शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

वेध भविष्यकाळाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 05:45 IST

‘युद्धस्य कथा रम्य’ हे मिथक आहे. दुसऱ्या महायुद्धात बॉम्बहल्ल्यात पोळलेला ब्रिटन, नाझी फौजांचा निप्पात करण्याकरिता हाराकिरी केलेला रशिया किंवा अणुबाँबच्या हल्ल्यात बेचिराक झालेला जपान आणि आता कोरोना युद्धात होरपळलेले कुणीही हे मान्य करणार नाही.

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखिका महाश्वेतादेवी यांनी त्यांच्या एका कथेत महाभारतामधील कुरुक्षेत्रावरील धर्मयुद्धानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचे भेदक वर्णन केले आहे. त्या लिहितात की, ‘रणभूमी धगधगत्या चितांनी पेटून उठली. कौरव, पांडवांच्या मृत वीरांचे विधिवत अंत्यसंस्कार होत होते. जसजशा चितांच्या ज्वाळा भडकू लागल्या, तसतसं दाटीवाटीनं दूर उभ्या असलेल्या शोकाकुल स्त्रियांच्या घोळक्यांचं हृदयभेदी आक्रंदन मन हेलावून टाकत होतं. 

योद्ध्यांच्या अंत्यसंस्कारावेळी घिरट्या घालणाºया मांसभक्षी पक्ष्यांनी कुरुक्षेत्राचे आकाश झाकोळून गेले होते. आसमंत सडलेल्या शवगंधाने कोंदटून गेला. तेलात भिजवलेल्या लाकडांच्या सरणांवर सडणाºया प्रेतांचे उंचच उंच ढीग टाकण्यात आले. अशा चितांच्या रांगाच रांगा सर्वदूर पसरल्या होत्या. त्या चिता अनेक दिवस जळत राहिल्या.’ अंगावर काटा उभा राहील व कुरुक्षेत्रावरील त्या युद्धाची भीषणता मार्मीक शब्दांत व्यक्त करण्याची ताकद महाश्वेतादेवींच्या लेखणीतून व्यक्त झाली. कोरोना महामारी हेही जगावर लादले गेलेले तिसरे महायुद्ध असेल तर सध्या त्या युद्धाचा निकराने सामना करणाºया इटलीतील प्रख्यात लेखिका फ्रानसेस्का मेलँड्री यांचे ‘आपल्या भविष्यकाळाकडून’ हे खुले पत्र तितकेच गंभीर व भविष्याची दाहकता व्यक्त करणारे आहे. आज आम्ही जेथे उभे आहोत तेथे उद्या तुम्ही उभे असाल, असे सांगून त्या भारतीयांना जागे करण्याचा प्रयत्न करतात. परिस्थितीचे गांभीर्य कळलेल्या आणि न कळलेल्या लोकांमध्ये लॉकडाऊनच्या निर्बंधाबाबत वाद असल्याचे त्या म्हणतात. भारतातील गोरगरीब वर्ग रोजगार नसल्याने आपल्या गावी जाण्याकरिता किंवा जेथे दोन घास पोटात जातील, अशा ठिकाणी आसरा घेण्याकरिता धडपडत आहे; मात्र त्याचवेळी सुशिक्षित उच्च मध्यमवर्ग आणि श्रीमंत हा होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला धाब्यावर बसवून पार्ट्या, समारंभात मिरवून युद्ध करणाºया अदृश्य हातांना साथ देत आहे. लॉकडाऊनच्या काळातील छंद, आॅनलाइन चॅटिंग, ग्रंथवाचन वगैरेमध्ये तुमचे मन रमणार नाही, असे भाकीत मेलँड्री यांनी व्यक्त केले आहे आणि ते यथार्थ आहे. जेव्हा आजूबाजूला माणूस मृत्यूचे तांडव पाहतो, युद्धात घराघरांतील व्यक्तीचे वाहणारे रक्त पाहतो तेव्हा त्याचा अहंगंड संपुष्टात येतो. अनेकांशी जपलेला वैरभाव क्षुल्लक वाटू लागतो. नेमकी हीच भावना कोरोनाच्या प्रकोपात बहुसंख्याकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे.

संस्कृतीचा विनाश, युगांत यालाच म्हणतात का? असा काळजात धस्स करणारा सवाल लेखिका करते. अशा बिकट प्रसंगात आजूबाजूच्या माणसांचे खरे चेहरे लक्षात येतात, हे वैश्विक सत्य त्या कथन करतात. प्रसिद्धीच्या झोतामधील माणसं गायब होतील किंवा विद्वान वाटणारी मंडळी असंबद्ध वाटू लागतील हे मेलँड्री यांचे मत संकटाच्या काळात इव्हेंट करणाऱ्यांची आठवण करून देते. कोरोनानंतर आपल्या प्रत्येकाचे जीवन बदलून गेलेले असेल असे सांगताना मुलांच्या शाळा आॅनलाइन झालेल्या असतील, वयोवृद्ध मंडळी हट्टी, दुराग्रही झालेली असतील आणि आतापर्यंत केवळ स्वत:चा विचार करणारे तुम्ही माणुसकी हाच खरा धर्म आहे, असे मानू लागाल, असा विचार त्या मांडतात.

काही मूठभर धर्मांध भारतीयांच्या मानसिकतेत जर असा फरक झाला, तर धार्मिक विद्वेषाच्या तव्यावर आपली पोळी पिकवू पाहणाºयांचे दुकान बंद होईल. कोरोना विश्वयुद्धाची ही मोठी देणगी असेल. कोरोना युद्धामुळे आपण सारेच एका नावेचे प्रवासी असल्याचे मेलँड्री म्हणतात. अन्यथा संपूर्ण जग हे वर्ण, वंश, आर्थिक सुबत्ता वगैरे निकषांवर कधीच ‘एकाच नावेचे प्रवासी’ या संज्ञेत बसणारे नव्हते; मात्र लागलीच लेखिकेला या युद्धानंतर निर्माण होणाºया भीषण बेरोजगारी, गरिबीची जाणीव होते आणि ती म्हणते की, लॉकडाऊननंतर नोकरी गमावलेल्या, पोटाची भ्रांत असलेल्यांना आणि आर्थिक सुबत्ता टिकून असलेल्यांना एकाच नावेचे प्रवासी कसे म्हणायचे? कोरोना विरुद्धचे हे युद्ध संपेल तेव्हा जग वेगळे असेल हे निश्चितच; पण राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणाºया हिरोशिमा- नागासाकीकडून शिकलेला धडाच या युद्धात कामी येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या