शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Pandharpur Election: राजकारण झिंदाबाद; अजितदादांची शिवसेना शाखेत बैठक अन् गुलाबरावांनी मागितलं 'घड्याळा'साठी मत

By यदू जोशी | Updated: April 16, 2021 14:59 IST

शिवसेनेच्या विरोधात गेली तीस वर्षे राजकारण करीत असलेले अजितदादा शिवसेना कार्यालयात म्हणजे चमत्कारच.

ठळक मुद्देएकूणच काय तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा तोंडवळा बदलताना दिसत आहे. ३६ वर्षांच्या राजकारणात घड्याळाला मत द्या हे सांगण्याची संधी त्यांनी मला दिली.तुमच्यामुळे (देवेंद्र फडणवीस) हे दिवस आले... प्यार का वादा फिप्टी-फिप्टी' केलं असतं तर हे दिवस आले नसते

यदु जोशी 

भाजपला(BJP) सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस(Shivsena-NCP-Congress) हे तीन पक्ष एकत्र आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री(CM Uddhav Thackeray) तर अजित पवार(Ajit Pawar) उपमुख्यमंत्री झाले. आता तीन पक्षांचा संसार जवळपास दीड वर्षे जुना झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा या महाविकास आघाडीने पार बदलून टाकला. यापुढील सर्व निवडणुका आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढू असे तिन्ही पक्षांचे नेते अधुनमधून सांगत असतात. केवळ मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आधीच जाहीर केले आहे. सत्तेत एकत्र असलेले तीन पक्ष निवडणुकीतही एकत्र असल्याचे चित्र सध्या पंढरपूर विधानसभा निवडणुकीत दिसत आहे. तेथे राष्ट्रवादीचे भगिरथ भालके हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्या विजयासाठी अजित पवार यांनी जिवाचे रान केले आहे. पंढरपूर, मंगळवेढ्यातील गावागावात ते गेले. काल एक वेगळेच चित्र बघायला मिळाले. अजितदादा चक्क शिवसेनेच्या मंगळवेढ्यातील कार्यालयात गेले आणि तिथे त्यांनी निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. हा फोटो जबरदस्त व्हायरल झाला आहे. 

शिवसेनेच्या विरोधात गेली तीस वर्षे राजकारण करीत असलेले अजितदादा शिवसेना कार्यालयात म्हणजे चमत्कारच. मात्र, कोणत्याही परिस्थितीत भगिरथ भालकेंना विजयी करण्यासाठी भिडलेले अजितदादा शिवसेना कार्यालयात जाऊन बसले. दुसरीकडे, शिवसेनेची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रचारसभेत जबरदस्त शेरेबाजी केली. ते भगवा दुपट्टा घालून भाषण देऊ लागले. तेवढ्यात मागे उभ्या असलेल्या एका कार्यकर्त्याने त्यांच्या गळ्यात घड्याळाचा म्हणजे राष्ट्रवादीचा दुपट्टा टाकला. ‘३६ वर्षांच्या शिवसेनेच्या प्रवासात मी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो की, ३६ वर्षांच्या राजकारणात घड्याळाला मत द्या हे सांगण्याची संधी त्यांनी मला दिली.  त्यांचं अन् आमचं 'लव्ह मॅरेज' होतं. नवरदेव कोण अन् नवरी कोण यापेक्षा लफडं होतं हे पक्कं आहे. ते कसं झालं कसं तुटलं हे तुम्हाला सगळं माहिती आहे, असे बोलतानाच गुलाबराव पाटील यांनी, 'तुमच्यामुळे (देवेंद्र फडणवीस) हे दिवस आले... प्यार का वादा फिप्टी-फिप्टी' केलं असतं तर हे दिवस आले नसते, असं सांगत गुलाबरावांनी हशा पिकवला.

एकूणच काय तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा तोंडवळा बदलताना दिसत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे अलिकडेच निधन झाले. महिना-दीड महिन्यात तिथेही विधानसभेची पोटनिवडणूक होईल. पंढरपूरमध्ये २०१९ मध्ये पंढरपुरात भारत भालके (राष्ट्रवादी) यांनी भाजपचे सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव केला होता. देगलूरमध्ये अंतापूरकर (काँग्रेस) यांनी शिवसेनेचे सुभाष साबणे यांचा पराभव केला होता. महाविकास आघाडीत ही जागा सिटिंग-गेटिंगनुसार काँग्रेसकडेच राहील. शिवसेनेचे गुलाबराव पाटील तिथे काँग्रेसच्या प्रचाराला जातील कदाचित. महाराष्ट्राच्या राजकारण असं बदलत चाललं आहे.

टॅग्स :PandharpurपंढरपूरShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस