शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

जशी प्रजा, तसा राजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 07:33 IST

लोकशाही राज्यव्यवस्था स्विकारलेल्या भारतात ६८ वर्षांंनंतरही राजा आणि प्रजा असा भेद काही संपलेला दिसत नाही. प्रत्यक्ष राजेशाही, संस्थानिक नसले तरी त्यांची जागा लोकप्रतिनिधींनी घेतलेली आहे.

-मिलिंद कुलकर्णी

लोकशाही राज्यव्यवस्था स्विकारलेल्या भारतात ६८ वर्षांंनंतरही राजा आणि प्रजा असा भेद काही संपलेला दिसत नाही. प्रत्यक्ष राजेशाही, संस्थानिक नसले तरी त्यांची जागा लोकप्रतिनिधींनी घेतलेली आहे. राजाच्या जागी त्यांना प्रजेनेच बसविले आहे. हे विधान धाडसाचे वाटत असेल तर काही उदाहरणे विचारात घेऊया. आपल्या घरात काही शुभकार्य असले तर पत्रिकेत पाहुणे म्हणून आम्ही लोकप्रतिनिधींचे नाव टाकायला लागलो. हे कशासाठी तर समाजात स्वत:चा मान वाढावा, लोकप्रतिनिधीशी आपली जवळीक आहे, हे दाखविण्यासाठी हा खटाटोप असतो. लोकप्रतिनिधींना मतदारांची आवश्यकता असतेच. जनसंपर्क हा त्यांचा एकंदर कामाचा भाग असतो. लग्नसोहळ्यात तर जनसमुदायाशी संपर्क व संवादाची संधी लाभते. लोकप्रतिनिधी ती कशी सोडतील? त्यामुळे सुख-दु:खाच्या प्रसंगामध्ये लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले. एक लोकप्रतिनिधी दिवसभरात ५० सोहळ्यांना हजेरी लावल्याचे उदाहरण खान्देशात आहे. समर्थन करताना तो लोकप्रतिनिधी म्हणतो, आम्ही कामे किती करतो, यापेक्षा तोरणदारी (लग्नकार्य) आणि मरणदारी (सांत्वनपर भेटी) लोकप्रतिनिधी येतो काय, याकडे मतदारांचे अधिक लक्ष असते.

लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघाचा सर्वांगिण विकास होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणे, त्यांना शासकीय निधी म्हणून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या निधीतून जनतेला उपयोगी पडणा-या व जनहितविषयक कामांवर तो खर्ची करणे, संपूर्ण देश, राज्य तसेच शहराच्या विकासाच्यादृष्टीने धोरणे ठरविण्याच्या प्रक्रियेला विधिमंडळ, संसद, स्थानिक स्वराज्य संस्था यातील कामकाजात सहभागी होऊन दिशा देणे ही अपेक्षित कामे आहेत. परंतु माझ्या गल्लीत नियमित स्वच्छता होत नाही, नळाला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो अशा तक्रारी जेव्हा थेट लोकप्रतिनिधींपर्यंत नेल्या जातात आणि त्या त्यांनी सोडविण्याची अपेक्षा केली जाते, तेव्हा कुठेतरी तंत्र बिघडते. लोकप्रतिनिधी अभ्यासपूर्ण, गुणवत्तापूर्ण कामांपेक्षा लोकांना अपेक्षित कामांना प्राधान्य देऊ लागल्याने एकंदर राज्यव्यवस्थेची कामगिरीचा दर्जा घसरु लागला आहे. वैयक्तीक समस्यांपासून तर सामूहिक समस्यांपर्यंत प्रत्येक समस्या मांडण्यासाठी लोकशाही व्यवस्थेत व्यासपीठ आहे. चढत्या क्रमाने त्याची जबाबदारी निश्चित झालेली आहे. तलाठी, ग्रामविकास अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, सचिव, प्रधान सचिव, राज्यपाल असे त्याचे स्वरुप असते. पण प्रशासनापेक्षा लोकप्रतिनिधीकडे धाव घेतल्यास कामे लवकर होतात, असा समज दृढ झाल्याने लोक तिकडे वळतात असे चित्र आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात वादळामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असतानाही ते आले नाही, पण जिल्ह्याचे रहिवासी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिका-यांनी पालकमंत्री का आले नाही, असे म्हणून जाब विचारला. मंत्री येणे महत्त्वाचे आहेच, पण ते कोणते असावे हेही आता ठरविणार काय? प्रशासनाने लवकर पंचनामे करणे, नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणे यासाठी मंत्र्यांनी शक्ती खर्च करायला हवी. नुकसान झालेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी, शासन तुमच्यासोबत आहे याची जाणीव करुन देण्यासाठी भेट देणे जसे महत्त्वाचे आहे, त्यासोबतच मदत मिळण्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्यायला हवे. अन्यथा चमकोगिरीसाठी केवळ भेटींची मालिका सुरु राहील, हे टाळायला हवे. 

टॅग्स :FarmerशेतकरीGirish Mahajanगिरीश महाजन