शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

घटनेवर न्यायासनाचेच संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 05:23 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या फूल बेंचची बैठक तात्काळ बोलावली जावी व तीत न्यायालयाशी संबंध असणाऱ्या सर्व प्रश्नांची चर्चा व्हावी असे जे पत्र न्या. गोगोई व न्या. लोकूर यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्र यांना पाठविले ते आपल्या न्यायव्यवस्थेत सारेच काही चांगले नसल्याचे सांगणारे आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या फूल बेंचची बैठक तात्काळ बोलावली जावी व तीत न्यायालयाशी संबंध असणाऱ्या सर्व प्रश्नांची चर्चा व्हावी असे जे पत्र न्या. गोगोई व न्या. लोकूर यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्र यांना पाठविले ते आपल्या न्यायव्यवस्थेत सारेच काही चांगले नसल्याचे सांगणारे आहे. हे पत्र जाण्याच्या दोनच दिवस अगोदर सरन्यायाधीश दीपक मिश्र यांच्याविरुद्ध राज्यसभेच्या ७१ सदस्यांनी दाखल केलेला महाभियोगाचा प्रस्ताव उपराष्टÑपती व राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला होता. या प्रस्तावाला राजकारणाचा रंग असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले असले तरी ते फारसे गांभीर्याने घेण्याचे कारण नाही. आपले सर्वोच्च न्यायालय व एकूणच न्यायव्यवस्था ही गेले काही दिवस नको तशा चर्चेत अडकली आहे. तिचे निकाल पक्षपाती असतात. महत्त्वाचे खटले नव्या न्यायमूर्तींकडे सोपवून वरिष्ठ न्यायमूर्तींना डावलले जाते. सरन्यायाधीश राजकीय भूमिका घेतात आणि न्यायव्यवस्थेतील राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. अशा सर्वतºहेच्या गंभीर तक्रारी जाहीर चर्चेत घेण्यात आल्या आहेत. त्यातच न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने न्यायशाखेविषयीचा विश्वास आणखी खच्ची झाला आहे. सरन्यायाधीश मिश्र यांनी या दोन न्यायमूर्तींच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही व ते सामान्यपणे ते देणारही नाहीत. तशीच त्यांची आतापर्यंतची कार्यशैली राहिली आहे. काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊनच त्यांच्या कार्यशैलीवर टीका केली होती. ‘आज आम्ही गप्प राहिलो तर ते आम्ही आमचे आत्मे विकल्यासारखे होईल’ असे जाहीरपणे सांगण्यापर्यंत त्या परिषदेत या न्यायमूर्तींची मजल गेली होती. न्यायदानाची एकूणच पद्धत, सर्वोच्च न्यायालयातील प्रशासन व्यवस्था, न्यायाधीश, सरन्यायाधीशांचा एकाधिकार आणि सहन्यायमूर्तींना दिली जाणारी वागणूक अशा अनेक तक्रारी त्या पत्रपरिषदेत पुढे आल्या होत्या. पण हे सारे एखादे सामान्य प्रकरण असल्यासारखे सरन्यायाधीशांनी व सरकारनेही पाहिले होते. देशाचे चार वरिष्ठ न्यायमूर्ती अशी भूमिका उघडपणे घेतात तेव्हा ते त्या व्यवस्थेवरील काही गंभीर बाबींविषयी बोलत असणार असे त्यांच्यापैकी कुणालाही वाटले नाही. त्याचा परिणाम पुढे सरन्यायाधीश दीपक मिश्र यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या महाभियोगाच्या ठरावात झाला. असा महाभियोग दाखल होणे हीच मुळात एक गंभीर बाब आहे. परंतु कोणत्याही गंभीर प्रश्नाला फारसे महत्त्व न देण्याच्या आताच्या राजकीय शैलीनुसार ती बाबही मामुली मानली गेली. तेवढ्यावर हे सारे थांबले असा अनेकांचा कयास होता. पण सारी व्यवस्थाच जेव्हा पोखरली वा आतून बिघडली असते तेव्हा ती अशा वरवरच्या कारवायांने दुरुस्त वा स्वस्थ होत नाही. न्या. मिश्र हे तसेही आॅक्टोबरअखेरीस निवृत्त होत आहेत. मात्र तेवढा काळही त्यांना या प्रसंगांना व प्रश्नांना तोंड द्यावे लागत असेल तर त्यांच्यात व त्यांच्या कार्यपद्धतीत नक्कीच काही दोष असले पाहिजेत. एवढे सारे वरिष्ठ सरन्यायाधीश न्याय व्यवस्थेच्या व तिच्यातील प्रशासनाधिकाराचा प्रश्नांची चर्चा करायला ‘फूल बेंचची बैठक बोलवा’ असे म्हणत असतील तर त्याचा निष्कर्ष उघड आहे. ही मागणी याआधीही दोन वेळा झाली आणि ती दुर्लक्षिली गेली हे विशेष आहे. सरकारला अनुकूल निकाल देऊन आपल्या निवृत्तीनंतर राज्यपालासारखे एखादे महत्त्वाचे पद मिळवायचे ही आपल्या न्यायमूर्तींची आजवरची परिपाठी राहिली आहे. आपले सरन्यायाधीश राजकीय हस्तक्षेप चालवून घेत असतील आणि सत्ताधाºयांच्या सोयीचे निकाल दिले जाण्याची व्यवस्था करीत असतील तर तो न्यायव्यवस्थेला दिलेला धोका नसून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरचे व घटनेवरील ते संकट आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी सहन्यायाधीशांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थनही केले पाहिजे.