शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

राष्ट्रीयकृत बँका घेताहेत ‘राजाचा बळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 02:38 IST

मृगाचा पहिला थेंब पृथ्वीवर पडताच काळ्या मातीसह पशु, पक्षी सारेच सुखावतात. पण याच वेळी चिंतातुर होतो तो शेतकरी. त्याला चिंता लागते ती पेरणीची. खरे तर एप्रिल महिन्यातच शेतीची मशागत सुरू होते.

- कमलेश वानखेडेमृगाचा पहिला थेंब पृथ्वीवर पडताच काळ्या मातीसह पशु, पक्षी सारेच सुखावतात. पण याच वेळी चिंतातुर होतो तो शेतकरी. त्याला चिंता लागते ती पेरणीची. खरे तर एप्रिल महिन्यातच शेतीची मशागत सुरू होते. मे मध्ये नांगरणी, बियाणे खरेदीसाठी त्याला पैशाची गरज असते. त्याला आशा असते की यंदा तरी कर्जाचा का होईना पण पैसा हाती येईल. पण जून संपायला येतो तरी बँकांची दारे त्यांच्यासाठी उघडलेली नसतात. यंदाच्या हंगामातही असेच वेदनादायी चित्र आहे.राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना जेमतेम ४ ते २० टक्के कर्जपुरवठा केला आहे. खरे तर सरकारच्या कोट्यवधींच्या ठेवींनी उपकृत झालेल्या या बँका आपली ‘राष्ट्रीय’ जबाबदारीच विसरल्या आहेत. याच बँका उद्योगपती, बड्या व्यावसायिकांचे कर्ज झटक्यात मंजूर करतात. यांचे मॅनेजर रात्री ‘परमिट रूम’मध्ये टक्क्यांमध्ये कमिशन घेऊन सेठजींच्या कर्जाला झटक्यात परमिशन देतात. तेव्हा त्यांना न होणाºया कर्जवसुलीची चिंता सतावत नाही. स्वत:च्या गंगाजळीत होत असलेली वाढ त्यांना खुणावत असते. आपला शेतकरी कर्ज बुडवून विदेशात पसार व्हायला काही विजय मल्ल्या, नीरव मोदी नाही. तो तर पाहुणा म्हणून नातलगाकडेही चार दिवस मुक्कामाला जात नाही. मग कर्जाच्या ओझ्याची नामुष्की घेऊन तो कुठे पळून जाणार? कुठे लपून बसणार? पण कर्जबुडव्या बड्या डाकूंसाठी तिजोरीचा बळी द्यायचा अन् मातीत राबणाºया या राजाचा बळी घ्यायचा, असे पक्के ‘मालपाणी’ धोरणच बँकांच्या दिवाणजींनी आखून ठेवले आहे. वाईट याचं वाटतं की सरकार वेळीच या दिवाणजींचे ‘आॅडिट’ करीत नाही. शेतकºयांनी आवाज उठवला किंवा गळफास घेऊन स्वत:चा आवाज बंद केला की, सरकारकडून बँकांवर इशाºयांचे फवारे सोडले जातात. त्याने वरवर बसलेली काहीशी धूळ उडते, पण यांची पाळेमुळे आणखी घट्ट होतात.बुलडाणा जिल्ह्यातील दाताळाच्या सेंट्रल बँकेतील शाखाधिकाºयाने पीककर्ज मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात शेतकºयाच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली. संतापाची तीव्र लाट उसळल्यानंतर त्या राक्षसाला अटकही झाली. पोलिसांकडून चार फटके लावून त्याच्या हिशेबही चुकता होईल. पण शेतकºयाची, त्याच्या पत्नीची, कुटुंबीयांची अशी अवहेलना करू पाहणाºया, लचके तोडण्यासाठी घात लावून बसलेल्या या रानटी मनोवृत्तीचे काय, असा प्रश्न अजूनही कायम आहे. भीक नको पण पण कुत्रा आवर, अशी म्हण आहे. आता कर्ज नको पण बळीराजाची ही अवहेलना थांबवा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. बँका कर्ज देत नाही म्हणून शेतकरी मजबुरीने सावकाराकडे जातो. सावकारी पाशात अडकलेला शेतकरी दिसला की आर. आर. आबांच्या कोपरापासून ते ढोपरापर्यंत सोलून काढण्याच्या इशाºयाची आठवण येते. आबा आज नाहीत. पण परिस्थिती तीच आहे. आधी सावकार कर्ज देऊन छळत होता. आता बँका कर्ज देण्यासाठीच छळत आहेत. यांना बँकेच्या दारात उभा असलेला जगाचा पोशिंदा लाचार वाटू लागला असून मदमस्त झालेले हे लांडगे या मजबुरीचा फायदा घेत आपले आचारही बदलू लागले आहेत. यांची चमडी गेंड्यापेक्षाही जाडी झाली आहे. त्यामुळे आज खºया अर्थाने सरकारने सावकारांच्या आधी या बँकांच्या गब्बरसिंग दिवाणजींना सोलून काढण्याची गरज आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी