शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

बळीराजाच्या आत्मक्लेषाचाअर्थ

By admin | Updated: April 12, 2016 04:03 IST

सातेफळ आणि जामदराच्या शेतकऱ्यांनी पुकारलेला संप देशातील शेतकऱ्यांच्या मनातला उद्रेक आहे, त्याच्या असंतोषाचे हे टोक आहे. पोशिंद्याचा हा नवा आत्मक्लेष अधिक भीतीदायक आहे.

- गजानन जानभोर सातेफळ आणि जामदराच्या शेतकऱ्यांनी पुकारलेला संप देशातील शेतकऱ्यांच्या मनातला उद्रेक आहे, त्याच्या असंतोषाचे हे टोक आहे. पोशिंद्याचा हा नवा आत्मक्लेष अधिक भीतीदायक आहे.माणसाना प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, दुष्काळ, नापिकीने त्रस्त शेतकरी रोज मरतोय, पण सरकारला त्याचे सोयरसुतक नाही. कारण सरकार देशद्रोह्यांची जनगणना करण्यात मग्न आणि राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र वाटण्यात तल्लीन. माध्यमाना देणे-घेणे यासाठी नाही, कारण त्यांनीही ‘भारत माता की जय’ जबरीने न म्हणणाऱ्यांना हुडकून काढण्याचे नवे कंत्राट घेतलेले. या वावटळीत विदर्भातील काही शेतकरी यंदा पेरणी न करण्याचा टोकाचा निर्णय घेतात, तेव्हा त्या अस्वस्थ करणाऱ्या बातमीचे मोल सरकार आणि माध्यमाना कळणे अपेक्षितही नाही. यवतमाळ जिल्ह्यातील सातेफळ आणि वाशिम जिल्ह्यातील जामदरा (कवठळ) या दोन गावातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात पेरणीच न करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. दुष्काळ, नापिकी आणि डोक्यावरील कर्जाने मरणप्राय यातना भोगत असलेल्या शेतकऱ्यांनी उचललेले हे टोकाचे पाऊल भविष्यातील भीषण संकटाचे सूचक आहे. या संतापामागील इशारा राज्यकर्त्यांनी आणि समाजाने समजून घेतला पाहिजे. शेतकऱ्यांनी पुकारलेला हा संप आहे. बँकांच्या, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या धमक्यांना बळी पडणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्या या बंडाचे गांभीर्य अजून लक्षात आलेले नाही. बळीराजाने उद्या अन्न-धान्य पिकविणे बंद केले तर या देशाची अवस्था किती भयानक होईल, सातेफळ आणि जामदरा या गावातील शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचे लोण पुढे प्रत्येक गावात पोहोचले तर काय होईल, असे अनेक प्रश्न या निमित्ताने अस्वस्थ करीत आहेत. काही वर्षांपूर्वी शरद जोशींनी राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्याचा एक अहिंसक मार्ग शेतकऱ्याना सांगितला होता, ‘‘तुम्ही काहीच करू नका, फक्त हातावर हात बांधून बांधावर बसून राहा, ‘आम्ही आमच्यापुरते पेरू, आम्हीच खाऊ, तुम्हाला देणार नाही,’ असे ताठर होऊन तेवढे सांगा’’. आज नाही, किमान उद्या तरी आपले चांगले दिवस येतील या आशेने त्यावेळी शेतकऱ्यांनी या द्रष्ट्या योद्ध्याचे ऐकले नाही. सातेफळ आणि जामदराच्या शेतकऱ्यांनी पुकारलेला संप देशातील लाखो शेतकऱ्यांच्या मनातला उद्रेक आहे. त्याच्या असंतोषाचे हे टोक आहे. घरातला कोपरा नि कोपरा दारिद्र्याने भरलेला असताना दारात आलेल्या भिकाऱ्यालाही आपल्या ताटातली चतकोर भाकर देणाऱ्या या पोशिंद्याचा हा नवा आत्मक्लेष अधिक भीतीदायक आहे. पूर्वी तो निमूटपणे शेतात गळफास घ्यायचा किंवा विष खाऊन चुपचाप झोपून जायचा, पण मातीशी शेवटपर्यंत इमान राखायचा. आता मात्र त्याला ही शेती नकोशी झाली आहे. आपण पिकवले नाही तर देशातील बांधव उपाशी राहतील, ही चिंताही त्याला भेडसावत नाही. तो स्वत:सोबतच जगाचेही सरण रचू लागला आहे. स्वातंत्र्यानंतर त्याच्या कल्याणाचा विचार कुठल्याही सरकारने केला नाही. पूर्वी टाटा-बिर्ला आणि आता अंबानी-अदानी, या देशाच्या प्रगतीचे, विकासाचे हेच निर्देशांक! प्रत्येक वेळी तो वेगवेळ्या झेंड्यांखाली आपले गाऱ्हाणे मांडायचा. कधी पुढाऱ्यांना गावबंदी, दिंडी, रास्ता रोको, संसदेवर मोर्चा, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने... ही सगळी लोकशाहीनेच बहाल केलेली अस्त्रे. तरीही राज्यकर्त्यांनी त्याला बेदखल केले. मग तो गांधींच्या वाटेने निघाला, उपोषणाच्या आणि आत्मक्लेषाच्या. त्याने शेती-गाव विकायला काढले. किडनी विक्रीस ठेवली. राष्ट्रपतींकडे स्वेच्छामरणाची परवानगी मागितली. शेवटी निराश झालेला हा बळीराजा पोट भरण्यासाठी शहरात आला आणि बांधकामांवर मजुरी करू लागला. शहराच्या बाहेर नव्या वस्त्या वसलेल्या दिसतात. त्या वस्त्या म्हणजे उद्ध्वस्त झालेल्या असंख्य खेड्यांची स्मशाने. शेतकऱ्यांच्या संयमाचे हे सगळे मार्ग आता संपलेले आहेत. म्हणूनच त्याला यापुढे शेतात काहीच पिकवायचे नाही. त्याच्या मनातल्या आक्रोशाची ही ठिणगी आहे. उद्या त्याचा वणवा होईल. सरकार, समाज म्हणून आपण त्यांना जगू देत नाही, मग ते आपल्याला कसे जगू देतील? ही चिथावणी नाही, वास्तव आहे. त्याच्या आत्मक्लेषाचा अर्थ आपण समजून घेतला नाही, त्याचा तळतळाट तरी आता समजून घेणार की नाही?