शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राष्ट्रीयकृत बँका घेताहेत ‘राजाचा बळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 02:38 IST

मृगाचा पहिला थेंब पृथ्वीवर पडताच काळ्या मातीसह पशु, पक्षी सारेच सुखावतात. पण याच वेळी चिंतातुर होतो तो शेतकरी. त्याला चिंता लागते ती पेरणीची. खरे तर एप्रिल महिन्यातच शेतीची मशागत सुरू होते.

- कमलेश वानखेडेमृगाचा पहिला थेंब पृथ्वीवर पडताच काळ्या मातीसह पशु, पक्षी सारेच सुखावतात. पण याच वेळी चिंतातुर होतो तो शेतकरी. त्याला चिंता लागते ती पेरणीची. खरे तर एप्रिल महिन्यातच शेतीची मशागत सुरू होते. मे मध्ये नांगरणी, बियाणे खरेदीसाठी त्याला पैशाची गरज असते. त्याला आशा असते की यंदा तरी कर्जाचा का होईना पण पैसा हाती येईल. पण जून संपायला येतो तरी बँकांची दारे त्यांच्यासाठी उघडलेली नसतात. यंदाच्या हंगामातही असेच वेदनादायी चित्र आहे.राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना जेमतेम ४ ते २० टक्के कर्जपुरवठा केला आहे. खरे तर सरकारच्या कोट्यवधींच्या ठेवींनी उपकृत झालेल्या या बँका आपली ‘राष्ट्रीय’ जबाबदारीच विसरल्या आहेत. याच बँका उद्योगपती, बड्या व्यावसायिकांचे कर्ज झटक्यात मंजूर करतात. यांचे मॅनेजर रात्री ‘परमिट रूम’मध्ये टक्क्यांमध्ये कमिशन घेऊन सेठजींच्या कर्जाला झटक्यात परमिशन देतात. तेव्हा त्यांना न होणाºया कर्जवसुलीची चिंता सतावत नाही. स्वत:च्या गंगाजळीत होत असलेली वाढ त्यांना खुणावत असते. आपला शेतकरी कर्ज बुडवून विदेशात पसार व्हायला काही विजय मल्ल्या, नीरव मोदी नाही. तो तर पाहुणा म्हणून नातलगाकडेही चार दिवस मुक्कामाला जात नाही. मग कर्जाच्या ओझ्याची नामुष्की घेऊन तो कुठे पळून जाणार? कुठे लपून बसणार? पण कर्जबुडव्या बड्या डाकूंसाठी तिजोरीचा बळी द्यायचा अन् मातीत राबणाºया या राजाचा बळी घ्यायचा, असे पक्के ‘मालपाणी’ धोरणच बँकांच्या दिवाणजींनी आखून ठेवले आहे. वाईट याचं वाटतं की सरकार वेळीच या दिवाणजींचे ‘आॅडिट’ करीत नाही. शेतकºयांनी आवाज उठवला किंवा गळफास घेऊन स्वत:चा आवाज बंद केला की, सरकारकडून बँकांवर इशाºयांचे फवारे सोडले जातात. त्याने वरवर बसलेली काहीशी धूळ उडते, पण यांची पाळेमुळे आणखी घट्ट होतात.बुलडाणा जिल्ह्यातील दाताळाच्या सेंट्रल बँकेतील शाखाधिकाºयाने पीककर्ज मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात शेतकºयाच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली. संतापाची तीव्र लाट उसळल्यानंतर त्या राक्षसाला अटकही झाली. पोलिसांकडून चार फटके लावून त्याच्या हिशेबही चुकता होईल. पण शेतकºयाची, त्याच्या पत्नीची, कुटुंबीयांची अशी अवहेलना करू पाहणाºया, लचके तोडण्यासाठी घात लावून बसलेल्या या रानटी मनोवृत्तीचे काय, असा प्रश्न अजूनही कायम आहे. भीक नको पण पण कुत्रा आवर, अशी म्हण आहे. आता कर्ज नको पण बळीराजाची ही अवहेलना थांबवा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. बँका कर्ज देत नाही म्हणून शेतकरी मजबुरीने सावकाराकडे जातो. सावकारी पाशात अडकलेला शेतकरी दिसला की आर. आर. आबांच्या कोपरापासून ते ढोपरापर्यंत सोलून काढण्याच्या इशाºयाची आठवण येते. आबा आज नाहीत. पण परिस्थिती तीच आहे. आधी सावकार कर्ज देऊन छळत होता. आता बँका कर्ज देण्यासाठीच छळत आहेत. यांना बँकेच्या दारात उभा असलेला जगाचा पोशिंदा लाचार वाटू लागला असून मदमस्त झालेले हे लांडगे या मजबुरीचा फायदा घेत आपले आचारही बदलू लागले आहेत. यांची चमडी गेंड्यापेक्षाही जाडी झाली आहे. त्यामुळे आज खºया अर्थाने सरकारने सावकारांच्या आधी या बँकांच्या गब्बरसिंग दिवाणजींना सोलून काढण्याची गरज आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी