शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

राष्ट्रीयकृत बँका घेताहेत ‘राजाचा बळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 02:38 IST

मृगाचा पहिला थेंब पृथ्वीवर पडताच काळ्या मातीसह पशु, पक्षी सारेच सुखावतात. पण याच वेळी चिंतातुर होतो तो शेतकरी. त्याला चिंता लागते ती पेरणीची. खरे तर एप्रिल महिन्यातच शेतीची मशागत सुरू होते.

- कमलेश वानखेडेमृगाचा पहिला थेंब पृथ्वीवर पडताच काळ्या मातीसह पशु, पक्षी सारेच सुखावतात. पण याच वेळी चिंतातुर होतो तो शेतकरी. त्याला चिंता लागते ती पेरणीची. खरे तर एप्रिल महिन्यातच शेतीची मशागत सुरू होते. मे मध्ये नांगरणी, बियाणे खरेदीसाठी त्याला पैशाची गरज असते. त्याला आशा असते की यंदा तरी कर्जाचा का होईना पण पैसा हाती येईल. पण जून संपायला येतो तरी बँकांची दारे त्यांच्यासाठी उघडलेली नसतात. यंदाच्या हंगामातही असेच वेदनादायी चित्र आहे.राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना जेमतेम ४ ते २० टक्के कर्जपुरवठा केला आहे. खरे तर सरकारच्या कोट्यवधींच्या ठेवींनी उपकृत झालेल्या या बँका आपली ‘राष्ट्रीय’ जबाबदारीच विसरल्या आहेत. याच बँका उद्योगपती, बड्या व्यावसायिकांचे कर्ज झटक्यात मंजूर करतात. यांचे मॅनेजर रात्री ‘परमिट रूम’मध्ये टक्क्यांमध्ये कमिशन घेऊन सेठजींच्या कर्जाला झटक्यात परमिशन देतात. तेव्हा त्यांना न होणाºया कर्जवसुलीची चिंता सतावत नाही. स्वत:च्या गंगाजळीत होत असलेली वाढ त्यांना खुणावत असते. आपला शेतकरी कर्ज बुडवून विदेशात पसार व्हायला काही विजय मल्ल्या, नीरव मोदी नाही. तो तर पाहुणा म्हणून नातलगाकडेही चार दिवस मुक्कामाला जात नाही. मग कर्जाच्या ओझ्याची नामुष्की घेऊन तो कुठे पळून जाणार? कुठे लपून बसणार? पण कर्जबुडव्या बड्या डाकूंसाठी तिजोरीचा बळी द्यायचा अन् मातीत राबणाºया या राजाचा बळी घ्यायचा, असे पक्के ‘मालपाणी’ धोरणच बँकांच्या दिवाणजींनी आखून ठेवले आहे. वाईट याचं वाटतं की सरकार वेळीच या दिवाणजींचे ‘आॅडिट’ करीत नाही. शेतकºयांनी आवाज उठवला किंवा गळफास घेऊन स्वत:चा आवाज बंद केला की, सरकारकडून बँकांवर इशाºयांचे फवारे सोडले जातात. त्याने वरवर बसलेली काहीशी धूळ उडते, पण यांची पाळेमुळे आणखी घट्ट होतात.बुलडाणा जिल्ह्यातील दाताळाच्या सेंट्रल बँकेतील शाखाधिकाºयाने पीककर्ज मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात शेतकºयाच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली. संतापाची तीव्र लाट उसळल्यानंतर त्या राक्षसाला अटकही झाली. पोलिसांकडून चार फटके लावून त्याच्या हिशेबही चुकता होईल. पण शेतकºयाची, त्याच्या पत्नीची, कुटुंबीयांची अशी अवहेलना करू पाहणाºया, लचके तोडण्यासाठी घात लावून बसलेल्या या रानटी मनोवृत्तीचे काय, असा प्रश्न अजूनही कायम आहे. भीक नको पण पण कुत्रा आवर, अशी म्हण आहे. आता कर्ज नको पण बळीराजाची ही अवहेलना थांबवा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. बँका कर्ज देत नाही म्हणून शेतकरी मजबुरीने सावकाराकडे जातो. सावकारी पाशात अडकलेला शेतकरी दिसला की आर. आर. आबांच्या कोपरापासून ते ढोपरापर्यंत सोलून काढण्याच्या इशाºयाची आठवण येते. आबा आज नाहीत. पण परिस्थिती तीच आहे. आधी सावकार कर्ज देऊन छळत होता. आता बँका कर्ज देण्यासाठीच छळत आहेत. यांना बँकेच्या दारात उभा असलेला जगाचा पोशिंदा लाचार वाटू लागला असून मदमस्त झालेले हे लांडगे या मजबुरीचा फायदा घेत आपले आचारही बदलू लागले आहेत. यांची चमडी गेंड्यापेक्षाही जाडी झाली आहे. त्यामुळे आज खºया अर्थाने सरकारने सावकारांच्या आधी या बँकांच्या गब्बरसिंग दिवाणजींना सोलून काढण्याची गरज आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी