शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

मनोरुग्णांचा हक्क

By admin | Updated: April 12, 2017 03:22 IST

पराकोटीचे नैराश्य आणि हतबलता यामुळे एखाद्या व्यक्तीस आपली समस्या सोडविण्याचा कुठलाही मार्ग सापडत नाही तेव्हा तिच्या मनात आत्महत्त्येचा विचार डोकावू लागतो.

पराकोटीचे नैराश्य आणि हतबलता यामुळे एखाद्या व्यक्तीस आपली समस्या सोडविण्याचा कुठलाही मार्ग सापडत नाही तेव्हा तिच्या मनात आत्महत्त्येचा विचार डोकावू लागतो. आणि हा तणाव, कोंडमारा असह्य झाला की ही अगतिक व्यक्ती आपले आयुष्य संपविण्याचे पाऊल उचलते. दुर्दैवाने काही लोक मृत्युमुखी पडतात, तर काहींचा प्रयत्न अपयशी ठरतो. अशावेळी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेली ही व्यक्ती कायद्याच्या कचाट्यात अडकते. आत्महत्त्येचा प्रयत्न फसल्याचा मोठा आघात सहन करीत असतानाच तिला कायद्याचा गुन्हेगारही ठरविले जाते. यापुढे मात्र असे होणार नाही. कारण आत्महत्त्येचा प्रयत्न करणे हा आता फौजदारी गुन्हा मानला जाणार नाही. संसदेने मंजूर केलेल्या मानसोपचारासंबंधीच्या नव्या कायद्यात मनोरुग्णांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याचे स्वागत करावे तेवढे कमी आहे. मनोरुग्णसुद्धा या देशाचा स्वतंत्र नागरिक आहे. त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. त्याच्या सर्व मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे ही शासनासोबतच त्याचे कुटुंब आणि समाजाचीही जबाबदारी आहे. अशात या कायद्याने त्याला संरक्षण कवच प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागातील आकडेवारीनुसार २०१५ साली देशात आठ हजार मनोरुग्णांनी आत्महत्त्या केली. मनोरुग्णांचा प्रश्न हा जागतिक स्तरावरील चिंतेचा विषय झाला आहे. वेगवेगळ्या कारणांनी दिवसेंदिवस माणसांमधील नैराश्याची पातळी प्रचंड वाढते आहे. भारताचा विचार केल्यास येथे प्रत्येक २० पैकी एक व्यक्ती नैराश्याच्या विळख्यात अडकली आहे. या नैराश्येपोटी माणूस आपला आत्मविश्वास गमावून बसतो, नकारात्मक विचाराने त्याची जगण्याची उमेद संपते आणि मग आत्महत्त्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. खरे तर ही माणसे अशी टोकाची भूमिका का घेतात याचा विचार समाजातील सर्वांनीच करणे गरजेचे आहे. परंतु सर्वसाधारणपणे आपल्या असे बघण्यात येते की या मनोरुग्णांबद्दल त्याचे कुटुंबसुद्धा फारसे संवेदनशील नसते. याचे कारण म्हणजे आजही मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत अमानवीय आहे.