शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सवयीचा गुलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 09:26 IST

माणूस सवयीचा गुलाम असतो, असे म्हणतात, ते प्लॅस्टिक बंदीच्या कठोर अंमलबजावणीनंतर खरे वाटायला लागले आहे.

- मिलिंद कुलकर्णीमाणूस सवयीचा गुलाम असतो, असे म्हणतात, ते प्लॅस्टिक बंदीच्या कठोर अंमलबजावणीनंतर खरे वाटायला लागले आहे. प्लॅस्टिकचा अतिवापर होऊ लागल्यानंतर आपण बाजारात पिशवी न्यायलाच विसरलो. भाजी, दूध, किराणा सामान, औषधी सगळे काही आम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घ्यायला लागलो. एवढंच काय अगदी उकळता चहासुध्दा प्लॅस्टिकच्या पिशवीमधून नेऊ लागलो. लग्नसोहळ्यात तर हद्द झाली. वाट्या, पेले जसे प्लॅस्टिकचे सर्रास वापरात आले; त्याप्रमाणे कागदाच्या डिशने ताट, पत्रावळी आणि केळीच्या पानांची जागा केव्हा घेतली, हे आम्हाला कळलेच नाही.प्लॅस्टिकने आमचे जीवन पूर्ण व्यापले होते, याची अनुभूती आता आम्हाला होऊ लागली आहे. परवा मुंबईत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आले असताना त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांच्या हाती असलेले गुलाबाचे फूल टिश्यू पेपरमध्ये गुंडाळलेले दिसले. तर सप्तश्रृंगी गडावरील ट्रॉलीच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित असताना त्या कार्यक्रमात पाण्यासाठी प्लॅस्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याने प्रसारमाध्यमात ही घटना ठळकपणे चर्चिली गेली. सार्वजनिक कार्यक्रमात प्लॅस्टिकचा वापर होत असेल तर काळजी घेण्याची नवीन जबाबदारी आयोजकांवर येऊन ठेपली आहे.मायक्रॉन, प्लॅस्टिक पिशव्यांची जाडी हे शब्द आता अंगवळणी पडू लागले आहे. विड्याचे पान खाणारा आता प्लॅस्टिकपेक्षा कागदात पान गुंडाळून घेऊ लागला आहे. भाजीबाजारात गेलेली व्यक्ती पिशवी नसल्याने एक तर दुकानात जाऊन कापडी पिशवीचा भुर्दंड सोसते किंवा भोपळा, फुलकोबी अशा फळभाज्या हातात घेऊन वाहनापर्यंत येते.मराठी माणूस तसा हरहुन्नरी. रस्त्यावरील खरेदी त्याला अतिप्रिय. वाहनावरुन न उतरता खरेदीचा अट्टाहास तर अचाट म्हणायला हवा. आता पावसाळ्यात भुईमुगाच्या शेंगा, मक्याचे कणीस, जांभळे, हातग्याची फुले, चिवळची भाजी असा रानमेवा रस्त्यावर विक्रीसाठी येतो. आणि रानमेवा खपतोदेखील पटकन. रस्त्याने जाताना कडेला बसलेले हे विक्रेते पाहून कोणालाही खरेदीचा मोह होतो. पण खरेदीदार आणि विक्रेता अशा दोघांकडे प्लॅस्टिकची पिशवी नसल्याने खरेदीचा बेत रहित होतो. उत्साहावर पाणी फिरते. विक्रेतेही नाराज होतात. एकीकडे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा खर्च वाचल्याचा आनंद विक्रेत्याला असला तरी एकूण विक्रीवर परिणाम होत असल्याने तेही नाखूश आहेत. परंतु पाच हजार रुपये दंडापेक्षा व्यवसाय कमी झालेला परवडला, असे म्हणत समाधान मानून घेतो.प्लॅस्टिक पिशव्यांची सवय जशी अंगवळणी पडली तसेच टीव्ही आणि मोबाईलचे झाले आहे. घरात गेल्या गेल्या अनेकांना टीव्ही सुरु करण्याची सवय असते. पहिल्यांदा हाती रिमोट घेतला जातो. कुटुंबियांशी संवाद नाही, चौकशी नाही, लगेच टीव्हीला चिकटतात. मग जेवण, विश्रांती सगळे काही टीव्ही समोर चालते. पाहुणे आले तरी टीव्ही काही बंद होत नाही. जाहिरातींच्या ब्रेकमध्ये गप्पा होतात. जाहिराती संपल्या की मन आणि कान पुन्हा टीव्हीकडे...पाहुणे बिचारे हतबल. तीच गत मोबाईलची झाली आहे. नवरा-बायकोचा संवाददेखील चॅटिंगच्या माध्यमातून व्हायची वेळ फार दूर नाही. एवढे सगळे मोबाईलच्या आहारी गेले आहे. पाहुणे आले की, ते यजमानांची चौकशी करण्याऐवजी छोट्या पिनचा चार्जर आहे काय?, वायफायचा पासवर्ड काय? असे प्रश्न विचारताना दिसतात. माणूस सवयीचा किती गुलाम झाला आहे, याची ही उदाहरणे आहेत.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMaharashtraमहाराष्ट्र