शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

सवयीचा गुलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 09:26 IST

माणूस सवयीचा गुलाम असतो, असे म्हणतात, ते प्लॅस्टिक बंदीच्या कठोर अंमलबजावणीनंतर खरे वाटायला लागले आहे.

- मिलिंद कुलकर्णीमाणूस सवयीचा गुलाम असतो, असे म्हणतात, ते प्लॅस्टिक बंदीच्या कठोर अंमलबजावणीनंतर खरे वाटायला लागले आहे. प्लॅस्टिकचा अतिवापर होऊ लागल्यानंतर आपण बाजारात पिशवी न्यायलाच विसरलो. भाजी, दूध, किराणा सामान, औषधी सगळे काही आम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घ्यायला लागलो. एवढंच काय अगदी उकळता चहासुध्दा प्लॅस्टिकच्या पिशवीमधून नेऊ लागलो. लग्नसोहळ्यात तर हद्द झाली. वाट्या, पेले जसे प्लॅस्टिकचे सर्रास वापरात आले; त्याप्रमाणे कागदाच्या डिशने ताट, पत्रावळी आणि केळीच्या पानांची जागा केव्हा घेतली, हे आम्हाला कळलेच नाही.प्लॅस्टिकने आमचे जीवन पूर्ण व्यापले होते, याची अनुभूती आता आम्हाला होऊ लागली आहे. परवा मुंबईत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आले असताना त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांच्या हाती असलेले गुलाबाचे फूल टिश्यू पेपरमध्ये गुंडाळलेले दिसले. तर सप्तश्रृंगी गडावरील ट्रॉलीच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित असताना त्या कार्यक्रमात पाण्यासाठी प्लॅस्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याने प्रसारमाध्यमात ही घटना ठळकपणे चर्चिली गेली. सार्वजनिक कार्यक्रमात प्लॅस्टिकचा वापर होत असेल तर काळजी घेण्याची नवीन जबाबदारी आयोजकांवर येऊन ठेपली आहे.मायक्रॉन, प्लॅस्टिक पिशव्यांची जाडी हे शब्द आता अंगवळणी पडू लागले आहे. विड्याचे पान खाणारा आता प्लॅस्टिकपेक्षा कागदात पान गुंडाळून घेऊ लागला आहे. भाजीबाजारात गेलेली व्यक्ती पिशवी नसल्याने एक तर दुकानात जाऊन कापडी पिशवीचा भुर्दंड सोसते किंवा भोपळा, फुलकोबी अशा फळभाज्या हातात घेऊन वाहनापर्यंत येते.मराठी माणूस तसा हरहुन्नरी. रस्त्यावरील खरेदी त्याला अतिप्रिय. वाहनावरुन न उतरता खरेदीचा अट्टाहास तर अचाट म्हणायला हवा. आता पावसाळ्यात भुईमुगाच्या शेंगा, मक्याचे कणीस, जांभळे, हातग्याची फुले, चिवळची भाजी असा रानमेवा रस्त्यावर विक्रीसाठी येतो. आणि रानमेवा खपतोदेखील पटकन. रस्त्याने जाताना कडेला बसलेले हे विक्रेते पाहून कोणालाही खरेदीचा मोह होतो. पण खरेदीदार आणि विक्रेता अशा दोघांकडे प्लॅस्टिकची पिशवी नसल्याने खरेदीचा बेत रहित होतो. उत्साहावर पाणी फिरते. विक्रेतेही नाराज होतात. एकीकडे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा खर्च वाचल्याचा आनंद विक्रेत्याला असला तरी एकूण विक्रीवर परिणाम होत असल्याने तेही नाखूश आहेत. परंतु पाच हजार रुपये दंडापेक्षा व्यवसाय कमी झालेला परवडला, असे म्हणत समाधान मानून घेतो.प्लॅस्टिक पिशव्यांची सवय जशी अंगवळणी पडली तसेच टीव्ही आणि मोबाईलचे झाले आहे. घरात गेल्या गेल्या अनेकांना टीव्ही सुरु करण्याची सवय असते. पहिल्यांदा हाती रिमोट घेतला जातो. कुटुंबियांशी संवाद नाही, चौकशी नाही, लगेच टीव्हीला चिकटतात. मग जेवण, विश्रांती सगळे काही टीव्ही समोर चालते. पाहुणे आले तरी टीव्ही काही बंद होत नाही. जाहिरातींच्या ब्रेकमध्ये गप्पा होतात. जाहिराती संपल्या की मन आणि कान पुन्हा टीव्हीकडे...पाहुणे बिचारे हतबल. तीच गत मोबाईलची झाली आहे. नवरा-बायकोचा संवाददेखील चॅटिंगच्या माध्यमातून व्हायची वेळ फार दूर नाही. एवढे सगळे मोबाईलच्या आहारी गेले आहे. पाहुणे आले की, ते यजमानांची चौकशी करण्याऐवजी छोट्या पिनचा चार्जर आहे काय?, वायफायचा पासवर्ड काय? असे प्रश्न विचारताना दिसतात. माणूस सवयीचा किती गुलाम झाला आहे, याची ही उदाहरणे आहेत.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMaharashtraमहाराष्ट्र