शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

घोषणांच्या पावसात लाभार्थी मात्र कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:51 AM

‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना तशी लोकाभिमुख. पण जेवढा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली तेवढेच दुर्लक्षही करण्यात आले. शासनाकडून निधीच प्राप्त न झाल्याने गेल्या वर्षभरापासून या योजनेंतर्गत एकाही लाभार्थ्याच्या खात्यात एक छदामदेखील जमा झालेला नाही. गोंदिया जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या १५० च्या घरात आहे. राज्यात हा आकडा मोठा आहे.

हल्ली नुसता घोषणांचा पाऊस सुरू आहे. सामान्य माणसाच्या उत्थानासाठी राज्य सरकारने उचललेली पावलं वरकरणी कौतुकास्पद वाटत असली तरी अंमलबजावणीच्या नावावर पुरती बोंब आहे.परवा एक दाम्पत्य गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण खात्यात धडकले. ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेचे ते लाभार्थी. दोन मुली जन्माला आल्यानंतर त्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. शासनाने ठरवून दिलेले निकषही पूर्ण केले तरी त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. याचाच जाब विचारण्यासाठी त्यांची ही धडपड. म्हणे दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास प्रत्येक कन्येच्या नावे २५ हजार रुपयांचे फिक्स डिपॉझिट स्वत: शासन करेल. ती कन्या १८ वर्षांची झाली की तिला ती रक्कम सोपविली जाईल. योजना तशी लोकाभिमुख. पण जेवढा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली तेवढेच दुर्लक्षही करण्यात आले. शासनाकडून निधीच प्राप्त न झाल्याने गेल्या वर्षभरापासून एकाही लाभार्थ्याच्या खात्यात एक छदामदेखील जमा झालेला नाही. गोंदिया जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या १५० च्या घरात आहे. राज्यात हा आकडा मोठा आहे. ज्या विभागाचीही योजना आहे त्या विभागाचा थेट संबंध महिलांशीच येत असल्याने या योजनेचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. राज्याच्या टोकावील जिल्ह्यातच जर ही स्थिती आहे तर इतर जिल्ह्यांचा विचार न केलेलाच बरा. भ्रूणहत्येला आळा बसावा, मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी, या उदात्त हेतूने सुरू केलेली योजना जर निधी नसल्याने बासनात गुंडाळली जात असेल तर केवळ श्रेय लाटण्यासाठी त्याचा उदोउदो तरी करायचा कशाला, असा संतप्त सवाल लाभार्थी विचारू लागले आहेत.अशीच बोंब शिष्यवृत्ती योजनेबाबतही आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमाच झाली नाही. सर्वाधिक फटका बसला तो आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना. आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कशी पार पाडावी, याबाबतचे कुठलेच ज्ञान नसल्याने अनेकांना अर्जच दाखल करता आला नाही. शिवाय या विद्यार्थ्यांना दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी निर्वाह भत्ता दिला जातो. तोदेखील मिळाला नाही. यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी नुकताच यवतमाळात एल्गार पुकारला होता. गंमत म्हणजे, विरोधी बाकावर असताना शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल आणण्याच्या बाता करणारे आणि तत्कालीन सरकारविरोधात कंठशोष करणारे आता या मुद्यावर ‘ब्र’ काढत नाहीत.कर्जमाफीची घोषणा करून नऊ महिन्यांचा कालावधी लोटला. घोषणेच्या वेळी गरजू कास्तकाराला तात्काळ १० हजार रुपयांचे कर्ज देण्याचे जाहीर करण्यात आले. कर्जासाठी कास्तकार बँकेत पोहचला खरा; पण त्याला परतवून लावण्यात आले. त्याच्या मनाचा कोंडमारा अद्याप सुरू आहे. संबंधित बँकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशी डरकाळी फोडण्यात आली मात्र त्यालाही बँका बधल्या नाहीत. मग नरक चतुर्थीपर्यंत सर्वांची खाती ‘निल’ होतील, असे आश्वासन देण्यात आले. तेही जमले नाही. नंतर २५ डिसेंबर आणि आता मार्च अखेरपर्यंत शेतकºयांना कर्जमुक्त करण्याचे अभिवचन सरकार देत असताना ‘मिस मॅच’ नावाची नवी भानगड उभी झाली आहे. निवड करण्यात आलेल्या खात्यांपैकी तब्बल २३ लाख खाती ‘मिस मॅच’ असल्याचे सांगितले जात आहे- गजानन चोपडे

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार