शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रस्ते अपघात; निष्क्रिय यंत्रणेचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:28 IST

२०२० पर्यंत सरकारला बरेच काही करायचे आहे़ त्यात अपघातातील हानी ५० टक्क्यांवर कमी करायची आहे़ जे प्रत्यक्षात जवळपासही दिसत नाही़

- धर्मराज हल्लाळेनिवडणुका २०१९ मध्ये असल्या तरी केंद्रातील विद्यमान सरकार २०२० पर्यंत बरेच काही करू शकते, असे त्यांच्या घोषणा सांगतात़ त्यातीलच एक महत्त्वाची घोषणा ९ जून २०१६ रोजी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली़ देशात रस्ते अपघातामध्ये मोठी जीवितहानी होते़ जवळपास वर्षाला ५ लाख अपघात होतात़ त्यात १ लाख ८० हजार लोक मृत्युमुखी पडतात़ ज्यामध्ये १८ ते ४५ या वयोगटातील ६९ टक्के नागरिकांचा बळी जातो़गेल्या अनेक वर्षातील आकडेवारीचे विश्लेषण केले तर वर्षाला अपघात अन् मृत्यूंची संख्या वाढली आहे़ वाहनांच्या अमर्याद वेगामुळे ६१ टक्के अपघात होतात़ ओव्हरटेक, मद्यप्राशन, मोबाईलचा वापर अशी वेगवेगळी कारणे अलीकडे दिसत आहेत़ त्यावर दंडात्मक वाढ तसेच कायदेशीर कारवाई कठोरपणे करण्याचा निर्णय केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांनी घेतला, ही बाब स्वागतार्ह आहे़ काही कालावधी उलटल्यानंतर त्याचे चांगले परिणामही समोर येतील़ जानेवारी ते जून २०१६ मध्ये महाराष्ट्रात २१ हजार ३६५ अपघात झाले़ तर उपरोक्त कालावधीत २०१७ मध्ये अपघातांची संख्या १८ हजार ७३० वर आली आहे़ त्यामुळे ५० टक्क्यांनी अपघात कमी होण्याची घोषणा पूर्णत: सफल होणे जवळपास दिसत नाही़ तरीही काहीशी संख्या घटली हे मान्य करावे लागेल़ मात्र हा बदल राष्ट्रीय महामार्ग, विशेषत: मोठ्या शहरांना जोडणा-या महामार्गावरील नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे आहे़ गेल्या तीन-चार वर्षांत नव्याने घोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात उलट दिवसेंदिवस वाढत आहेत़ रत्नागिरी ते नागपूर जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा सोलापूर - लातूर ते नांदेड यादरम्यान अधिक धोकादायक बनला आहे़ मराठवाड्यातील सर्वाधिक अपघात होणारा रस्ता अशी त्याची ख्याती आहे़ राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यानंतर काही भागात रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झाले़ परंतु, अरुंद रस्ता, साईडपट्ट्या न भरलेल्या, वाहनांचा अमर्याद वेग आणि बेमुर्वतपणे वाहन चालविणारे चालक या सर्वांचा परिणाम म्हणून लातूर-नांदेड या १३५ किलोमीटर अंतरात वर्षाला बळींचा आकडा शतक पार करतो़ गेल्या पंधरवड्यात लातूर जिल्ह्यात १७ जणांनी प्राण गमावले़नव्याने घोषित झालेले राष्ट्रीय महामार्ग धोकादायक आहेतच, त्यात राज्य महामार्ग तर मृत्यूचे सापळे बनले आहेत़ सर्वात सुरक्षित समजल्या जाणाºया एसटीचा प्रवासही धडकी भरविणारा ठरत आहे़ देशात दिवसाला चारशेच्या वर लोक अपघाताचे बळी ठरतात़ त्यात महाराष्ट्र दुसºया स्थानावर असून, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येनंतर मृत्यूचे सर्वात मोठे कारण अपघात आहे़ महामार्ग पोलीस, स्थानिक पोलिसांचे संख्याबळ कमी पडते़ कारवाई करणाºया पोलिसांच्या अंगावर वाहन नेण्याइतपत धारिष्ट्य काही प्रसंगांमध्ये दिसले आहे़ दंडात्मक कारवाई वाढली आहे़ महाराष्ट्र महामार्ग सुरक्षा विभागाने जानेवारी ते जून २०१७ या कालावधीत ७४ कोटींचा दंड वसूल केला आहे़ तरीही सेव्ह लाईफ फाऊंडेशन, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांची आकडेवारी अंगावर शहारे आणणारी आहे़ तरुण, कर्तबगार नागरिक रस्त्यावरचे बळी ठरत आहेत़ महानगरांना जोडणाºया महामार्गांवरील अपघातातील बळींचे जितके मोल तितकेच जिल्ह्यांना जोडणा-या रस्त्यावरील मनुष्य हानीचे मोल निष्क्रिय यंत्रणा करणार आहे की नाही, हा सवाल आहे़

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गGovernmentसरकार