शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणातील पवार वेळेत ‘आगे आगे देखिये होता हैं क्या!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 06:19 IST

भारतात आणि महाराष्ट्रात आता नावापुरतेही विरोधक उरले नाहीत, असे गृहित धरून भाजप आणि सेना वक्तव्य करीत होती

- विनायक पाटील

वडणुका सुरू होण्यापूर्वी मी लेख लिहिला होता, त्यात असे विधान केले होते, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून नेते भाजप-सेनेत जात आहेत. हे खरे असले, तरी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात पवार-वेळ नावाचा एक कालावधी असतो आणि तो कालावधी निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुरू होतो आणि सरकार स्थापन होईपर्यंत राहतो. निकाल जाहीर झाला आहे.

भारतात आणि महाराष्ट्रात आता नावापुरतेही विरोधक उरले नाहीत, असे गृहित धरून भाजप आणि सेना वक्तव्य करीत होती व वागतही होती. आपला अश्वमेधाचा वारू आता कोणीही अडवू शकणार नाही, या भ्रमात ते होते. अशा अवस्थेत कार्यकर्ते गाफील राहतात. नेते स्वप्नरंजनात राहतात. आपण सांगू ती पूर्व, आपण ठरवू ते धोरण, आपण देऊ ते उमेदवार, असा पक्ष चालतो. तसा तो चालला. येईल त्याला प्रवेश देण्याचा सपाटा लावला. त्यात आपण ज्यांना गेली अनेक वर्षे भ्रष्ट आणि कूचकामी म्हणत होतो, त्यांचाही समावेश करीत आहोत, याचा नेत्यांना विसर पडला, परंतु मतदारांनी ते लक्षात ठेवले. भावनिक विषयांवर लोकसभेच्या दोन निवडणुका जिंकल्या.

भावनात्मक निर्णयांनी पोट भरत नाहीत, हे समजायला काही कालावधी जावा लागतो. तो गेला आहे. प्रत्यक्षात हाती असलेल्या नोकऱ्या लोक गमावत होते, आणि जाहीरनाम्यात आणखी १ कोटी लोकांना आम्ही नोकरी देऊ अशा आश्वासनांचा परिणाम होत नाही. म्हणून अशी वचने वाºयावरची वरात ठरतात. अश्वमेधाचा वारू थांबविण्यासाठी महाराष्ट्रात पन्नास वर्षांपासून सत्तेच्या प्रांगणात असलेल्या शरद पवार नावाच्या बलदंड आणि जनतेशी नाळ जुळलेल्या आणि मातीत पाय रोऊन उभ्या असलेल्या नेत्याला कमी लेखून राजकीय गणिते आखली गेली. त्यामुळे शंभरपेक्षा अधिक संख्या असलेला एक अनुभवी गट विरोधात आहे, याचा विसर पडता कामा नये. पवार वेळेपैकी फक्त अर्धा वेळ संपला आहे. अजून अर्धा उरला आहे, तो महत्त्वाचा आहे. सत्तेचे गणित कशाही प्रकारे मांडता येऊ शकते.

पवार साहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन सत्तेत येण्याचा सूतराम विचार नाही, असे विधान केले आहे, तसेच सर्व समविचारी पक्ष एकत्र येऊन धोरण ठरवू, असेही ते म्हणाले. काय ठरेल, तेही महत्त्वाचे ठरणार आहे. कालावधी ५ वर्षांचा आहे. लोकमत जलद गतीने विरोधी जात आहे. नंबर गेम म्हटला, तर अनुकूल आहे. अति महत्त्वाकांक्षी सहकाºयाच्या भरवशावर तो टिकवायचा आहे. ही केवळ सुरुवात आहे. गालीब साहेबांच्या भाषेत सांगायचे तर ‘आगे आगे देखिए होता हैं क्या!’ अशी अवस्था आहे. या शेरचा स्वैर अनुवाद असा आहे, ‘अरे वेड्या रडतोस काय, ही तर केवळ सुरुवात आहे, पुढे काय काय वाढून ठेवले आहे, ते तू पाहतच राहा.’

राजकारणातील पवार वेळेचा प्रखर काळ आहे. ‘आगे आगे देखिए होता हैं क्या’

भारतात आणि महाराष्ट्रात आता नावापुरतेही विरोधक उरले नाहीत, असे गृहित धरून भाजप आणि सेना वक्तव्य करीत होती व वागतही होती. आपला अश्वमेधाचा वारू आता कोणीही अडवू शकणार नाही, या भ्रमात ते होते. अशा अवस्थेत कार्यकर्ते गाफील राहतात. नेते स्वप्नरंजनात राहतात. (लेखक माजी मंत्री आहेत.)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस