शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

शापातून मुक्ती द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:53 PM

केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या कार्यान्वयन समारंभाच्या निमित्ताने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जल संधारण मंत्री नितीन गडकरी रविवारी पश्चिम विदर्भात पायधूळ झाडून गेले. रविवारी एकाच दिवशी राज्यातील तब्बल १०४ सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वाकडील वाटचालीस प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये एकट्या विदर्भातील ७८ प्रकल्पांचा समावेश आहे.

केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या कार्यान्वयन समारंभाच्या निमित्ताने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जल संधारण मंत्री नितीन गडकरी रविवारी पश्चिम विदर्भात पायधूळ झाडून गेले. रविवारी एकाच दिवशी राज्यातील तब्बल १०४ सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वाकडील वाटचालीस प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये एकट्या विदर्भातील ७८ प्रकल्पांचा समावेश आहे. शेतकरी आत्महत्यांचा शाप लाभलेल्या विदर्भासाठी ही आनंदाची बातमी आहे. या भागाला शेतकरी आत्महत्यांच्या शापातून मुक्त करायचे असेल, तर सिंचनाच्या सोयी वाढविण्याशिवाय तरणोपाय नाही. दुर्दैवाने आतापर्यंत सिंचन सुविधा वाढविण्यासाठी घोषणाबाजी खूप झाली; पण प्रत्यक्षात नगण्य कामे झाली. परिणामी, विदर्भाचा सिंचन अनुशेष वाढताच राहिला. सुदैवाने सध्या केंद्र सरकारचे जल संधारण मंत्रालय आणि राज्याचे मुख्यमंत्री पद, विकासाची दूरदृष्टी, कल्पकता आणि धडाडी असलेल्या विदर्भाच्या दोन सुपुत्रांकडे आहे. त्यामुळे निकटच्या भविष्यात विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जातील आणि विदर्भाच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसल्या जाईल, अशी आशा करण्यास हरकत नाही; मात्र विदर्भातील सिंचन प्रकल्पांची आजवरची वाटचाल बघून, मनात कुठे तरी शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही. यापूर्वी विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी प्रकल्पांच्या घोषणा झाल्या नाहीत, असे अजिबात नाही. अनेक लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पांचे स्वप्न विदर्भाला वेळोवेळी दाखविण्यात आले. दुर्दैवाने गोसेखुर्द, जिगाव, निम्न पैनगंगासारख्या मोठ्या प्रकल्पांची कामे, घोषणेस दोन-तीन दशके उलटूनही पूर्णत्वास गेली नाहीत. मोठे प्रकल्प तर सोडाच; पण अनेक लघु प्रकल्पही, विहित मुदतीत पूर्ण होऊ शकले नाहीत. दरम्यानच्या काळात या प्रकल्पांच्या किमती कितीतरी पटीने वाढल्या आहेत. त्यामधील भ्रष्टाचाराच्या सुरस कथा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठ्या चवीने चघळल्या जातात. गेल्याच आठवड्यात सिंचन घोटाळ्यांशी संबंधित आणखी चार प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल झाले. एकीकडे जुन्या सरकारच्या कार्यकाळातील घोटाळ्यांची चौकशी सुरू होत असताना, दुसरीकडे रखडलेल्या प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्याची कामे सुरू होत आहेत. चौकशीतून काय निष्पन्न व्हायचे ते होत राहील; पण आता तरी कालमर्यादा निश्चित करून सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करा आणि या भूमीला शेतकरी आत्महत्यांच्या शापातून मुक्ती द्या, एवढीच फडणवीस-गडकरी जोडगोळीकडून अपेक्षा आहे!

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या