शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
2
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
3
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
4
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
5
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
6
SMAT 2025 : दोन टी-२० सामन्यात नाबाद २१४ धावा! १८ वर्षीय मुंबईकराचा शतकी धडाका
7
परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
8
500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
9
पत्नीने PUBG खेळू दिले नाही, पतीने बायकोची हत्या केली; सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
10
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
11
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
12
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
13
उघडताच पूर्ण भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट प्रीमिअमवरुन बंपर लिस्टिंगची शक्यता, पाहा डिटेल्स
14
Renuka Chaudhary: चक्क श्वानाला घेऊन काँग्रेस खासदार संसदेत पोहचल्या; सत्ताधारी भाजपानं घातला गोंधळ, काय घडलं?
15
मोठा निष्काळजीपणा! मध्य प्रदेशात ५० वर्षे जुना पूल कोसळला; १० जण जखमी
16
अर्थव्यवस्थेसाठी 'चिंताजनक' बातमी! रुपया डॉलरपुढे गडगडला, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम!
17
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
18
अफगाणिस्तानने उघडला नवा मार्ग, पाकिस्तानमध्ये हाहाकार; सीमेवरील व्यापार बंदीचा उलटाच झाला परिणाम
19
Holiday: डिसेंबरमध्ये शेअर बाजारात ९ दिवस कामकाज बंद! तुमचं ट्रेडिंग प्लॅनिंग आजच करा! ही घ्या सुट्टीची संपूर्ण यादी
20
यशस्वीची 'तेरे नाम' हेअर स्टाइल पाहून विराटमध्ये अवतरला सलमान; "लगन लगी.." स्टेप्सचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाच्या आत्मक्लेषाचाअर्थ

By admin | Updated: April 12, 2016 04:03 IST

सातेफळ आणि जामदराच्या शेतकऱ्यांनी पुकारलेला संप देशातील शेतकऱ्यांच्या मनातला उद्रेक आहे, त्याच्या असंतोषाचे हे टोक आहे. पोशिंद्याचा हा नवा आत्मक्लेष अधिक भीतीदायक आहे.

