहेत़ रत्नागिरी ते नागपूर जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा सोलापूर - लातूर ते नांदेड यादरम्यान अधिक धोकादायक बनला आहे़ मराठवाड्यातील सर्वाधिक अपघात होणारा रस्ता अशी त्याची ख्याती आहे़ राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यानंतर काही भागात रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झाले़ परंतु, अरुंद रस्ता, साईडपट्ट्या न भरलेल्या, वाहनांचा अमर्याद वेग आणि बेमुर्वतपणे वाहन चालविणारे चालक या सर्वांचा परिणाम म्हणून लातूर-नांदेड या १३५ किलोमीटर अंतरात वर्षाला बळींचा आकडा शतक पार करतो़ गेल्या पंधरवड्यात लातूर जिल्ह्यात १७ जणांनी प्राण गमावले़नव्याने घोषित झालेले राष्ट्रीय महामार्ग धोकादायक आहेतच, त्यात राज्य महामार्ग तर मृत्यूचे सापळे बनले आहेत़ सर्वात सुरक्षित समजल्या जाणाºया एसटीचा प्रवासही धडकी भरविणारा ठरत आहे़ देशात दिवसाला चारशेच्या वर लोक अपघाताचे बळी ठरतात़ त्यात महाराष्ट्र दुसºया स्थानावर असून, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येनंतर मृत्यूचे सर्वात मोठे कारण अपघात आहे़ महामार्ग पोलीस, स्थानिक पोलिसांचे संख्याबळ कमी पडते़ कारवाई करणाºया पोलिसांच्या अंगावर वाहन नेण्याइतपत धारिष्ट्य काही प्रसंगांमध्ये दिसले आहे़ दंडात्मक कारवाई वाढली आहे़ महाराष्ट्र महामार्ग सुरक्षा विभागाने जानेवारी ते जून २०१७ या कालावधीत ७४ कोटींचा दंड वसूल केला आहे़ तरीही सेव्ह लाईफ फाऊंडेशन, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांची आकडेवारी अंगावर शहारे आणणारी आहे़ तरुण, कर्तबगार नागरिक रस्त्यावरचे बळी ठरत आहेत़ महानगरांना जोडणाºया महामार्गांवरील अपघातातील बळींचे जितके मोल तितकेच जिल्ह्यांना जोडणा-या रस्त्यावरील मनुष्य हानीचे मोल निष्क्रिय यंत्रणा करणार आहे की नाही, हा सवाल आहे़

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गGovernmentसरकार