शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
3
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
4
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
5
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
6
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
7
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
8
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
9
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
10
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
11
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
12
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
13
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
14
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
15
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
16
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
17
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
18
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
19
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
20
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली

पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 05:28 IST

Operation Sindoor संघर्ष चिघळणे पाकिस्तानच्या हिताचे नाही; पण जिहादी मनोवृत्ती स्वस्थ बसणार नाही. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी संघटना आता सुडाने पेटल्या असणार.

-दिवाकर देशपांडे, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक

भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गतपाकिस्तानवर कारवाई करून आश्चर्यचकित केले आहे. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याबद्दल पाकिस्तानला शिक्षा देणे आवश्यक होते. सिंधू पाणीवाटप करार स्थगित करून, तसेच अन्य निर्बंध लादून ही शिक्षा दिली गेली होती; पण या शिक्षेने भारतीय जनतेचे समाधान झालेले नव्हते. यापेक्षा कडक शिक्षेची मागणी होत होती, जनमानसाच्या इच्छेला मान देऊन भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाई केली असली तरी ती नियोजनपूर्वक केली आहे. या कारवाईची व्याप्ती व परिणाम यांचा पूर्ण विचार ती करण्यापूर्वी झालेला  आहे. 

भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील पाच, तर पाकिस्तानातील चार दहशतवादी केंद्रांवर हल्ले करून ही ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत. या हल्ल्यासाठी भारताने क्षेपणास्त्रे, ड्रोन, लॉइटर म्युनिशन्स व लढाऊ विमानांचा वापर केला असावा, असे हल्ल्याच्या स्वरूपावरून लक्षात येते. भारताने दावा केलेल्या सर्व नऊ ठिकाणांवरील हल्ल्याला पाकिस्तानकडून पुष्टी मिळाली आहे, याचा अर्थ हे हल्ले १०० टक्के यशस्वी झाले आहेत. या हल्ल्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत या हल्ल्याचे व्हिडीओही दाखवण्यात आले. कोणतेही क्षेपणास्त्र अडवून पाडल्याचा किवा ड्रोन पाडल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला नाही, याचा अर्थ पाकिस्तानची चिनी बनावटीची क्षेपणास्त्र रोधक यंत्रणा हे हल्ले रोखण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे, असे म्हणावे लागेल. पाकिस्तानने भारताची कधी तीन, तर कधी पाच विमाने पाडल्याचा दावा केला आहे; पण त्याचा कोणताही पुरावा सादर केलेला नाही किवा भारतानेही या दाव्यांचा इन्कार केलेला नाही. 

यातले सत्य यथावकाश बाहेर येईल; पण भारताने आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता पाकिस्तानातील ज्या चार दहशतवादी केंद्रांवर हल्ले केले आहेत, ते हवाई दलाच्या राफेलसारख्या विमानातून क्षेपणास्त्रे डागून केले असावेत असे सकृतदर्शिनी दिसते. हा हल्ला पाकिस्तानची हद्द न ओलांडता या विमानांनी ‘बियाँड द व्हिज्युअल रेंज’ क्षेपणास्त्रे वापरून केला असे दिसते. राफेल विमानांवर स्काल्प व हॅमर ही अशी क्षेपणास्त्रे बसविता येतात. ही क्षेपणास्त्रे अत्यंत अचूक आहेत, त्यामुळे हा हल्ला यशस्वी झाला आहे. भारत असा हल्ला करणार आहे, असा अंदाज पाकिस्तानी माहितीमंत्र्यांनी आधीच वर्तविला होता, त्यामुळे पाकिस्तानने सर्व दहशतवादी केंद्रांवरील आपली साधनसामग्री व माणसे आधीच हलवली असणार यात काही शंका नव्हती. असे असताना या केंद्रांवर हल्ले करून काय फायदा झाला असणार असा प्रश्न पडतो; पण बहावलपूरच्या हल्ल्यात ‘कु’प्रसिद्ध दहशतवादी मसूद अझर याच्या कुटुंबातील दहा लोक व चार निकट सहकारी मारले गेल्याचे मसूद अझरनेच मान्य केले आहे. तसे असेल तर या हल्ल्याने मसूद अझरला मोठा धक्का दिला आहे, असे म्हणावे लागेल. शिवाय बिलाल या दहशतवादी केंद्राच्या हल्ल्यात याकूब मुघल हा दहशतवादी ठार झाला आहे, हे लहानसहान यश नव्हे. अन्य हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, हा प्रश्न अनुत्तरित असला तरी आता ही ठिकाणे पुन्हा सुरू करताना पाकिस्तानला अडचणी नक्कीच येतील. 

पाकिस्तानने भारताच्या या हल्ल्याला अद्याप प्रत्युत्तर दिलेले नाही; पण त्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तोफांचा भडीमार सुरू केला आहे व त्यात जीवितहानी झाल्याच्या बातम्या आहेत. भारतही या भडिमाराला, तसेच प्रत्युत्तर देत आहे. हा हल्ला फक्त दहशतवादी केंद्रांवर केला आहे व पाकची लष्करी ठाणी कटाक्षाने टाळली आहेत, हे सांगून भारताने संघर्ष पुढे वाढविण्याची इच्छा नाही, हे स्पष्ट केले आहे; पण त्याचबरोबर पाकिस्तानने या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले तर भारत आणखी कारवाई करण्यास कचरणार नाही, हेही स्पष्ट केले आहे.

या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देऊन भारताने पहलगाम हल्ल्यात ज्या पुरुषांना वेचून ठार मारले होते, त्यांच्या विधवांना न्याय देण्याचा हेतू स्पष्ट केला आहे. आता प्रश्न असा आहे की, पाकिस्तान या कारवाईचा बदला घेण्यासाठी भारतावर प्रतिहल्ला करील काय व तो कसा करील हा. खरे तर हा संघर्ष चिघळणे पाकिस्तानच्या हिताचे नाही; पण पाकिस्तानची जिहादी मनोवृत्ती त्याला स्वस्थ बसू देणार नाही. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी संघटना आता अधिक सुडाने पेटल्या असणार. त्यामुळे भारतावर प्रतिहल्ला होण्याची शक्यता दृष्टीआड करता येणार नाही. उलट भारताला आता डोळ्यांत तेल घालून सज्ज राहावे लागणार आहे.diwakardeshpande@gmail.com

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान