शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

केवळ नियतीचा घाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 3:28 AM

एखादी अनपेक्षित दु:खद घटना घडली, की नियतीचा घाला असे म्हणून आपण मोकळे होतो. कधी अशा घटना मानवी प्रयत्नांद्वारे टाळता येण्यासारख्या नसतात किंवा मानवी चुकीमुळे घडलेल्या नसतात.

एखादी अनपेक्षित दु:खद घटना घडली, की नियतीचा घाला असे म्हणून आपण मोकळे होतो. कधी अशा घटना मानवी प्रयत्नांद्वारे टाळता येण्यासारख्या नसतात किंवा मानवी चुकीमुळे घडलेल्या नसतात. अशा वेळी नियतीचा घाला या शब्दांत त्या घटनेचे वर्णन केले तर ते समजून घेता येईल; परंतु जेव्हा एखादी घटना निव्वळ मानवी चुकीमुळे, अक्षम्य हलगर्जीमुळे घडते, तेव्हा केवळ नियतीवर दोषारोपण करून कसे मोकळे होता होईल? अकोला जिल्ह्यातील आगर या गावातील एका कुटुंबावर सोमवारी असाच दुर्दैवी प्रसंग ओढवला. दिवसभर शेतात राब राब राबून मिळालेल्या मजुरीतून लेकरांसाठी कपडे खरेदी करण्याचे स्वप्न रंगवित असलेली तरुण महिला, तिचा अवघा १३ वर्षांचा मुलगा आणि इतर दोघांचा सोमवारी भल्यापहाटे नागपूरनजीक झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. दुर्दैवाचा फेरा असा, की ती तरुण महिला, तिचा मुलगा आणि इतर पाच जण ज्या आॅटोरिक्षातून शेतातून घरी परतत होते, त्या रिक्षाला विरुद्ध दिशेने येणाºया ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का लागल्याने अपघात झाला होता. त्या अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेला विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकने जबर धडक दिल्याने, अवघ्या काही तासांच्या अंतराने दुसरा अपघात झाला आणि त्यामध्ये चार जण दगावले. गंभीर बाब ही, की ज्या रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात झाला तो रस्ता चौपदरी आहे. अशा रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहन येणे अभिप्रेत नसते; मात्र ट्रकचालकाने चुकीच्या दिशेने ट्रक हाकला आणि जीवघेणा अपघात घडला. थोडक्यात, निव्वळ मानवी चूक व हलगर्जीमुळे अपघात घडून, चौघांना नाहक जीवास मुकावे लागले. या अपघातामुळे आम्हा भारतीयांच्या ‘ट्रॅफिक सेन्स’चा मुद्दा ऐरणीवर यायला हवा. संपूर्ण जगात भारतातील बेशिस्त वाहतूक कुप्रसिद्ध आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वाहतूक नियंत्रक दिव्यांकडे दुर्लक्ष, थोडासा वेळ आणि इंधन वाचविण्यासाठी दुभाजक असलेल्या रस्त्यांवर चुकीच्या दिशेने वाहन हाकणे, दुभाजक नसलेल्या रस्त्यांवर उजव्या बाजूला वळण्यासाठी आपले वाहन रस्त्याच्या पार उजव्या बाजूला नेणे, इतरांची पर्वा न करता रस्त्यात कुठेही वाहन उभे करणे, जड वाहने उजव्या लेनमधून हाकणे, रस्त्यांवर कोंडाळे करून गप्पा मारणे, असे नाना दुर्गुण बहुतांश भारतीयांच्या अंगी पुरेपूर भिनले आहेत. अशाच एखाद्या दुर्गुणामुळे कधी तरी असा भीषण अपघात घडतो. त्यात काही जीवानिशी जातात, काही कायमचे पंगू होतात आणि आम्ही मात्र नियतीवर दोष ढकलून मोकळे होतो!

टॅग्स :Accidentअपघात