- गजानन जानभोर सातेफळ आणि जामदराच्या शेतकऱ्यांनी पुकारलेला संप देशातील शेतकऱ्यांच्या मनातला उद्रेक आहे, त्याच्या असंतोषाचे हे टोक आहे. पोशिंद्याचा हा नवा आत्मक्लेष अधिक भीतीदायक आहे.माणसाना प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, दुष्काळ, नापिकीने त्रस्त शेतकरी रोज मरतोय, पण सरकारला त्याचे सोयरसुतक नाही. कारण सरकार देशद्रोह्यांची जनगणना करण्यात मग्न आणि राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र वाटण्यात तल्लीन. माध्यमाना देणे-घेणे यासाठी नाही, कारण त्यांनीही ‘भारत माता की जय’ जबरीने न म्हणणाऱ्यांना हुडकून काढण्याचे नवे कंत्राट घेतलेले. या वावटळीत विदर्भातील काही शेतकरी यंदा पेरणी न करण्याचा टोकाचा निर्णय घेतात, तेव्हा त्या अस्वस्थ करणाऱ्या बातमीचे मोल सरकार आणि माध्यमाना कळणे अपेक्षितही नाही. यवतमाळ जिल्ह्यातील सातेफळ आणि वाशिम जिल्ह्यातील जामदरा (कवठळ) या दोन गावातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात पेरणीच न करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. दुष्काळ, नापिकी आणि डोक्यावरील कर्जाने मरणप्राय यातना भोगत असलेल्या शेतकऱ्यांनी उचललेले हे टोकाचे पाऊल भविष्यातील भीषण संकटाचे सूचक आहे. या संतापामागील इशारा राज्यकर्त्यांनी आणि समाजाने समजून घेतला पाहिजे. शेतकऱ्यांनी पुकारलेला हा संप आहे. बँकांच्या, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या धमक्यांना बळी पडणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्या या बंडाचे गांभीर्य अजून लक्षात आलेले नाही. बळीराजाने उद्या अन्न-धान्य पिकविणे बंद केले तर या देशाची अवस्था किती भयानक होईल, सातेफळ आणि जामदरा या गावातील शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचे लोण पुढे प्रत्येक गावात पोहोचले तर काय होईल, असे अनेक प्रश्न या निमित्ताने अस्वस्थ करीत आहेत. काही वर्षांपूर्वी शरद जोशींनी राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्याचा एक अहिंसक मार्ग शेतकऱ्याना सांगितला होता, ‘‘तुम्ही काहीच करू नका, फक्त हातावर हात बांधून बांधावर बसून राहा, ‘आम्ही आमच्यापुरते पेरू, आम्हीच खाऊ, तुम्हाला देणार नाही,’ असे ताठर होऊन तेवढे सांगा’’. आज नाही, किमान उद्या तरी आपले चांगले दिवस येतील या आशेने त्यावेळी शेतकऱ्यांनी या द्रष्ट्या योद्ध्याचे ऐकले नाही. सातेफळ आणि जामदराच्या शेतकऱ्यांनी पुकारलेला संप देशातील लाखो शेतकऱ्यांच्या मनातला उद्रेक आहे. त्याच्या असंतोषाचे हे टोक आहे. घरातला कोपरा नि कोपरा दारिद्र्याने भरलेला असताना दारात आलेल्या भिकाऱ्यालाही आपल्या ताटातली चतकोर भाकर देणाऱ्या या पोशिंद्याचा हा नवा आत्मक्लेष अधिक भीतीदायक आहे. पूर्वी तो निमूटपणे शेतात गळफास घ्यायचा किंवा विष खाऊन चुपचाप झोपून जायचा, पण मातीशी शेवटपर्यंत इमान राखायचा. आता मात्र त्याला ही शेती नकोशी झाली आहे. आपण पिकवले नाही तर देशातील बांधव उपाशी राहतील, ही चिंताही त्याला भेडसावत नाही. तो स्वत:सोबतच जगाचेही सरण रचू लागला आहे. स्वातंत्र्यानंतर त्याच्या कल्याणाचा विचार कुठल्याही सरकारने केला नाही. पूर्वी टाटा-बिर्ला आणि आता अंबानी-अदानी, या देशाच्या प्रगतीचे, विकासाचे हेच निर्देशांक! प्रत्येक वेळी तो वेगवेळ्या झेंड्यांखाली आपले गाऱ्हाणे मांडायचा. कधी पुढाऱ्यांना गावबंदी, दिंडी, रास्ता रोको, संसदेवर मोर्चा, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने... ही सगळी लोकशाहीनेच बहाल केलेली अस्त्रे. तरीही राज्यकर्त्यांनी त्याला बेदखल केले. मग तो गांधींच्या वाटेने निघाला, उपोषणाच्या आणि आत्मक्लेषाच्या. त्याने शेती-गाव विकायला काढले. किडनी विक्रीस ठेवली. राष्ट्रपतींकडे स्वेच्छामरणाची परवानगी मागितली. शेवटी निराश झालेला हा बळीराजा पोट भरण्यासाठी शहरात आला आणि बांधकामांवर मजुरी करू लागला. शहराच्या बाहेर नव्या वस्त्या वसलेल्या दिसतात. त्या वस्त्या म्हणजे उद्ध्वस्त झालेल्या असंख्य खेड्यांची स्मशाने. शेतकऱ्यांच्या संयमाचे हे सगळे मार्ग आता संपलेले आहेत. म्हणूनच त्याला यापुढे शेतात काहीच पिकवायचे नाही. त्याच्या मनातल्या आक्रोशाची ही ठिणगी आहे. उद्या त्याचा वणवा होईल. सरकार, समाज म्हणून आपण त्यांना जगू देत नाही, मग ते आपल्याला कसे जगू देतील? ही चिथावणी नाही, वास्तव आहे. त्याच्या आत्मक्लेषाचा अर्थ आपण समजून घेतला नाही, त्याचा तळतळाट तरी आता समजून घेणार की नाही?