शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मनोरुग्णांचा हक्क

By admin | Updated: April 12, 2017 03:22 IST

पराकोटीचे नैराश्य आणि हतबलता यामुळे एखाद्या व्यक्तीस आपली समस्या सोडविण्याचा कुठलाही मार्ग सापडत नाही तेव्हा तिच्या मनात आत्महत्त्येचा विचार डोकावू लागतो.

पराकोटीचे नैराश्य आणि हतबलता यामुळे एखाद्या व्यक्तीस आपली समस्या सोडविण्याचा कुठलाही मार्ग सापडत नाही तेव्हा तिच्या मनात आत्महत्त्येचा विचार डोकावू लागतो. आणि हा तणाव, कोंडमारा असह्य झाला की ही अगतिक व्यक्ती आपले आयुष्य संपविण्याचे पाऊल उचलते. दुर्दैवाने काही लोक मृत्युमुखी पडतात, तर काहींचा प्रयत्न अपयशी ठरतो. अशावेळी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेली ही व्यक्ती कायद्याच्या कचाट्यात अडकते. आत्महत्त्येचा प्रयत्न फसल्याचा मोठा आघात सहन करीत असतानाच तिला कायद्याचा गुन्हेगारही ठरविले जाते. यापुढे मात्र असे होणार नाही. कारण आत्महत्त्येचा प्रयत्न करणे हा आता फौजदारी गुन्हा मानला जाणार नाही. संसदेने मंजूर केलेल्या मानसोपचारासंबंधीच्या नव्या कायद्यात मनोरुग्णांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याचे स्वागत करावे तेवढे कमी आहे. मनोरुग्णसुद्धा या देशाचा स्वतंत्र नागरिक आहे. त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. त्याच्या सर्व मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे ही शासनासोबतच त्याचे कुटुंब आणि समाजाचीही जबाबदारी आहे. अशात या कायद्याने त्याला संरक्षण कवच प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागातील आकडेवारीनुसार २०१५ साली देशात आठ हजार मनोरुग्णांनी आत्महत्त्या केली. मनोरुग्णांचा प्रश्न हा जागतिक स्तरावरील चिंतेचा विषय झाला आहे. वेगवेगळ्या कारणांनी दिवसेंदिवस माणसांमधील नैराश्याची पातळी प्रचंड वाढते आहे. भारताचा विचार केल्यास येथे प्रत्येक २० पैकी एक व्यक्ती नैराश्याच्या विळख्यात अडकली आहे. या नैराश्येपोटी माणूस आपला आत्मविश्वास गमावून बसतो, नकारात्मक विचाराने त्याची जगण्याची उमेद संपते आणि मग आत्महत्त्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. खरे तर ही माणसे अशी टोकाची भूमिका का घेतात याचा विचार समाजातील सर्वांनीच करणे गरजेचे आहे. परंतु सर्वसाधारणपणे आपल्या असे बघण्यात येते की या मनोरुग्णांबद्दल त्याचे कुटुंबसुद्धा फारसे संवेदनशील नसते. याचे कारण म्हणजे आजही मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत अमानवीय आहे.