शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

शहाणे करुन सोडावे, सकळजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 9:11 PM

संपूर्ण महाराष्टÑ प्रांती जनकल्याणाची मोठी चढाओढ सुरु झालेली दिसतेय.

मिलिंद कुलकर्णीसंपूर्ण महाराष्टÑ प्रांती जनकल्याणाची मोठी चढाओढ सुरु झालेली दिसतेय. जनकल्याणात आपले ‘कल्याण’ आहे, असा दृष्टांत झाल्यासारखी प्रत्येकाच्या ओठी जनहिताच्या बाता (म्हणजे गोष्टी) दिसून येत आहेत. मीच केवळ जनकल्याण करु शकतो, असे प्रत्येक जण हिरीरिने सांगत आहे. ‘आपले स्वागत आहे’ अशी फलके गावात प्रवेश करताना दिसतात, तशी आता ‘आम्हीच आपले तारणहार, नम्र सेवक’ असे फलक दिसू लागले आहेत. सुहास्य वदन, राजबिंडे रुप, तरुण, तडफदार अशी आणि इतर अनेक विशेषणांनी ही फलके उजळून निघाली आहेत. प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट याचा प्रत्यय ही फलके पाहिल्यावर येत आहे. विकास कामांची मोठी मालिका या फलकांवर दिसून येत असली तरी प्रत्यक्ष गावांमध्ये मात्र ‘विकास’ बेपत्ता आहे. मोठे पूल, धरणे, चकचकीत रस्ते, अत्याधुनिक शाळा, मैदाने असे फलकावर दिसत असले तरी हे चित्र ‘प्रतिकात्मक’ आहे अशी तर तळटीप लिहिलेली नाही ना, असे नागरिक बारकाईने तपासत आहे.ग्रामीण व नागरी भागात ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र. उपजिल्हारुग्णालय, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय कार्यरत आहेत. तेथे उच्चविद्याभूषित डॉक्टरांचा चमू, सहाय्यक सहकारी वर्ग, अत्याधुनिक यंत्रसामुग्री, खाटांची व्यवस्था, रुग्णवाहिका, पुरेसा औषधीसाठा उपलब्ध आहे, असा दावा लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार तर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकार करीत असतानाही अनेक इच्छुक उमेदवार ‘भव्य’ आरोग्य शिबिरे, रोगनिदान शिबिरे का घेत आहेत, हा प्रश्न पामर जनतेला पडत आहे. यात दोन शक्यता दिसून येतात. एकतर सरकार करीत असलेला दावा फोल असावा. शासकीय रुग्णालयांमध्ये कोठेही दाव्याप्रमाणे आरोग्यसेवा मिळत नसावी, म्हणून इच्छुक उमेदवार म्हणतात त्याप्रमाणे, आरोग्य व रोगनिदान शिबिरांची गरज पडत असावी आणि या शिबिरांना शेकड्याने रुग्ण येत असावे. सरकारचा सुरळीत आणि सुयोग्य आरोग्यसेवेचा दावा खरा मानला तर इच्छुक उमेदवारांची शिबिरे ही थोतांड आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारी असावी. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि उमेदवार म्हणून स्वत: चा बायोडाटा भरभक्कम करण्यासाठी शिबिरांचे फोटो आणि उपलब्धी जमा करण्यासाठी आयोजन केले जात असावे.आता दोन्ही दावे खरे किंवा खोटे आहे, याची कारणमिमांसा मायबाप जनतेने करायला हवी.पाच वर्षांनंतर जनतेच्या बौध्दिक, रंजनात्मक विकासाची मोठी काळजी राजकीय नेत्यांना वाटायला लागली आहे. मोठमोठी नाटके, प्रथितयश कलावंत, अभिनेते, दूरचित्रवाहिन्यांवरील प्रसिध्द कार्यक्रम आता तालुकापातळीवर होऊ लागले आहेत. पूर्वी जिल्ह्याच्या गावी जाऊन हा कार्यक्रम बघण्यासाठी आटापिटा करावा लागत असे. आता ही सांस्कृतिक मेजवानी गावपातळीवर मिळाल्याने ग्रामस्थ आनंदी, समाधानी आहेत. पुन्हा रंजनाची चढाओढ आहे. एका इच्छुकाने एक कार्यक्रम घेतला की, दुसरा आणखी मोठा कार्यक्रम आणतो. महापुरुषांवरील महानाट्यांची रेलचेल आहे. एकाने एका महापुरुषावर महानाट्य आणले की, दुसरा दुसऱ्या महापुरुषावर महानाट्य आणतो. जनतेच्या मनोरंजनासाठी किती ही चढाओढ. पाच वर्षातील सांस्कृतिक दुष्काळ पाहणाºया जनतेला अशा पंचपक्वानाच्या मेजवानीने अपचन की हो व्हायचे...हे अपचन झाले की, आहेच पुन्हा ‘भव्य’ आरोग्य तपासणी शिबीर...सुज्ञ, समंजस नागरिक मात्र या भुलभुलैयात अडकून पडत नाही. सारासार विचार करुन तो मुलभूत प्रश्न मांडतो. आपल्या तालुक्यात एकही नाट्यगृह का नाही? राज्य नाट्य स्पर्धेत आपल्या तालुक्यातील रंगकर्मी सहभागी होतात, पण त्यांना तालमीसाठी हॉल मिळावा म्हणून दारोदार भटकावे लागते. काही रंगकर्मी, काही संस्था नियमितपणे प्रशिक्षण शिबिरे, स्पर्धा घेत असतात, त्यांना अर्थसहाय्यासाठी जिकिरीचे प्रयत्न करावे लागतात. अशांना मदतीसाठी पाच वर्षात कुणी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर कार्यक्रमांचा धुराळा उडवला म्हणजे मतदार भुलतीत, असे मानणे म्हणजे आपणच तेवढे शहाणे आहोत, असे समजण्यासारखे आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव