शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
5
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
6
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
7
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
8
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
9
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
10
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
12
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
13
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
14
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
15
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
16
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
17
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
18
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
19
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
20
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

राम मंदिरामुळे भाजप फ्रंटफूटवर; पण थेट 'चार सौ पार'चा दर्प ठेवण्यापेक्षा...

By यदू जोशी | Updated: January 26, 2024 11:24 IST

एकाच वेळी अनेक पातळ्यांवर आघाडी घेणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचा सामना करण्यात अपयशी ठरलेले विरोधक, हे सध्याचे चित्र!

-यदु जोशी

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतरच्या स्थितीत राजकीयदृष्ट्या विचार केला तर भाजप फ्रंट फूटवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढली आहे. महाराष्ट्रात त्याचा फायदा कमळाला आणि जोडीने एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होईल असे दिसते. विरोधी पक्ष मोदींची लोकप्रियताच नाकारतात, पण वास्तव तसे नाही. ही लोकप्रियता ओळखून तिचा प्रभाव कमी करण्यासाठीची रणनीती आखणे हा भाग महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर आजतरी दिसत नाही.

मोदी विरोधक आपोआप आपल्यासोबत येतील, आपल्याला फार काही करण्याची गरज नाही असे महाविकास आघाडीतील पक्षांना वाटते बहुतेक. एकेकाळी संघ परिवारातील लोक इंदिराजींचा असाच राग करायचे; त्यांच्याविषयी काय काय बोलायचे; पण लोकमान्यता इंदिराजींच्या बाजूने असल्याने काही बिघडायचे नाही. विरोधात बोलणाऱ्यांचे डिपॉझिट जप्त व्हायचे. मोदींबाबत तसेच होत आहे. एकाच वेळी अनेक पातळ्यांवर आघाडी घेत असलेले मोदी आणि त्यांचा सामना करण्यात अपयशी ठरत असलेले विरोधक असे सध्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणूक मोदींभोवती फिरणार हे उघड आहे. त्याला महाराष्ट्रही अपवाद नसेल. 

महाविकास आघाडीचे नेते विधानसभा निवडणूक असल्यासारखे बोलत आहेत. आधी लोकसभा आहे आणि त्यात कोणते मुद्दे असावेत याचे भान दिसत नाही. तिकडे भाजपच्याही थोडे अंगात आलेले दिसते. ‘अब की बार चार सो पार’ असा दर्प ठेवण्यापेक्षा नम्रपणे वागले, बोलले तर चांगलेच होईल. ‘फील गुड’चे काय झाले होते, आठवते ना? राम मंदिर, कलम ३७०, मोदी करिष्मा ही भाजपच्या भात्यातील प्रभावी शस्त्रे आहेत. त्याला छेद द्यायचा तर महाराष्ट्रातील सामाजिक संदर्भांचाच आधार महाविकास आघाडीला घ्यावा लागणार आहे. या सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव आघाडी वा महायुती कशा पद्धतीने करतात यावर बरेच काही अवलंबून असेल. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची फलश्रुती काय असेल ते माहिती नाही, पण हे आंदोलन महाराष्ट्राच्या राजकारणाचे ध्रुवीकरण करेल. निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले एक मोठे सामाजिक आंदोलन राजकीय पटल व्यापेलच. त्याचे संभाव्य पडसाद काय उमटतील, जातीय गणिते कशी असतील याचा अंदाज घेत आपल्याला फारसे ‘डॅमेज’ होणार नाही याची काळजी भाजपची थिंकटँक घेत आहे. सगळ्या हालचालींवर भाजप श्रेष्ठीही नजर ठेवून आहेत... काँग्रेस मात्र याबाबत काही करताना दिसत नाही. 

आंबेडकर कोणाला नकोत? ॲड. प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी अशा नेत्यांना सोबत घेण्यात खळखळ करण्याइतकी महाविकास आघाडीची  स्थिती मजबूत नाही. या दोघांचे राजकारण मान्य नसलेले महाविकास आघाडीत एक मोठे नेते आहेत. आंबेडकर-शेट्टी या दोघांनाही त्या नेत्याचे नाव माहिती आहे. गेल्यावेळी अकोल्यात काँग्रेसचा मराठा उमेदवार कोणी, कसा बदलला, आंबेडकरांविरुद्ध मुस्लीम उमेदवार का आणि कोणी दिला, संजय धोत्रे यांना मदत होऊन आंबेडकर कसे पडले याचे कूळ आणि मूळ शोधले तर चटकन लक्षात येईल. त्याच अदृष्य हातांना यावेळीही आंबेडकर-शेट्टी नको असावेत. 

या दोघांना दूर ठेवण्याची खेळी कोणाची आहे हे लक्षात घेऊन काँग्रेसने या दोघांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले तर खेळी खेळणाऱ्यांना शह बसेल. मात्र, उलटेच घडत आहे. ‘आंबेडकर महाविकास आघाडीसोबत गेले तर आमची अडचण आहे’, असे भाजपचे नेते सांगतात. अमरावतीपासून त्यांच्या विविध सभांना मोठा प्रतिसाद तेच सांगत आहे. काँग्रेसला ते कळत नाही. गुरुवारी महाविकास आघाडीची बैठक सुरू झाल्यावर काही तासांनी आंबेडकरांना जाहीर पत्र देऊन बैठकीसाठी बोलविले गेले. हा अपमान का केला गेला? त्यावर आंबेडकरांनी जी काही जाहीर ऐशीतैशी केली त्याने आग होणे साहजिक आहे. 

काँग्रेसचे आउटगोइंग सुरू 

काँग्रेसला स्वत:चे घर सांभाळणे कठीण जाईल असे दिसते. रमेश चेन्नीथला हे महाराष्ट्राचे नवे प्रभारी परवा म्हणाले, ज्यांना जायचंय त्यांनी तत्काळ काँग्रेस सोडून जावे. ..आधे इधर जाव, आधे उधर जाव म्हणाल तर मागे कोणीच राहणार नाही. चेन्नीथला हे राहुल गांधींना, ‘यू आर सराउंडेड बाय राँग पीपल’ अशी जाणीव करून देणारे रोखठोक सांगणारे नेते आहेत म्हणतात. पण, भाजपने पळवापळवी सुरू केली आहे. जळगावचे बडे प्रस्थ असलेले डॉ. उल्हास पाटलांपासून सुरुवात केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टरांचे आणि त्यांच्या डॉक्टर कन्येचे ऑपरेशन केले. महाजन हे बिना स्टेथोस्कोपचे डॉक्टर आहेत. जिल्ह्याजिल्ह्यातले असे पाटील भाजप प्रवेशासाठी संपर्कात आहेत. त्यांना रोखण्यासाठी काँग्रेसचा कोणताही प्लॅन नाही दिसत. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरBJPभाजपाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस