शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 5:35 AM

सध्या रिझर्व्ह बँकेचा ९.४१ लाख कोटी निधी हा एकूण संपत्तीच्या सात टक्के म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडा जास्त आहे. अशा स्थितीत सरकारने रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीवर डोळा ठेवणे कितपत औचित्यपूर्ण आहे हा खरा प्रश्न आहे.

रिझर्व्ह बँकेने आपल्या राखीव निधीमधून १.७६ लाख कोटी सरकारला देण्याचे ठरविले आहे. खरे तर हा निर्णय रिझर्व्ह बँकेने स्वेच्छेने घेतला नसून बिमल जालान समितीच्या शिफारसवजा दबावामुळे घेतला आहे. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेमध्ये रघुराम राजन यांच्या काळापासून गेल्या पाच वर्षांत सुरू असलेल्या शीतयुद्धाची ती परिणती आहे. यात सरकार रिझर्व्ह बँकेवर कुरघोडी करण्यात यशस्वी ठरले असे सकृतदर्शनी दिसत असले तरी रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे हे स्पष्ट आहे.

रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी हा अडचणीत आलेल्या बँकांना तारण्यासाठी असतो व वेळोवेळी त्यातून कमजोर झालेल्या बँकांना सशक्त करण्यासाठी भांडवल दिले जात असते. याचे उत्कृष्ट उदाहरण १९९६ मधील चेन्नईच्या इंडियन बँकेला १४०० कोटी एकमुश्त भांडवल देण्याचे आहे. जयललिता मुख्यमंत्री असताना कर्ज मेळाव्याद्वारे जे कर्जवाटप झाले ते परत आले नाही़ त्यामुळे इंडियन बँक दुर्बल झाली होती व तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी अर्थसंकल्पात तरतूद केली नाही म्हणून रिझर्व्ह बँकेला विनंती केली होती व रिझर्व्ह बँकेनेही ती स्वीकारली होती. आजच्या घडीला रिझर्व्ह बँकेजवळ २.५० लाख कोटी आकस्मिक तरतूद निधी (काँटीन्ज सी फंड) आहे व रिझर्व्ह बँकेजवळ जे सोने व विदेशी चलन आहे ते ६.९१ लाख कोटींचे आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचा एकूण राखीव निधी ९.४१ लाख कोटी आहे. १९९७ साली स्थापन झालेल्या एका वित्त समितीने सर्व बँकांच्या एकूण संपत्तीच्या १२ टक्के राखीव निधी रिझर्व्ह बँकेने ठेवावा, अशी शिफारस केली होती. खरे तर सरकारला दरवर्षी रिझर्व्ह बँकेकडून सरकारी भांडवलावरील लाभांश मिळत असतो व तो सतत वाढता आहे. २०१४-१५ मध्ये सरकारला ६६,००० कोटी, २०१५-१६ मध्ये पुन्हा ६६,००० कोटी २०१६-१७ मध्ये नोटाबंदीमुळे ३१,००० कोटी, २०१७-१८ मध्ये ५०,००० कोटी व २०१८-१९ मध्ये ६८,००० कोटी असा लाभांश सरकारला मिळाला आहे. तरीही गेल्या पाच वर्षांपासून सरकारने रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी सरकारकडे हस्तांतरित करण्याचा धोशा लावला आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेचे दोन गव्हर्नर रघुराम राजन व ऊर्जित पटेल आणि डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य राजीनामा देऊन गेल्या तीन वर्षांत बाहेर पडले आहेत.

आचार्य यांनी राजीनामा देताना रिझर्व्ह बँक स्वतंत्र तर नाहीच, स्वायत्तसुद्धा नाही, असे खोचक विधान केले होते. सरकारला रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी का हवा आहे, या प्रश्नाचे उत्तर सरकारचा कमी होत चाललेला महसूल व वाढता योजना खर्च आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एकीकडे विकासदर सतत वाढत आहे, असा दावा करत असताना महसूल कमी झाला हे मात्र सरकारने गेली पाच वर्षे कधीच मान्य केले नाही. परिणामी अर्थसंकल्पीय तूट सतत वाढत आहे. सध्या ही तूट जीडीपीच्या ३.८० टक्के म्हणजे जवळपास ७.५० लाख कोटी झाली आहे आणि म्हणून सरकारला रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी हवा आहे. अर्थसंकल्पीय तूट वाढणे हे अर्थव्यवस्था मंदीत असल्याचे लक्षण आहे. देशातील बेरोजगारीचा दर ६.१० टक्के म्हणजे बेरोजगारांचा आकडा ७.८० कोटींवर गेला आहे. वाहन उद्योगात प्रचंड मंदी आली आहे़ वाहन कंपन्यांनी कामगार कपात सुरू केली आहे. गेल्या एक वर्षात १.१० कोटी लोक बेकार झाले आहेत. त्यापैकी एकट्या वाहन क्षेत्रातील पाच लाख लोक आहेत. एवढेच नव्हे तर १८ सरकारी बँकांचे थकीत कर्ज १० लाख कोटींपेक्षा अधिक झाले आहे.

चीन-अमेरिका व्यापारयुद्धाचा परिणाम अर्थव्यवस्था मंदावण्यात झाला आहे आणि परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अशा स्थितीत सरकारी व इतर बँकांना तारण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी सरकारकडे हस्तांतरित करावा, अशी शिफारस बिमल जालान समितीने केली आहे आणि ती रिझर्व्ह बँकेने त्वरित स्वीकारून १.७६ लाख कोटी सरकारला देण्याचे ठरवले आहे. वरकरणी हे सर्व आलबेल वाटत असले तरी अर्थव्यवस्था व बँकांचा आधार अनवधानाने नाहीसा होण्याची शक्यता बळावली आहे. भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्येच्या देशासाठी ही खचितच आनंदाची बाब नव्हे!

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक