शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

मनोरुग्णांचा हक्क

By admin | Updated: April 12, 2017 03:22 IST

पराकोटीचे नैराश्य आणि हतबलता यामुळे एखाद्या व्यक्तीस आपली समस्या सोडविण्याचा कुठलाही मार्ग सापडत नाही तेव्हा तिच्या मनात आत्महत्त्येचा विचार डोकावू लागतो.

पराकोटीचे नैराश्य आणि हतबलता यामुळे एखाद्या व्यक्तीस आपली समस्या सोडविण्याचा कुठलाही मार्ग सापडत नाही तेव्हा तिच्या मनात आत्महत्त्येचा विचार डोकावू लागतो. आणि हा तणाव, कोंडमारा असह्य झाला की ही अगतिक व्यक्ती आपले आयुष्य संपविण्याचे पाऊल उचलते. दुर्दैवाने काही लोक मृत्युमुखी पडतात, तर काहींचा प्रयत्न अपयशी ठरतो. अशावेळी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेली ही व्यक्ती कायद्याच्या कचाट्यात अडकते. आत्महत्त्येचा प्रयत्न फसल्याचा मोठा आघात सहन करीत असतानाच तिला कायद्याचा गुन्हेगारही ठरविले जाते. यापुढे मात्र असे होणार नाही. कारण आत्महत्त्येचा प्रयत्न करणे हा आता फौजदारी गुन्हा मानला जाणार नाही. संसदेने मंजूर केलेल्या मानसोपचारासंबंधीच्या नव्या कायद्यात मनोरुग्णांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याचे स्वागत करावे तेवढे कमी आहे. मनोरुग्णसुद्धा या देशाचा स्वतंत्र नागरिक आहे. त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. त्याच्या सर्व मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे ही शासनासोबतच त्याचे कुटुंब आणि समाजाचीही जबाबदारी आहे. अशात या कायद्याने त्याला संरक्षण कवच प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागातील आकडेवारीनुसार २०१५ साली देशात आठ हजार मनोरुग्णांनी आत्महत्त्या केली. मनोरुग्णांचा प्रश्न हा जागतिक स्तरावरील चिंतेचा विषय झाला आहे. वेगवेगळ्या कारणांनी दिवसेंदिवस माणसांमधील नैराश्याची पातळी प्रचंड वाढते आहे. भारताचा विचार केल्यास येथे प्रत्येक २० पैकी एक व्यक्ती नैराश्याच्या विळख्यात अडकली आहे. या नैराश्येपोटी माणूस आपला आत्मविश्वास गमावून बसतो, नकारात्मक विचाराने त्याची जगण्याची उमेद संपते आणि मग आत्महत्त्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. खरे तर ही माणसे अशी टोकाची भूमिका का घेतात याचा विचार समाजातील सर्वांनीच करणे गरजेचे आहे. परंतु सर्वसाधारणपणे आपल्या असे बघण्यात येते की या मनोरुग्णांबद्दल त्याचे कुटुंबसुद्धा फारसे संवेदनशील नसते. याचे कारण म्हणजे आजही मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत अमानवीय आहे.